शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

धोंडेवाडीसह नऊ गावांत पोहोचले पाणी!,मायणी परिसरातही येणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 15:31 IST

गेल्या दोन दशकांपासून अधिककाळ प्रतीक्षेत असलेल्या खटाव पूर्व भागांमधील धोंडेवाडीसह नऊ गावांमध्ये सोमवारी तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.

ठळक मुद्देधोंडेवाडीसह नऊ गावांत पोहोचले पाणी!,मायणी परिसरातही येणार पाणीतारळीच्या पाण्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद

संदीप कुंभारमायणी : गेल्या दोन दशकांपासून अधिककाळ प्रतीक्षेत असलेल्या खटाव पूर्व भागांमधील धोंडेवाडीसह नऊ गावांमध्ये सोमवारी तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.तारळी प्रकल्प दुष्काळी भागातील गावांच्या पिण्याची व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी निर्मिती करण्यात आली होती. या प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या विविध गावांचे पुनर्वसन खटाव तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले आहे. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे येत होते. यामध्ये प्रामुख्याने कधी जमीन अधिग्रहण तर कधी निधीची टंचाई निर्माण होत होती.तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी खटाव तालुक्याच्या पूर्व भागात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यांची कामे ही दोन दशकांपासून सुरू होती. म्हणजे गेली दहा वर्षे या कालव्यांची कामे सुरूच आहेत.

यामध्ये प्रामुख्याने धोंडेवाडी येथील जलसेतू सुमारे ४६८ मीटर लांबीचा असून, यामध्ये १५ मीटर अंतराचे ३१ गाळे आहेत तर जमिनीपासून या जलसेतूची उंची ५ ते १२ मीटर इतकी आहे. दीड बाय दीड मीटर अंतरातून जलसेतूचे काम सुरू होते. अनेक अडथळे निर्माण होत गेली आणि विविध कारणांमुळे या भागात पाणी देण्यासाठी हा सर्वात मोठा अडथळा उभा होता. मात्र, परिसरात गतवर्षीपासून सुरू असलेल्या जनआंदोलनमुळे काम पूर्ण झाले.या उपसा सिंचन योजनेचे पाणी द्यावे, यासाठी गेल्या जानेवारी महिन्यापासून या धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या नऊ गावांतील ग्रामस्थ जनआंदोलन करत होते. यामध्ये रस्ता रोको, निवेदन, अधिकाऱ्यांच्या भेटीत सातत्य राहिल्यामुळे व भागातील माजी आ. प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुुुुदगे, हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, नंदकुमार मोरे, विजय शिंदे यांच्या प्रयत्नातून या भागात आज पाणी आल्यामुळे या भागातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.

गेल्या तीन महिन्यांपासून या पाण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अधिकाऱ्यांकडून ही सकारात्मकता मिळत नव्हता. पाणी सोडायचे कसे येथून पाणी सुटेपर्यंत संघर्ष करावा लागला. पाणी सुटले त्यानंतर पुरेसा दाब नसल्याने पाणी पुन्हा बंद झाले. त्यामुळे पाणी येते का नाही? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, जनआंदोलनामुळे हे पाणी धोंडेवाडीसह नऊ गावांच्या शिवारात दाखल झाले आहे.-हणमंत भोसले, उपसरपंच, धोंडेवाडी, खटाव 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसर