शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

धोंडेवाडीसह नऊ गावांत पोहोचले पाणी!,मायणी परिसरातही येणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 15:31 IST

गेल्या दोन दशकांपासून अधिककाळ प्रतीक्षेत असलेल्या खटाव पूर्व भागांमधील धोंडेवाडीसह नऊ गावांमध्ये सोमवारी तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.

ठळक मुद्देधोंडेवाडीसह नऊ गावांत पोहोचले पाणी!,मायणी परिसरातही येणार पाणीतारळीच्या पाण्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद

संदीप कुंभारमायणी : गेल्या दोन दशकांपासून अधिककाळ प्रतीक्षेत असलेल्या खटाव पूर्व भागांमधील धोंडेवाडीसह नऊ गावांमध्ये सोमवारी तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.तारळी प्रकल्प दुष्काळी भागातील गावांच्या पिण्याची व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी निर्मिती करण्यात आली होती. या प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या विविध गावांचे पुनर्वसन खटाव तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले आहे. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे येत होते. यामध्ये प्रामुख्याने कधी जमीन अधिग्रहण तर कधी निधीची टंचाई निर्माण होत होती.तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी खटाव तालुक्याच्या पूर्व भागात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यांची कामे ही दोन दशकांपासून सुरू होती. म्हणजे गेली दहा वर्षे या कालव्यांची कामे सुरूच आहेत.

यामध्ये प्रामुख्याने धोंडेवाडी येथील जलसेतू सुमारे ४६८ मीटर लांबीचा असून, यामध्ये १५ मीटर अंतराचे ३१ गाळे आहेत तर जमिनीपासून या जलसेतूची उंची ५ ते १२ मीटर इतकी आहे. दीड बाय दीड मीटर अंतरातून जलसेतूचे काम सुरू होते. अनेक अडथळे निर्माण होत गेली आणि विविध कारणांमुळे या भागात पाणी देण्यासाठी हा सर्वात मोठा अडथळा उभा होता. मात्र, परिसरात गतवर्षीपासून सुरू असलेल्या जनआंदोलनमुळे काम पूर्ण झाले.या उपसा सिंचन योजनेचे पाणी द्यावे, यासाठी गेल्या जानेवारी महिन्यापासून या धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या नऊ गावांतील ग्रामस्थ जनआंदोलन करत होते. यामध्ये रस्ता रोको, निवेदन, अधिकाऱ्यांच्या भेटीत सातत्य राहिल्यामुळे व भागातील माजी आ. प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुुुुदगे, हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, नंदकुमार मोरे, विजय शिंदे यांच्या प्रयत्नातून या भागात आज पाणी आल्यामुळे या भागातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.

गेल्या तीन महिन्यांपासून या पाण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अधिकाऱ्यांकडून ही सकारात्मकता मिळत नव्हता. पाणी सोडायचे कसे येथून पाणी सुटेपर्यंत संघर्ष करावा लागला. पाणी सुटले त्यानंतर पुरेसा दाब नसल्याने पाणी पुन्हा बंद झाले. त्यामुळे पाणी येते का नाही? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, जनआंदोलनामुळे हे पाणी धोंडेवाडीसह नऊ गावांच्या शिवारात दाखल झाले आहे.-हणमंत भोसले, उपसरपंच, धोंडेवाडी, खटाव 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसर