शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कांदा शेतीसाठी नोकरीवर पाणी

By admin | Updated: January 4, 2016 00:34 IST

पळशीतील गोरखनाथ यादवचे धाडस--ही रानवाट वेगळी...

कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेला, ज्यांच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला आहे, अशा माण तालुक्यात कोठेतरीच हिरवळ दिसते, नाही तर जळून गेलेली पिकं दिसतात. या भागात शेती करणं म्हणजे जुगार समजला जातो. याच मातीतील पळशी येथील गोरखनाथ यादव यांचे धाडस काहीसे वेगळेच होते. पुणे विद्यापीठातून इंग्रजी विषयाची उच्च पदवी संपादन केल्यानंतर एका कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर माण तालुक्यातील एका शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कामही केले; पण लहानपणापासून शेती करण्याची आवड त्यांना नोकरीत स्वस्थ बसू देत नव्हती अन् त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे वडिलोपार्जित वीस एकर शेती आहे. पण त्यातील बहुतांश शेती जिरायत आहे. तीन विहिरी आहेत. मात्र, सततच्या दुष्काळामुळे पाणीपातळी खालावलेली. तरीही हिमतीने शेती करण्याचे ठरविले. सव्वा गुंठा जागेत कांद्याची लागवड केली. त्यातून गोखनाथ यादव यांना थोडथोडके नाही तर चक्क दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. लॉटरीसारखा आलेल्या पैशांचा सदुपयोग करत त्यांनी वडिलांनी घेऊन ठेवलेले कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकप्रकारे कर्जाचा डोंगर कमी झाला. कांदा पिकाबरोबरच त्यांनी ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाला यासारखी पिके घेतली आहेत. भाजीपाला विक्रीतून चांगले उत्पन्न निघत आहे. शेती करत असतानाही त्यांनी रासायनिक खताला बगल देत सेंद्रिय शेती, शेणखताचा वापर करत आहेत. त्याचप्रमाणे नवनवीन प्रयोग करून दुष्काळी माण तालुक्यातही योग्य नियोजन केले तर आदर्श शेती करता येते, हे समाजाला दाखवून देण्याचा संकल्प पळशी येथील गोरखनाथ यादव केला आहे. लहानपणापासून शेतीची आवड असल्याने नोकरीच्या मागे न धावता शेती करण्याचा निर्णय तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी आदर्श घालून देत आहे.