शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कांदा शेतीसाठी नोकरीवर पाणी

By admin | Updated: January 4, 2016 00:34 IST

पळशीतील गोरखनाथ यादवचे धाडस--ही रानवाट वेगळी...

कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेला, ज्यांच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला आहे, अशा माण तालुक्यात कोठेतरीच हिरवळ दिसते, नाही तर जळून गेलेली पिकं दिसतात. या भागात शेती करणं म्हणजे जुगार समजला जातो. याच मातीतील पळशी येथील गोरखनाथ यादव यांचे धाडस काहीसे वेगळेच होते. पुणे विद्यापीठातून इंग्रजी विषयाची उच्च पदवी संपादन केल्यानंतर एका कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर माण तालुक्यातील एका शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कामही केले; पण लहानपणापासून शेती करण्याची आवड त्यांना नोकरीत स्वस्थ बसू देत नव्हती अन् त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे वडिलोपार्जित वीस एकर शेती आहे. पण त्यातील बहुतांश शेती जिरायत आहे. तीन विहिरी आहेत. मात्र, सततच्या दुष्काळामुळे पाणीपातळी खालावलेली. तरीही हिमतीने शेती करण्याचे ठरविले. सव्वा गुंठा जागेत कांद्याची लागवड केली. त्यातून गोखनाथ यादव यांना थोडथोडके नाही तर चक्क दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. लॉटरीसारखा आलेल्या पैशांचा सदुपयोग करत त्यांनी वडिलांनी घेऊन ठेवलेले कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकप्रकारे कर्जाचा डोंगर कमी झाला. कांदा पिकाबरोबरच त्यांनी ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाला यासारखी पिके घेतली आहेत. भाजीपाला विक्रीतून चांगले उत्पन्न निघत आहे. शेती करत असतानाही त्यांनी रासायनिक खताला बगल देत सेंद्रिय शेती, शेणखताचा वापर करत आहेत. त्याचप्रमाणे नवनवीन प्रयोग करून दुष्काळी माण तालुक्यातही योग्य नियोजन केले तर आदर्श शेती करता येते, हे समाजाला दाखवून देण्याचा संकल्प पळशी येथील गोरखनाथ यादव केला आहे. लहानपणापासून शेतीची आवड असल्याने नोकरीच्या मागे न धावता शेती करण्याचा निर्णय तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी आदर्श घालून देत आहे.