शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

वांग मराठवाडी धरणग्रस्तांना कुणी घर देता का घर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 11:16 IST

आज ना उद्या पुर्नवसन होईल. नवीन जागेवर नवी घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करु. या प्रतिक्षेत गेली वीस वर्षापासून वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचा खडतर प्रवास सुरू आहे. आता तर घरांच्या भिंतीही जीर्ण झाल्या असुन पावसात किंवा भुकंपात घरे ढासळण्याची भिती निर्माण झाली आहे. आम्ही मातीत गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त उपस्थित करीत आहेत.

ठळक मुद्देवांग मराठवाडी धरणग्रस्तांची शासनाकडून उपेक्षा अनेक कुटूंबांचे धोकादायक घरात वास्तव्यआम्ही मातीत गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार का? प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न दुर्घटनेची वाट न पाहता धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती द्या

सणबूर ,दि. १ : आज ना उद्या पुर्नवसन होईल. नवीन जागेवर नवी घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करु. या प्रतिक्षेत गेली वीस वर्षापासून वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचा खडतर प्रवास सुरू आहे. आता तर घरांच्या भिंतीही जीर्ण झाल्या असुन पावसात किंवा भुकंपात घरे ढासळण्याची भिती निर्माण झाली आहे. आम्ही मातीत गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त उपस्थित करीत आहेत.

वांग मराठवाडी धरणाच्या कामाला १९९७ साली प्रत्यक्ष सुरूवात झाली. कधी धरणग्रस्तांची आंदोलने तर कधी निधीचा तुटवडा यामध्ये धरणाचे काम आजही अपुर्ण स्थितीत आहे. मेंढ, केकतवाडी, घोटील, उमककांचन येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबे पाटण, कऱ्हाड तालुक्यासह सांगली जिल्ह्यात विस्थापित होत आहेत. जुनी घरे मोडून काही धरणग्रस्त नविन गावठाणात विस्थापित झाली आहेत. तर आजही अनेक धरणग्रस्त मुळ जागेवर पुर्नवसनाच्या प्रतिक्षेत आहेत.

शासनाकडुन मिळालेली भरपाई रक्कम उपजिवेकीसाठी व अन्य कामासाठी खर्च झाल्याचे धरणग्रस्त सांगत आहेत. गेली वीस वर्ष धरणग्रस्त पुर्नवसनाची वाट पाहतायत. आज ना उद्या पुर्नवसन होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. पुनर्वसन झाल्यानंतर नवीन जागेवर, नवीन घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. या आशेवरच ते आजपर्यंत चिखल-मातीच्या घरात राहत आहेत. या घरांची त्यांनी दुरूस्तीही केली नाही.

घराच्या भिंती जिर्ण होऊन ढासळू लागल्या आहेत. अनेक घरे अखेरची घटका मोजत आहेत. या ठिकाणी राहत असलेल्या धरणग्रस्तांनी त्यांच्या घराच्या भिंती ढासळल्याने घराभोवती आडोशासाठी कुडामेडीच्या भिंती उभ्या केल्या आहेत. अशाच खिळखिळ्या घरातच आजही अनेक धरणग्रस्त वास्तव्यास आहेत. हा परिसर भुकंप व अतिवृष्टीचा असल्यामुळे घरे कोसळण्याची भिती असते. 

 

मुळगावात वास्तव्यास असणाऱ्या अनेक धरणग्रस्त कुटुंबाचे अजुनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांनी अजुनही गाव सोडलेले नाही. शासनाने घरे ढासळुन होणाऱ्या दुर्घटनेची वाट न पाहता धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवून पुनर्वसनाला गती द्यायला हवी.- जगन्नाथ विभुतेधरणग्रस्त, वांगमराठवाडी

 

गेली वीस वर्ष पुर्नवसन होईल या आशेवर घराची दुरूस्ती केली नाही. आता घरांच्या भिंती जिर्ण झाल्या आहेत. ही घरे कोणत्याही वेळी भूकंप आल्यास ढासळू शकतात. ही दुर्घटना घडल्यानंतर शासनास जाग येणार आहे का?- मारूती मोहितेधरणगस्त, उमरकांचन

टॅग्स :FarmerशेतकरीDamधरण