शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वांग मराठवाडी धरणग्रस्तांना कुणी घर देता का घर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 11:16 IST

आज ना उद्या पुर्नवसन होईल. नवीन जागेवर नवी घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करु. या प्रतिक्षेत गेली वीस वर्षापासून वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचा खडतर प्रवास सुरू आहे. आता तर घरांच्या भिंतीही जीर्ण झाल्या असुन पावसात किंवा भुकंपात घरे ढासळण्याची भिती निर्माण झाली आहे. आम्ही मातीत गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त उपस्थित करीत आहेत.

ठळक मुद्देवांग मराठवाडी धरणग्रस्तांची शासनाकडून उपेक्षा अनेक कुटूंबांचे धोकादायक घरात वास्तव्यआम्ही मातीत गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार का? प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न दुर्घटनेची वाट न पाहता धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती द्या

सणबूर ,दि. १ : आज ना उद्या पुर्नवसन होईल. नवीन जागेवर नवी घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करु. या प्रतिक्षेत गेली वीस वर्षापासून वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचा खडतर प्रवास सुरू आहे. आता तर घरांच्या भिंतीही जीर्ण झाल्या असुन पावसात किंवा भुकंपात घरे ढासळण्याची भिती निर्माण झाली आहे. आम्ही मातीत गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त उपस्थित करीत आहेत.

वांग मराठवाडी धरणाच्या कामाला १९९७ साली प्रत्यक्ष सुरूवात झाली. कधी धरणग्रस्तांची आंदोलने तर कधी निधीचा तुटवडा यामध्ये धरणाचे काम आजही अपुर्ण स्थितीत आहे. मेंढ, केकतवाडी, घोटील, उमककांचन येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबे पाटण, कऱ्हाड तालुक्यासह सांगली जिल्ह्यात विस्थापित होत आहेत. जुनी घरे मोडून काही धरणग्रस्त नविन गावठाणात विस्थापित झाली आहेत. तर आजही अनेक धरणग्रस्त मुळ जागेवर पुर्नवसनाच्या प्रतिक्षेत आहेत.

शासनाकडुन मिळालेली भरपाई रक्कम उपजिवेकीसाठी व अन्य कामासाठी खर्च झाल्याचे धरणग्रस्त सांगत आहेत. गेली वीस वर्ष धरणग्रस्त पुर्नवसनाची वाट पाहतायत. आज ना उद्या पुर्नवसन होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. पुनर्वसन झाल्यानंतर नवीन जागेवर, नवीन घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. या आशेवरच ते आजपर्यंत चिखल-मातीच्या घरात राहत आहेत. या घरांची त्यांनी दुरूस्तीही केली नाही.

घराच्या भिंती जिर्ण होऊन ढासळू लागल्या आहेत. अनेक घरे अखेरची घटका मोजत आहेत. या ठिकाणी राहत असलेल्या धरणग्रस्तांनी त्यांच्या घराच्या भिंती ढासळल्याने घराभोवती आडोशासाठी कुडामेडीच्या भिंती उभ्या केल्या आहेत. अशाच खिळखिळ्या घरातच आजही अनेक धरणग्रस्त वास्तव्यास आहेत. हा परिसर भुकंप व अतिवृष्टीचा असल्यामुळे घरे कोसळण्याची भिती असते. 

 

मुळगावात वास्तव्यास असणाऱ्या अनेक धरणग्रस्त कुटुंबाचे अजुनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांनी अजुनही गाव सोडलेले नाही. शासनाने घरे ढासळुन होणाऱ्या दुर्घटनेची वाट न पाहता धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवून पुनर्वसनाला गती द्यायला हवी.- जगन्नाथ विभुतेधरणग्रस्त, वांगमराठवाडी

 

गेली वीस वर्ष पुर्नवसन होईल या आशेवर घराची दुरूस्ती केली नाही. आता घरांच्या भिंती जिर्ण झाल्या आहेत. ही घरे कोणत्याही वेळी भूकंप आल्यास ढासळू शकतात. ही दुर्घटना घडल्यानंतर शासनास जाग येणार आहे का?- मारूती मोहितेधरणगस्त, उमरकांचन

टॅग्स :FarmerशेतकरीDamधरण