शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

वांग मराठवाडी धरणग्रस्तांना कुणी घर देता का घर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 11:16 IST

आज ना उद्या पुर्नवसन होईल. नवीन जागेवर नवी घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करु. या प्रतिक्षेत गेली वीस वर्षापासून वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचा खडतर प्रवास सुरू आहे. आता तर घरांच्या भिंतीही जीर्ण झाल्या असुन पावसात किंवा भुकंपात घरे ढासळण्याची भिती निर्माण झाली आहे. आम्ही मातीत गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त उपस्थित करीत आहेत.

ठळक मुद्देवांग मराठवाडी धरणग्रस्तांची शासनाकडून उपेक्षा अनेक कुटूंबांचे धोकादायक घरात वास्तव्यआम्ही मातीत गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार का? प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न दुर्घटनेची वाट न पाहता धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती द्या

सणबूर ,दि. १ : आज ना उद्या पुर्नवसन होईल. नवीन जागेवर नवी घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करु. या प्रतिक्षेत गेली वीस वर्षापासून वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचा खडतर प्रवास सुरू आहे. आता तर घरांच्या भिंतीही जीर्ण झाल्या असुन पावसात किंवा भुकंपात घरे ढासळण्याची भिती निर्माण झाली आहे. आम्ही मातीत गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त उपस्थित करीत आहेत.

वांग मराठवाडी धरणाच्या कामाला १९९७ साली प्रत्यक्ष सुरूवात झाली. कधी धरणग्रस्तांची आंदोलने तर कधी निधीचा तुटवडा यामध्ये धरणाचे काम आजही अपुर्ण स्थितीत आहे. मेंढ, केकतवाडी, घोटील, उमककांचन येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबे पाटण, कऱ्हाड तालुक्यासह सांगली जिल्ह्यात विस्थापित होत आहेत. जुनी घरे मोडून काही धरणग्रस्त नविन गावठाणात विस्थापित झाली आहेत. तर आजही अनेक धरणग्रस्त मुळ जागेवर पुर्नवसनाच्या प्रतिक्षेत आहेत.

शासनाकडुन मिळालेली भरपाई रक्कम उपजिवेकीसाठी व अन्य कामासाठी खर्च झाल्याचे धरणग्रस्त सांगत आहेत. गेली वीस वर्ष धरणग्रस्त पुर्नवसनाची वाट पाहतायत. आज ना उद्या पुर्नवसन होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. पुनर्वसन झाल्यानंतर नवीन जागेवर, नवीन घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. या आशेवरच ते आजपर्यंत चिखल-मातीच्या घरात राहत आहेत. या घरांची त्यांनी दुरूस्तीही केली नाही.

घराच्या भिंती जिर्ण होऊन ढासळू लागल्या आहेत. अनेक घरे अखेरची घटका मोजत आहेत. या ठिकाणी राहत असलेल्या धरणग्रस्तांनी त्यांच्या घराच्या भिंती ढासळल्याने घराभोवती आडोशासाठी कुडामेडीच्या भिंती उभ्या केल्या आहेत. अशाच खिळखिळ्या घरातच आजही अनेक धरणग्रस्त वास्तव्यास आहेत. हा परिसर भुकंप व अतिवृष्टीचा असल्यामुळे घरे कोसळण्याची भिती असते. 

 

मुळगावात वास्तव्यास असणाऱ्या अनेक धरणग्रस्त कुटुंबाचे अजुनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांनी अजुनही गाव सोडलेले नाही. शासनाने घरे ढासळुन होणाऱ्या दुर्घटनेची वाट न पाहता धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवून पुनर्वसनाला गती द्यायला हवी.- जगन्नाथ विभुतेधरणग्रस्त, वांगमराठवाडी

 

गेली वीस वर्ष पुर्नवसन होईल या आशेवर घराची दुरूस्ती केली नाही. आता घरांच्या भिंती जिर्ण झाल्या आहेत. ही घरे कोणत्याही वेळी भूकंप आल्यास ढासळू शकतात. ही दुर्घटना घडल्यानंतर शासनास जाग येणार आहे का?- मारूती मोहितेधरणगस्त, उमरकांचन

टॅग्स :FarmerशेतकरीDamधरण