शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

शेतीपंपांचे सरसकट वीजबिल माफ करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

By नितीन काळेल | Updated: September 23, 2024 19:31 IST

साडे सात अश्वशक्तीवरील शेतकऱ्यांनाही लाभ द्या 

सातारा : महाराष्ट्र शासनाने साडे सात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचे वीजबील माफ केलेले आहे. यामुळे सुमारे ४५ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पण, साडे सात अश्वशक्तीच्यावर शेतीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकदम कमी आहे. त्यामुळे त्यांनाही न्याय द्यावा. त्यांची चिंता दूर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेली आहे.संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतीपंपाचे बेकायदेशीर विजबिल माफ करावे म्हणून महाराष्ट्रभर आंदोलने करत होती. त्यामुळे शासनाच्या लक्षात ही गंभीर बाब आली. त्यानंतर विजबिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन. परंतु ही योजना अर्धवट केल्याने राज्यातील साडे तीन लाखांहून अधिक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

यातील सर्वाधिक शेतकरी संख्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. याचे कारण येथील भाग डोंगरदर्यांनी जास्त व्यापलाय. त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना जास्त उंचीवरील शेतीसाठी पाईपलाईन करूनच पाणी न्यावे लागते. तसेच नदी, धरणांचेही प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दूरच्या पल्ल्यावर पाईपलाईन करून पाणी न्यावे लागत असल्याने जास्त क्षमतेच्या विद्युत मोटारी आहेत.याबाबत त्वरित विचार करून साडेसात अश्वशक्तीवरील सर्व शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घ्यावे. अन्यथा संघटना शेतकऱ्यांना बरोबर घेऊन निर्णय होईपर्यंत आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जूनभाऊ साळुंखे, वाहतूक संघ अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, राजू घाडगे, उमेश घाडगे, आप्पासाहेब घोरपडे, विशाल गायकवाड, भीमराव चव्हाण, प्रदीप चव्हाण, मिलींद चव्हाण, संतोष चव्हाण, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना