शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाई तालुक्यात महिन्यात ४३८, तर पाच दिवसात २४१ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:40 IST

वाई : गेल्या काही महिन्यांपासून कोरानाबाधितांची संख्या कमी येत होती, परंतु १५ मार्चनंतर राज्यासह देशात ...

वाई : गेल्या काही महिन्यांपासून कोरानाबाधितांची संख्या कमी येत होती, परंतु १५ मार्चनंतर राज्यासह देशात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट असून परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी स्थिती आहे. गतीने कोरोना संसर्ग होणाऱ्या देशातील दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराट्रातील असल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ही वाढत आहे. तसेच राज्यात काही जिल्ह्यांत कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच विषाणूचा नवीन आलेला ट्रेंड यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

वाई तालुक्यात पंधरा, वीस अशा येणाऱ्या बाधितांच्या संख्येत वाढ होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संख्या पन्नासच्या वर गेली असून गेल्या पाच दिवसात २४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ५ एप्रिलला ७१ बाधित सापडले असून वाई शहरातील २२ रुग्ण आहेत. मार्च महिन्यात ४३८ रुग्ण बाधित सापडले आहेत. ही प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. राज्यासह देशात जानेवारी महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाचा पाहिला, दुसरा टप्पा होऊन आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण चालू आहे. कोरोनाची लस आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे. तरीही सर्वांनी खबरदारी घेणे काळाची गरज आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अभियान चालू केले आहे. तालुक्यात कोरोनाला पूर्ण पायबंध घालून साखळी तोडण्यासाठी नागरिक व व्यवसायिकांनी नियमांचे काटेखोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनाकडून फिरत्या पथकांद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह व्यावसायिक करीत आहेत.

तरी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.

चौकट

सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून व्यावसायिक, नागरिकांनी सावधगिरी बाळगून स्वतःच गाफील न राहता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन केले पाहिजे. लग्नसमारंभात, बाजारात नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरण मोहीम चालू असून प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे

- उदयकुमार कुसूरकर

गटविकास अधिकारी, वाई पंचायत समिती, वाई