शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

वाघोशीच्या शेतकऱ्याचे पाखरांसाठी दातृत्व.. प्राणीमित्रांमधून कौतुक : पवार कुटुुंबीयांकडून बाजरी पीक पक्ष्यांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:01 AM

आदर्की : फलटण तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आल्यामुळे उन्हाळी पिकात वाढ झाली आहे. वाघोशी येथील पवार कुटुंबीयांनी उन्हाळी बाजरीचे पीक केले, पीक जोमाने आले;

सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : फलटण तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आल्यामुळे उन्हाळी पिकात वाढ झाली आहे. वाघोशी येथील पवार कुटुंबीयांनी उन्हाळी बाजरीचे पीक केले, पीक जोमाने आले; पण पक्ष्यांचे थवे पाहून बाजरीची राखण करण्याऐवजी सर्व बाजरी पीक पक्ष्यांना सोडून दिले आहे.

फलटण तालुक्यात दहा वर्षांपूर्वी भयानक दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांना चारा, पाणी नव्हते. नागरिकांना पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत होत्या; पण फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्यातून पाणी नोव्हेंबर ते मे महिन्यादरम्यान दोन पाळ्या सुटत असल्याने पाणीटंचाई जाणवत नाही.

पाणी उपलब्ध पाहून शेतकºयांनी ऊस, भुईमूग, टॉमटो, मिरची, मका अन्य पिके घेतली.त्यामुळे मोर, कावळा, व्हला, चिमणी, चितर अन्य पक्ष्यांना चारा उपलब्ध नसल्याने वाघोशी येथील शेतकरी तुषार पवार यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेऊन पाण्याच्या दोन-तीन पाळ्या देऊन पीक जोमात आणले. कणसेही चांगली भरली, त्याची राखण करण्यासाठी पवार कुटुंबीय सकाळ-सांयकाळ जात असत; पण काही पक्षी दिवसभर झाडावर किलबिलाट करत असल्याचे पाहून पवार कुटुंबीयांनी पक्ष्यांसाठी ३० गुंठे बाजरी सोडून दिल्याने प्राणीमित्रांमधून कौतुक होत आहे. 

पाणी उपलब्ध पाहून अन्य पिकांबरोबर बाजरीचे पीक घेतले. पाण्याच्या तीन पाळ्या देऊन पीकही चांगले आले; पण त्याची राखण करताना शेकडो पाखरे घिरट्या घालत ओरडत होते. काही पाखरे दिवसभर झाडावर बसून ओरडत होती, म्हणून बाजरी पीक पाखरांना सोडून देण्याचा निर्णय घेतला.- रमेश पवार, शेतकरी, वाघोशी