शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

घालुनी घाव घणाचे नशीब आजमावितो!

By admin | Updated: January 5, 2016 00:36 IST

शेती अवजारांना झळाळी : परप्रांतीय कारागिरांकडून पाटण तालुक्यात शेतकऱ्यांना सेवा

राजेंद्र लोंढे ल्ल मल्हारपेठ खेडोपाडी शेती औजारं बनविणारी बलुतेदारी पद्धत संपुष्टात आली आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे ग्रामीण कारागीर काळाच्या पडद्याआड गेला आहे. पाटण तालुक्यात त्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही कारागीर कुटुंबे या भागातील शेती अवजारांना झळाळी देऊन शेतकऱ्यांना सेवा देण्याचे काम करत आहेत. पाटण—कराड मार्गावर निसरेफाटा येथे हीच कष्टाची कामे घेऊन आलेत मध्यप्रदेशातील कष्टकरी कुटुंबे. हे कारागीर कुऱ्हाडी, टिकाव फावडे, कुदळ सतुर, भाला, बरचा, नांगर, कुळव, पास, विळा, खुरपे अशा शेती अवजारांना झळाळी देत आहेत. त्यामुळे आपली शेती अवजारे दुरुस्त करून घेण्यासाठी गर्दी होत आहे. ही कला पाहण्यासाठीही अनेकजण येथे थांबत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कारागीरांकडे पाहिल्यानंतर खेडोपाडी बलुतेदारीतून कारागिरी लुप्त होत असल्याचीच आठवण सतावत आहे. कुठे गेले ग्रामीण कारागीर. भाता, तप्त निखारे, ऐरणीवर घाव घालणारी साथीदारीण व लाल भडक लोखंडाला आकार देणारा कारागीर हे दृश्य निसरेफाटा येथे रस्त्याकडेला पाहायला मिळत आहे. कालबाह्य होत चाललेली ही कला आकर्षणाचे केंद्र बनत आहे. लोखंडापासून वस्तू कशा बनवतात, हे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. उदरनिर्वाहाचं साधन नसल्याने स्थलांतराची वेळ महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय कारागीर पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकत आहेत. अव्वल दर्जाचे हे कारागीरही त्या प्रांतातील बलुतेदार आहेत. रामसिंग, जसवंतसिंग, धारासिंग लोहार अशी या कारागिरांची कुटुंबं आहेत. कष्टाचे मोल कवडीमोल! मध्यप्रदेशमध्ये आम्हा बलुतेदार कुटुंबांना जमीन व मिळकतीसाठी कोणतेच साधन नाही. यामुळे उदरनिवार्हासाठी महाराष्ट्र, कर्नाटकात शेकडो कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे मुलांना शिक्षण देता येत नाही. राहण्यास जागा नाही गावोगावी स्थलांतर होत आहे. यंत्रामुळे पूर्वीसारखी शेती अवजारे राहिली नाहीत. त्यामुळे कष्टातूनही काही मिळकत होईना. कोळसा टाकून भाता फुकून तापलेल्या लोखंडावर घणाचे घाव टाकूनही घामाचे दाम मिळेना, याचेच वाईट वाटते, अशी खंत रामसिंग लोहार यांनी ‘लोकमत’जवळ बोलून दाखविली.