शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

छाटणीला आलेल्या द्राक्षबागेवर अवकाळीचा घाला, शेतकरी संकटात

By दीपक शिंदे | Updated: November 24, 2023 18:06 IST

दुष्काळाशी दोन हात; मात्र अवकाळीपुढे सगळेच व्यर्थ

वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी येथे मागील पंधरवड्यात अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण आणि रात्रभर सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ऐन भरात आलेल्या द्राक्षबागा मातीमोल झाल्या आहेत. या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला असून, शासन स्तरावरून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.माण तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थितीशी झुंजून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या आधारावर द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. मात्र, दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे ९ नोव्हेंबरच्या अवकाळीने घात केला. हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने दुष्काळाशी दोन हात करणारा शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने वरकुटे-मलवडीतील द्राक्षबाग शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्षबाग शेतकरी करत आहेत.

रात्रंदिवस राब-राब राबून द्राक्षबाग जपली खरी. भरघोस उत्पादन निघून साधारणतः १० लाखांच्या वर पैसे होतील, असं वाटत असतानाच अवकाळी पावसाने एका रात्रीत सोनेरी स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी  -दादासाहेब बनसोडे, द्राक्षबागायतदार शेतकरी, वरकुटे-मलवडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामानFarmerशेतकरी