शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

छाटणीला आलेल्या द्राक्षबागेवर अवकाळीचा घाला, शेतकरी संकटात

By दीपक शिंदे | Updated: November 24, 2023 18:06 IST

दुष्काळाशी दोन हात; मात्र अवकाळीपुढे सगळेच व्यर्थ

वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी येथे मागील पंधरवड्यात अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण आणि रात्रभर सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ऐन भरात आलेल्या द्राक्षबागा मातीमोल झाल्या आहेत. या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला असून, शासन स्तरावरून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.माण तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थितीशी झुंजून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या आधारावर द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. मात्र, दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे ९ नोव्हेंबरच्या अवकाळीने घात केला. हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने दुष्काळाशी दोन हात करणारा शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने वरकुटे-मलवडीतील द्राक्षबाग शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्षबाग शेतकरी करत आहेत.

रात्रंदिवस राब-राब राबून द्राक्षबाग जपली खरी. भरघोस उत्पादन निघून साधारणतः १० लाखांच्या वर पैसे होतील, असं वाटत असतानाच अवकाळी पावसाने एका रात्रीत सोनेरी स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी  -दादासाहेब बनसोडे, द्राक्षबागायतदार शेतकरी, वरकुटे-मलवडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामानFarmerशेतकरी