शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील गावे होणार १०० टक्के सौरग्राम ! 

By नितीन काळेल | Updated: March 11, 2025 19:33 IST

शाश्वत विकासाकडे वाटचाल : जिल्हा परिषदेचा ‘मिशन शाश्वत ग्रामपंचायत’ उपक्रम

नितीन काळेल सातारा : सौरउर्जा काळाची गरज झाली असून, आता सातारा जिल्हा परिषदही जिल्ह्यात ‘मिशन शाश्वत ग्रामपंचायत’ उपक्रम राबवत आहे. त्यामधून अधिकाधिक गावे १०० टक्के सौरग्राम करण्यात येणार आहेत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करून हरितउर्जेच्या आधारे गाव उर्जा स्वयंपूर्ण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाने १०० टक्के सौरऊर्जा ग्राम होण्याचा बहुमान नुकताच मिळविला आहे. यासाठी १५व्या वित्त आयोगाचा निधी, माझी वसुंधरा अभियान आणि इतर योजनांच्या माध्यमातून मिळालेल्या बक्षीस रकमा, लोकवर्गणी, सीएसआर फंड अशा विविध निधीच्या माध्यमातून गाव १०० टक्के सौरऊर्जा स्वयंपूर्ण ग्राम करून शाश्वत विकासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.आता सौर ऊर्जाग्राम निर्मितीची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक गावांचा सहभाग घेण्यात येणार आहे. याअंतर्गत गावे १०० टक्के सौरउर्जा ग्राम करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून काही गावांची निवड करण्यात आली आहे. तसेच या गावांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे.पहिल्या टप्प्यात या गावांना शाश्वत उर्जेच्या आधारे उर्जा स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, जलजीवन मिशन, मागेल त्याला सौर कृषिपंप, पंधराव्या वित्त आयोगामार्फत मिळणारा निधी, लोकवर्गणी आणि सीएसआर फंडातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग करून गावाची विजेची गरज गावातच भागवण्यासाठी ही मोहीम आहे तसेच उपलब्ध योजना आणि निधीची कल्पक सांगड घालून ही गावे ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यात येणार आहेत.

शाळा, पथदिवे, पाणीपुरवठा योजनांसह घरेही साैरऊर्जेद्वारेसौरग्राम योजनेत गावातील घरे, शाळा ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा योजना, पथदिवे आणि इतर कामांसाठी लागणारी १०० टक्के वीज सौरऊर्जेद्वारे गावातच निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. हरित ऊर्जेच्या आधारे गाव उर्जा स्वयंपूर्ण होत असल्याने ही वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेने होत आहे. तसेच प्रत्येक घराच्या छतावर आता पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेतून गाव ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यासाठी १०० टक्के सौर ऊर्जा ग्रामयोजनेत सहभागी व्हावे. तसेच जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मिशन शाश्वत ग्रामपंचायत उपक्रमास भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद