शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

नव्या तंत्रज्ञानावर आधारित अवजारांचा वापर करावा : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

फलटण : ‘बीज प्रक्रिया, पेरणी प्रात्यक्षिक, बांधावर खतांची उपलब्धता यामधून कृषी खात्याने खरीप हंगाम पूर्व तयारीला सुरुवात केली आहे. ...

फलटण : ‘बीज प्रक्रिया, पेरणी प्रात्यक्षिक, बांधावर खतांची उपलब्धता यामधून कृषी खात्याने खरीप हंगाम पूर्व तयारीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानावर आधारित अवजारांचा वापर कृषी खात्याच्या मार्गदर्शनानुसार करावा,’ असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने ‘कृषी संजीवनी’ योजनेंतर्गत आगामी खरीप हंगामाचे पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या योजनेचा प्रारंभ फलटण तालुक्यातील रावडी येथे आमदार दीपक चव्हाण, सत्यजितराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी फलटण बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, आत्मा संचालक विनायक राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, सरपंच जगन्नाथ सुळ, उपसरपंच अनिल बोबडे, रामभाऊ कदम, बापूराव कर्वे, सतीश साडगे, सुरेश काकडे उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘फलटण तालुक्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये परतीच्या माॅन्सूनचा पाऊस होतो. फलटण रब्बीचा तालुका समजण्यात येत असला तरी अलीकडे गेल्या काही वर्षात निसर्ग चक्र पूर्णतः बदलून गेल्याने ऋतुचक्रही बदलले आहे. परिणामी खरीप व रब्बी हंगामही बदलल्याचे नमूद करीत बदलत्या परिस्थितीत शेतकरीवर्ग पाण्याची उपलब्धता पाहून पिके करीत आहेत.’

सत्यजितराजे म्हणाले, ‘शेतीतून अधिक आर्थिक लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केलेल्या सर्व पिकांचे एकरी उत्पादन वाढीला प्राधान्य देऊन शेती केल्याशिवाय शेती फायदेशीर होणार नाही. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी कोणत्याही हंगामात किंवा बिगर हंगामात पिके घेताना एकरी खर्च कमी कसा होईल आणि तरीही एकरी अधिक उत्पादन कसे घेता येईल याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करण्यात आली असून, काही फळांवर असलेली रोगराई सोडता बहुतांश शेतकऱ्यांना फळबागातून चांगले उत्पादन होत असले तरी मागणी नसल्याने या फळांतून फारसा समाधानकारक आर्थिक लाभ होत नसल्याने फळ प्रक्रिया उद्योगांची उभारणी केल्यास शेतकऱ्यांना समाधानकारक पैसा आणि बेरोजगार तरुणांना उद्योजक किंवा औद्योगिक क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करण्याची संधी निश्चित मिळेल.’

या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.