शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

नव्या तंत्रज्ञानावर आधारित अवजारांचा वापर करावा : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

फलटण : ‘बीज प्रक्रिया, पेरणी प्रात्यक्षिक, बांधावर खतांची उपलब्धता यामधून कृषी खात्याने खरीप हंगाम पूर्व तयारीला सुरुवात केली आहे. ...

फलटण : ‘बीज प्रक्रिया, पेरणी प्रात्यक्षिक, बांधावर खतांची उपलब्धता यामधून कृषी खात्याने खरीप हंगाम पूर्व तयारीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानावर आधारित अवजारांचा वापर कृषी खात्याच्या मार्गदर्शनानुसार करावा,’ असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने ‘कृषी संजीवनी’ योजनेंतर्गत आगामी खरीप हंगामाचे पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या योजनेचा प्रारंभ फलटण तालुक्यातील रावडी येथे आमदार दीपक चव्हाण, सत्यजितराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी फलटण बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, आत्मा संचालक विनायक राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, सरपंच जगन्नाथ सुळ, उपसरपंच अनिल बोबडे, रामभाऊ कदम, बापूराव कर्वे, सतीश साडगे, सुरेश काकडे उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘फलटण तालुक्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये परतीच्या माॅन्सूनचा पाऊस होतो. फलटण रब्बीचा तालुका समजण्यात येत असला तरी अलीकडे गेल्या काही वर्षात निसर्ग चक्र पूर्णतः बदलून गेल्याने ऋतुचक्रही बदलले आहे. परिणामी खरीप व रब्बी हंगामही बदलल्याचे नमूद करीत बदलत्या परिस्थितीत शेतकरीवर्ग पाण्याची उपलब्धता पाहून पिके करीत आहेत.’

सत्यजितराजे म्हणाले, ‘शेतीतून अधिक आर्थिक लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केलेल्या सर्व पिकांचे एकरी उत्पादन वाढीला प्राधान्य देऊन शेती केल्याशिवाय शेती फायदेशीर होणार नाही. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी कोणत्याही हंगामात किंवा बिगर हंगामात पिके घेताना एकरी खर्च कमी कसा होईल आणि तरीही एकरी अधिक उत्पादन कसे घेता येईल याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करण्यात आली असून, काही फळांवर असलेली रोगराई सोडता बहुतांश शेतकऱ्यांना फळबागातून चांगले उत्पादन होत असले तरी मागणी नसल्याने या फळांतून फारसा समाधानकारक आर्थिक लाभ होत नसल्याने फळ प्रक्रिया उद्योगांची उभारणी केल्यास शेतकऱ्यांना समाधानकारक पैसा आणि बेरोजगार तरुणांना उद्योजक किंवा औद्योगिक क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करण्याची संधी निश्चित मिळेल.’

या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.