शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

साताऱ्यात दुपारी वाढता पारा; सायंकाळी अवकाळीच्या धारा..! 

By नितीन काळेल | Updated: March 30, 2024 16:21 IST

पावसामुळे उकाडा कमी : बच्चे कंपनीची भिजून धमाल; शेतकऱ्यांपुढे चिंता निर्माण 

सातारा : सातारा शहरवासीयांना मागील सहा दिवसापासून कडक उन्हाळ्याला सामोरे जावे लागत असतानाच शनिवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी धारा पडल्या. यामुळे उकाडा कमी झाला. तर या पावसात भिजण्याचा आनंद बच्चे कंपनीने घेतला. मात्र, या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. सातारा शहराबरोबरच जिल्ह्याचा पारा मागील सहा दिवसांपासून ३८ ते ३९ अंशाच्या दरम्यान आहे. त्यातच तीन दिवसांपूर्वी सातारा शहराचे कमाल तापमान ३९.१ अंश नोंद झाले होते. हे या नवीन वर्षातील उच्चंकी तापमान ठरले होते. त्यातच सतत पारा वाढत असल्याने दुपारच्या सुमारास कडक उन्हाचा सामना सातारावासीयांना करावा लागत आहे. तसेच उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली आहे. असे असतानाच शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास सातारा शहराच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. जवळपास दहा मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते. तर पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरील वर्दळही कमी झाली होती. या पावसामुळे  हवेत गारवा निर्माण झाला होता. परिणामी उकाडा काही प्रमाणात कमी झाला. यामुळे सातारकर वासियांना थोडासा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अन्य काही भागातही अवकाळी पाऊस झाला आहे. मात्र, या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला होता. काही ठिकाणीच पाऊस झाला, पण शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागले. माण तालुक्यातील काळचौंडी येथे बेदाणा भिजून नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला. त्यातच सध्या माण, खटाव, फलटण, कोरेगावसह इतर तालुक्यातही रब्बी हंगामातील पीक काढणी आणि मळणी अजूनही सुरू आहे. त्यावरही या पावसाचा परिणाम होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानRainपाऊसFarmerशेतकरी