शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 18:41 IST

अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्देअवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरेखटाव तालुक्यातील पिकांची पाहणी

मायणी : अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.खटाव तालुक्यातील मायणी, कातरखटाव येते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ते शुक्रवारी तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. दुपारी तीन वाजता त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यानंतर येथील बागायतदार शिवाजी शामराव देशमुख यांच्या द्र्राक्षबागेची पाहणी केली. त्यांच्याबरोबर खासदार अरविंद सावंत, नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे, शेखर गोरे यांच्यासह जिल्हा व राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, ह्यसरकार स्थापन होईल न होईल, याचे मला काही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द निवडणुकीदरम्यान दिला आहे, तो पूर्ण करणारच आहे. मी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथे आलो आहे. यापूर्वी मी विदर्भ, मराठवाडा भागांमध्ये अवकाळीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. प्रत्येक भागात वेगवेगळी पिके घेतली जातात. त्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करत नाही, तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. त्यांच्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे.यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस पाटील प्रशांत कोळी यांच्यासह महसूल, कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.प्रत्येक भागात मदत केंद्रप्रत्येक भागातील शेतकऱ्यांची समस्या वेगळी असल्याने आम्ही प्रत्येक भागात मदत केंद्र उभे करणार आहे. याठिकाणी येऊन शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडव्यात, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.विमा कंपनीकडूनही फसवणूकअवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले असतानाच विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. खासगी विमा कंपनीकडूनही या भागातील ग्रामस्थांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSatara areaसातारा परिसर