शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रसिंहराजेंची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 21:52 IST

Shivendra Raje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालयात मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन कास बंदिस्त जलवाहिनी व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन दिले.

सातारा : ‘पालिकेची निवडणूक जवळ आल्याने खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्लीत निवेदने देऊन फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरू झाली आहे. विकासाची खोटी स्वप्ने दाखविण्याचे दिवस आता संपले असून, सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालयात मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन कास बंदिस्त जलवाहिनी व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन दिले. उदयनराजेंच्या या दिल्ली निवेदनावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रक काढून जोरदार टीका केली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, पालिका निवडणूक आली की मंजूर नसलेल्या, न होणाऱ्या आणि दुसऱ्याने केलेल्या कामांचे नारळ फोडायचे. 

मुंबई, दिल्लीवारी करून मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन द्यायचे आणि फोटोसेशन करून सातारकरांना भुलवायचे हे प्रकार जोमाने सुरू झाले आहेत. वास्तविक कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू झाल्यानंतर पालिकेने वाढीव जलवाहिनीचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, सातारकरांशी काहीही देणेघेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना फक्त पैसा आणि पैसा याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.

सातारा पालिकेला अक्षरश: लुटणारे आता निवडणूक आली की, निवेदन आणि फोटोसेशन करून विकासाची खोटी स्वप्ने रंगवत आहेत. ज्यावेळी निधीअभावी कास प्रकल्पाचे काम थांबले होते, त्यावेळीच वाढीव जलवाहिनीचा प्रस्ताव शासनाकडे सादर व्हायला हवा होता. पण, त्यावेळी यांना कशाचेच काहीही देणेघेणे नव्हते. हे आणि प्रशासन झोपा काढत होते. ज्यात पैसे आहेत त्यातच यांना रस असतो, हे सातारकरांना केव्हाच कळून चुकले आहे.

तुमच्या पापाचा घडा भरला...पाईपलाईनचे काम मंजूर व्हायला वर्ष लागणार, त्यानंतर काम सुरू होणार आणि पूर्ण कधी होणार? तोपर्यंत सातारकरांना कासच्या पाण्याचे स्वप्न फक्त बघतच बसावे लागणार आहे. धरणाची उंची वाढली, पाणीसाठाही वाढला पण सातारकरांना वाढीव पाणी मात्र मिळणार नाही हे पाप तुम्ही केले. आता तुमच्या पापाचा घडा भरला असून, सुज्ञ सातारकर तुम्हाला चांगला धडा शिकवतील, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे. 

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण