शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या मोर्चाचे नेतृत्व उदयनराजेंनी करावे

By admin | Updated: September 30, 2016 01:28 IST

काही संघटनांच्या बैठकीत ठराव : मागणीसाठी जलमंदिरमध्ये ठिय्या देण्याचा कार्यकर्त्यांकडून इशारा--महामोर्चापूर्वीचा सातारा

सातारा : सकल मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मोर्चे होईपर्यंत त्याबाबत निर्णय न झाल्यास मुंबईत ५ कोटींचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार उदयनराजे भोसले यांनी करावे, असा ठराव राज्यातील विविध संघटनांनी केल्याची माहिती विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्यभरातील विविध संघटनांचे प्रदेशाध्यक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी खासदार उदयनराजेंनी नेतृत्व न स्वीकारल्यास जलमंदिरात ठाण मांडण्याचा इशाराही दिला आहे.राजधानी साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबरला मराठा महामोर्चा होणार असून, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू आहे. या महामोर्चाच्या निमित्ताने समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून, त्यात मराठा समाजासाठी कार्य करणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. साताऱ्यातील महामोर्चापूर्वी राज्यभरातील विविध ३० ते ३५ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक साताऱ्यात झाली. यात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चानिमित्त असणाऱ्या मागण्यांबाबत शासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. मुंबईत होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व उदयनराजे यांनी करावे, असा ठरावही करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाषदादा जावळे, अशोक पाटील-कोपळेकर, तुषार काकडे, राजेंद्र गडकर, शैलेश सरकटे, अनिल साळुंखे, रेश्मा पाटील, धनाजी पाटील, रामेश्वर शिंदे, शिवाजी महाडिक, अनिल वाघ, दयानंद पाटील, राजेंद्र पाटील, विशाल सावंत, संतोष पाटील, महेश निंंबाळकर, सुनील मोरे आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठा महामोर्चामुळे नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे जयकुमार गोरे : माझा केवळ पाठिंबाच नव्हे तर मी मराठा समाजासोबतचसातारा : ‘संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. कोपर्डी प्रकरणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने समाज रस्त्यावर आला आहे. या समाजाच्या मनातील खदखद बाहेर पडत आहे. कुठलेही नेतृत्व नसताना समाजाने दाखविलेल्या एकीमुळे सर्वच नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे,’ असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.आमदार गोरे म्हणाले, ‘कोपर्डी प्रकरणामध्ये आत्तापर्यंत दोषारोपत्र दाखल होणे गरजेचे होते. मात्र, शासनाने यामध्ये खूपच विलंब केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा खटला जलद न्यायालयात घेऊन त्यांना तत्काळ फासावर लटकवा. मराठा समाजाची या कोपर्डी प्रकरणाच्या निमित्ताने मनातील खदखद बाहेर आली आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे, अशी माझीही मागणी आहे. आरक्षणाचे बिल पास होताना मी त्याचा साक्षीदार आहे. मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी मंत्रिमंडळात आघाडी शासनाच्या काळात केली होती. आत्ताही ही मागणी रास्त आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे, तसेच मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, ही सुद्धा प्रमुख मागणी आहे. या मागण्यांना माझा पाठिंबा आहेच, शिवाय मी मराठा समाजासोबतच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)