शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे, रामराजेंनी शिवस्वराज्य यात्रेकडे फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 05:10 IST

भाजपच्या कमळाची साताऱ्यातील राजेंना पडली भुरळ!

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराजे नाईक-निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्याला माहीत आहे. आता हे दोघेही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राजे मंडळींना अचानकपणे कमळाची भुरळ का बरं पडली असावी? या प्रश्नाने साताºयाच्या जनतेला भलतेच सतावले आहे. दोघांनीही राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरवली त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अधिक जोर आला आहे.

राष्ट्रवादी काँगे्रसची स्थापना १९९९ मध्ये झाली. तेव्हा सातारा जिल्'ातून दिवंगत लक्ष्मणराव पाटील व रामराजे नाईक-निंबाळकर या दोन नेत्यांनी पक्षाला मोठी साथ दिली. या दोघांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले प्राबल्य मिळवले. तर सहकारी संस्थाही आपल्या ताब्यात ठेवल्या. केंद्रात व राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या तरी सातारा जिल्ह्यावरील राष्ट्रवादीची राजकीय पकड कायम राहिली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. या भक्कम परिस्थितीतही ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे बुरुज ढासळू लागले आहेत. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

उदयनराजे भोसले यांचे पक्षात वाढत असलेले महत्त्व आणि आपल्या शब्दाला किंमत राहिली नसल्याची सल रामराजेंना होती. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्यासाठी हे कारण पुरेसे आहे. असे असतानाच उदयनराजे भोसले यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वेगळी खेळी खेळली आहे. रामराजे व शिवेंद्रसिंहराजे हे दोघे पक्षांतर्गत विरोधक पक्ष सोडून निघाले असताना उदयनराजेंना पक्षात मोठी संधी निर्माण झाली होती. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष शिवस्वराज्य यात्रा काढणार होता; निम्मा महाराष्ट्र या यात्रेने पालथा घातला तरी उदयनराजे यात्रेकडे फिरकले नाहीत. जिल्'ात चार ठिकाणी या यात्रेनिमित्त सभा झाल्या. त्या सभांकडेही उदयनराजेंनी पाठ फिरवली. साहजिकच, नुकतीच खासदारकीची झूल पांघरलेल्या उदयनराजेंनी अचानकपणे भाजपच्या दिशेने ‘यूटर्न’ घेण्यामागचे कारण शोधण्यात लोक गुंतले आहेत.

रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरवली. त्यांचे बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण हे दोघे शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावर हजर होते; परंतु रामराजेंची अनुपस्थिती नेतेमंडळींना बोचणारी ठरली. रामराजे हे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे. राष्ट्रवादीनेही त्यांना मोठी पदे बहाल केली. विधान परिषदेचे सभापतिपद त्यांना दिले. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक या प्रमुख संस्थांमध्ये रामराजेंच्या शब्दाला मान आहे, असे असताना हे सर्व वैभव सोडून रामराजे भाजपमध्ये का जात आहेत? हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सलत आहे.

सातारकरांना कोडेपक्षाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने मात्र सातारकरांना भलतेच कोड्यात टाकले आहे. राष्ट्रवादीत असताना दोघांच्यातही वारंवार खटके उडत होते. लोकसभा निवडणुकीतही रामराजेंनी उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये, अशी पक्षाकडे मागणी केली होती. तरीही उदयनराजेंना उमेदवारी दिली गेली. ते दीड लाख मताधिक्क्याने निवडूनही आले. आता पक्षाचा राजीनामा देणार म्हणजे हातातील खासदारकीही त्यांना सोडावी लागणार असल्याने सातारकरांना भलतेच कोडे पडले आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस