शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी विसर्ग वाढवला, पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू 

By नितीन काळेल | Updated: November 27, 2023 15:30 IST

पाण्याची मागणीही वाढणार असल्याने राजकीय वाकयुध्दही रंगू लागले

सातारा : कोयना धरणातूनसांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी दोन टीएमसी पाणी सोडण्यात येत असून आता पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याचा वेग वाढून २१०० क्यूसेकवर गेला आहे. तर सांगलीतील सिंचनासाठी दोन महिन्यांत तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आलेले आहे.कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे.या धरणातील पाण्यावर सिंचनाच्या तीन मोठ्या पाणी योजना अवलंबून आहेत. सिंचनासाठी सर्वाधिक पाणी सांगलीला जाते. यावर्षी कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला. परिणामी धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. पाणीसाठा ९४ टीएमसीपर्यंत गेलेला. त्यामुळे यंदा वीजनिर्मिती आणि सिंचनाच्या पाणी तरतुदीत कपात होणार असा अंदाज होता. त्यानुसार नियोजन प्रस्तावित केलेले आहे. त्याचबरोबर कमी पावसामुळे राज्यात दुष्काळी स्थिती आहे. सांगली जिल्ह्यातही दुष्काळी स्थिती गडद होत चालली आहे. पिण्याच्या पाणी योजनांसह सिंचन पाण्यावर परिणाम झालेला आहे. सिंचनासाठी पाणी मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाणी मागणी झाली होती. यासाठी शनिवारपासून कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते. मात्र, सिंचनासाठी पाण्याची आणखी मागणी वाढल्याने पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू करण्यात आले. त्यामुळे कोयनेतून आता २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सांगलीसाठी सुरू झाला आहे. एकूण दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. तर सांगलीतील सिंचनासाठी यापूर्वी दोनवेळा पाणी सोडण्यात आले होते.

धरणात ८५ टीएमसी पाणीसाठा..कोयना धरणातील पाणीपातळी कमी होत चालली आहे. सध्या ८५ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी पावसाळ्यापर्यंतच्या सहा महिन्यांसाठी पुरवायचे आहे. त्यातच पाण्याची मागणीही वाढणार असल्याने राजकीय वाकयुध्दही रंगू लागले आहे. उन्हाळ्यात तर पाण्याचे संकट आणखी गहिरे होण्याची भीती आहे. त्याचबरोबर कोयनेप्रमाणचे उरमोडी धरणातील पाण्याबाबतही वाद वाढत चालले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी