शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विजेच्या धक्का बसून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; तीन मुले सुदैवाने बचावली, वाई तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 22:11 IST

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरगावच्या हद्दीत कुंभारखाणी शिवारात वाघाचा मळा नावाचे शिवार आहे.

भुईंज : शिरगाव, ता.वाई येथे वाहत्या पाण्यात विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. यामध्ये विजेचा धक्का बसून, दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे शिरगाववर शोककळा पसरली आहे. साहिल लक्ष्मण जाधव (वय ९), प्रतीक संजय जाधव (वय १५, दोघेही रा.शिरगाव, ता.वाई) अशी विजेचा धक्का बसून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरगावच्या हद्दीत कुंभारखाणी शिवारात वाघाचा मळा नावाचे शिवार आहे. या शिवारात साहिल जाधव आणि प्रतीक जाधव हे दोघे शेळी चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते ओढ्यातून जात होते. मात्र, महावितरणची लघुदाबाची गेलेली तार तुटून ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहात पडली होती. त्यामुळे पाण्यात विजेचा प्रवाह सुरू होता. या विजेच्या प्रवाहाचा दोघांना जोरदार धक्का बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत अन्य तीन मुले होती, परंतु त्या दोघांना शाॅक लागल्याचे समजताच, ती मुले सावध झाली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. केवळ दैव बलवत्तर म्हणून इतर तीन मुलांची यातून सुटका झाली आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर दोन्ही मुलांना तातडीने भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते, परंतु त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे यांच्यासह इतर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकारानंतर महावितरणचे भुईंज शाखा अधिकारी राजेंद्र रासकार यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तुटलेल्या तारेची दुरुस्ती केली. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे शिरगाव आणि पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर