शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघांचे अपहरण, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:07 IST

मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळील कोल्हापूर नाक्यावर आणून सोडले

कराड : कराडजवळील ओगलेवाडीतून दोघा युवकांचे प्रेमविवाह केल्याच्या रागातून चौघांनी अपहरण करून त्यांना शिराळा तालुक्यात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळ पुन्हा आणून सोडत पोलिसांत तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिल्याचे शहर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे.आदिनाथ भाऊ गुरव (रा. हजारमाची, ता. कराड) याने याप्रकरणी अनिकेत अशोक माळी, अविनाश अशोक माळी, अजिंक्य अशोक माळी या तिघांसह अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.आदिनाथ गुरव हा सेंट्रिंग व्यवसाय करतो. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास संदेश सतीश ताटेला करवडी फाटा येथून आण, असा फोन सनी सूर्यवंशी यांनी आदिनाथ गुरव याला केला होता. त्यानंतर करवडी फाटा परिसरात आदिनाथ गुरव गेल्यानंतर अचानकपणे एका चारचाकीतून संशयित उतरले आणि त्यांनी संदेश ताटे याला शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी आदिनाथ गुरव याने संदेश ताटे याला सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आदिनाथ याला प्रेमविवाह केल्याच्या रागातून जबर मारहाण केली. मारहाणीनंतर संदेश ताटे आणि आदिनाथ गुरव या दोघांना चारचाकीत घालून शिराळा तालुक्यातील खेड गावाच्या परिसरात घेऊन गेले.गाडीत घालताना ताटे याला चाकूची मूठ मारण्यात आली. तसेच खेड येथे लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळील कोल्हापूर नाक्यावर आणून सोडत पोलिसात तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिली असल्याचे आदिनाथ गुरव यांनी तक्रारीत म्हटले आहे.