शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नोकरी सोडून फुलविली स्ट्रॉबेरी शेती!, साताऱ्यातील 'त्या' शेतकऱ्याला दिवसाआड पाच-सहा हजारचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 15:50 IST

सहा गुंठ्यात साठ हजार खर्च करून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न

सागर चव्हाणपेट्री : कास पठार परिसरातील चिकणवाडी, कुसुंबी (ता. जावळी) येथील तुकाराम चिकणे यांनी खासगी पवन चक्की ऑपरेटर नोकरी सोडून सहा गुंठ्यात पाच हजार रोपांची स्ट्रॉबेरीची शेती फुलविली. नवनवीन यशस्वी प्रयोगातून स्ट्रॉबेरी फळाचे भरघोस उत्पादन प्राप्त होऊन परिसरातील बाजारपेठेसह पुणे, मुंबईत विक्री करत दिवसाआड पाच सहा हजार रुपयांचा फायदा होत आहे.नोकरी नको एखादा व्यवसाय बरा, नोकरी सोडून आपल्याला काहीतरी करायचं आहे. असे विचार अनेकांना भांबावून सोडतात. सगळे ठीक आहे अनेकजण असा विचार करतात. मात्र जेव्हा नोकरी सोडायचा विचार येतो त्यावेळी मात्र ते दोन पावलं मागे येतात. अनेकांना त्यांचा संसार असतो. पाठीमागे त्यांचा प्रपंच असतो. आता नोकरी सोडून काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचं म्हटलं अन् त्यात अपयश आल्यावर कुटुंबाचे काय? आपल्या भविष्याच काय ? असा विचार सुद्धा बरोबर आहे. पण थोडा हा धाडसाचा प्रश्न आहे. ज्यांना आपल्या कामावर विश्वास आहे. ते असे निर्णय घेऊन यशस्वी देखील होतात.अगदी याचप्रमाणे तुकाराम चिकणे या ध्येयवेड्या शेतकऱ्याने नोकरी नाकारून आपले नवे अस्तित्व निर्माण केले. यशामागे त्यांना साथ होती त्यांच्या पत्नीची. त्यांचा प्रेरणादायी प्रयोग नवी ऊर्जा निर्माण करणारा असून वायरमनची नोकरी सोडून शेतीत नवनवीन यशस्वी प्रयोग केले. एवढेच नव्हे तर त्यातून केलेली कमाई देखील वाखाणण्याजोगी आहे. सहा गुंठ्यात साठ हजार खर्च करून दोन लाखांचे उत्पन्न मिळविण्यात यश आले.सहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली. डोंगरमाथ्यावरील वातावरणात लागवड करून यशस्वी उत्पादन घेत आहेत. शेतीची मशागत करून शेणखत, जीवांमृत वापरले. चार फुटांवर बेड तयार केले. कीटकनाशक, औषध फवारणी, ठिबक सिंचनाचा वापर केला. रोपांची लागवड केल्यानंतर ३० दिवसांनी फुले येऊन ५५ दिवसात फळास सुरुवात झाली. दहाव्या दिवशी फळ परिपक्व होऊ लागले.

लाल चुटूक रंग अन् चवीला गोडवाफळांचा रंग गडद लाल असून मोठ्या फळांचे वजन दीडशे ग्रॅम पर्यंत आहे. झाडाला पिकल्याने गोडवा जास्त असून शंभर रूपयांना एक बॉक्स प्रमाणे आसपासच्या जिल्ह्यात तसेच मुंबई, पुण्यात विक्री होत असल्याचे समाधान मिळत आहे. भिलार मधील नारायण ढेबे मित्राकडून मार्गदर्शन मिळाले.

जैविक तसेच कीटकनाशक औषध फवारणी केली. ३५ दिवसांत फ्लॉवरींगमुळे उत्साह निर्माण होऊन माझ्यासाठी नवीन पीक होते. ६५ दिवसानंतर फळ येण्यास सुरुवात झाल्यानंतर आनंद निर्माण होऊन यशस्वी प्रयोगाचा अभिमान वाटतो. भविष्यात चांगला फायदा होईल. - तुकाराम चिकणे,

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी