शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

दिल्ली, मुंबईतीलच खरे देशद्रोही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:09 PM

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांना आणि जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता मिळविली. सत्तेनंतर त्यांनी काहीच केले नाही. उलट कारण नसताना पाकिस्तानमधून कांदा आयात करून शेतकºयांचे दर पाडले. आज देशाच्या सिमाही सुरक्षित नाहीत. त्यामुळे दिल्ली व मुंबईत बसलेलेच खरे देशद्रोही असून, ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांना आणि जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता मिळविली. सत्तेनंतर त्यांनी काहीच केले नाही. उलट कारण नसताना पाकिस्तानमधून कांदा आयात करून शेतकºयांचे दर पाडले. आज देशाच्या सिमाही सुरक्षित नाहीत. त्यामुळे दिल्ली व मुंबईत बसलेलेच खरे देशद्रोही असून, ते जनतेची फसवणूक करीत आहेत,’ असा घणाघात खासदार राजू शेट्टी यांनी केला.येथील संत सावता महाराज मंदिरामध्ये फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित जाहीर शेतकरी मेळाव्यात खासदार शेट्टी बोलत होते.यावेळी मुंबई मार्केट कमिटीचे माजी सभापती डॉ. विजयराव बोरावके, स्वाभिमानीचे प्रदेश युवा अध्यक्ष हंसराज वडगुले, जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, दशरथ फुले, अ‍ॅड. नरसिंह निकम, राजेंद्र भगवान, डॉ. रवींद्र घाडगे, मोरेश्वर जाधव, राजेंद्र ढवण-पाटील, योगेश पांडे, सतीश काकडे, प्रकाश भोंगळे, हणमंतराव शिंदे आदी उपस्थित होते.खासदार शेट्टी म्हणाले, ‘स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अमंलबजावणी करू, शेतकºयांच्या उत्पादीत मालाला चांगला भाव देऊ, असे आश्वासन देत भाजप सरकार केंद्रात आले. तत्पूर्वी, गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ते राज्य प्रगतीपथावर नेले होते. त्यामुळे आम्हीही लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला. बहुमताने हे सरकार सत्तेवर आले. मात्र, गेल्या तीन वर्षांत त्यांनी शेतकºयांसाठी काहीच केले नाही.’‘निवडणुकीपूर्वी पाकिस्तानच्या नावाने बोलणाºयांनी सत्तेवर येताच पाकिस्तानमधून कांद्याची आवक करून भारतातील शेतकºयांचे दर कोसळवले. या सरकारच्या काळातच देशात आणि राज्यात सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. दिल्ली व मुंबईत बसलेले खरे देशद्रोही आहेत,’ असेही शेट्टी यावेळी म्हणाले.खासदार शेट्टी पुढे म्हणाले, ‘शेतकºयांचा सातबारा कोरा व्हावा, स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी आदींबाबत आमचा लढा संपूर्ण भारतात सुरू असून, देशभरातील १२६ संघटनांना एकत्र करून आम्ही संघर्ष सुरू केला आहे. आमच्या संघर्ष यात्रेवर टीका करणाºयांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, कर्जमाफीचे नियम अत्यंत कडक व कठीण असल्याने शेतकºयांचा काहीच फायदा होणार नाही. शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत. केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे. हिवाळी अधिवेशनाच्यावेळी दि. २० नोव्हेंबर रोजी जंतरमंतर दिल्ली येथे मोर्चा आणि आंदोलन उभारणारआहे. त्यामुळे शासनाला नक्कीच जाग आल्याशिवाय राहणार नाही.’कर्जमाफी म्हणजे टकल्याला फुकटात तेल...‘आमच्या तीव्र आंदोलनाची आणि शेतकºयांच्या आक्रोशाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात शेतकºयांसाठी ३४ हजार कोटींची मोठा गाजावाजा करीत कर्जमाफी जाहीर केली. मात्र, यासाठी निकष व अटी कठीण ठेवल्या. यामुळे फायदा कोणालाच होणार नाही. ही कर्जमाफी म्हणजे टक्कल पडलेल्या माणसाला फुकटात तेल व कंगवा देण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी केला. त्याचा काही उपयोग नाही. शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत,’ अशी टीकाही खासदार राजू शेट्टी यांनी केली.सातारा जिल्ह्यात संघटनेत व्यापक फेरबदल...सातारा जिल्ह्यातील पक्ष व संघटनवाढीकडे आपण आता लक्ष देणार असून, शेतकºयांच्या प्रश्नांवर जे लढा उभारणार नाहीत त्यांनी घरी बसावे. काहीही कामे न करता नुसता बिल्ला लावणाºयांची आम्हाला गरज नाही, असेही ते म्हणाले.