शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चारा-पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने मेंढपाळांचे कोकणात स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:21 IST

अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे

ठळक मुद्देवाई तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढलीउन्हाच्या तीव्रतेमुुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटले

वाई : अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरे कसे जगवायची? हा प्रश्न सतावत आहे. या भागातील मेंढपाळ कोकणात स्थलांतर करू लागले आहेत.

या भागातच ओढे-जोड प्रकल्प राबविण्यात आले आहेत. परंतु दुष्काळ निवारण्यासाठी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाया गेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर काही भागात करण्यात येत आहे; पण मेंढ्या पाळणाºयांना पाण्याचा उपयोग होत नाही. ओढे, नाले, तलाव कोरडे पडल्याने प्राण्यांना पाणी पाजणे कठीण होते. 

वाई तालुक्याच्या पूर्व भागातील व खंडाळा, लोणंद, फलटण व उत्तर कोरेगाव परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांसह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. पाणी-चाºयासाठी कोयनानगर परिसरात आसरा घेणार असल्याचे मेंढपालांकडून समजले. ही अतिशय गंभीर बाब असून, मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

वाईच्या पूर्व भागात दुष्काळाची भीषणता जास्त पाहावयास मिळते. या भागात पावसाचे प्रमाण नेहमीच अत्यल्प असते. त्यात या परिसरात जलशिवारची कामेही शासनाकडून प्रभावीपणे न राबविल्याने या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भटकंती करणाºयाला याची मोठी झळ पोहोचते. या भागात कोणताही आधार शिल्लकच न राहिल्याने स्थलांतर केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, हे ओळखूनच मेंढपाळांनी स्थलांतराचा मार्ग निवडल्याचे चित्र आहे. कोयना परिसरात पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटला असलातरी चाºयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करावीदुष्काळ निवारण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. जर जनावरांसाठी शासन छावण्या उभारणार असेल तर त्यावेळी शेळ्या-मेंढ्यांचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर