शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

चारा-पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने मेंढपाळांचे कोकणात स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:21 IST

अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे

ठळक मुद्देवाई तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढलीउन्हाच्या तीव्रतेमुुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटले

वाई : अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरे कसे जगवायची? हा प्रश्न सतावत आहे. या भागातील मेंढपाळ कोकणात स्थलांतर करू लागले आहेत.

या भागातच ओढे-जोड प्रकल्प राबविण्यात आले आहेत. परंतु दुष्काळ निवारण्यासाठी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाया गेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर काही भागात करण्यात येत आहे; पण मेंढ्या पाळणाºयांना पाण्याचा उपयोग होत नाही. ओढे, नाले, तलाव कोरडे पडल्याने प्राण्यांना पाणी पाजणे कठीण होते. 

वाई तालुक्याच्या पूर्व भागातील व खंडाळा, लोणंद, फलटण व उत्तर कोरेगाव परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांसह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. पाणी-चाºयासाठी कोयनानगर परिसरात आसरा घेणार असल्याचे मेंढपालांकडून समजले. ही अतिशय गंभीर बाब असून, मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

वाईच्या पूर्व भागात दुष्काळाची भीषणता जास्त पाहावयास मिळते. या भागात पावसाचे प्रमाण नेहमीच अत्यल्प असते. त्यात या परिसरात जलशिवारची कामेही शासनाकडून प्रभावीपणे न राबविल्याने या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भटकंती करणाºयाला याची मोठी झळ पोहोचते. या भागात कोणताही आधार शिल्लकच न राहिल्याने स्थलांतर केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, हे ओळखूनच मेंढपाळांनी स्थलांतराचा मार्ग निवडल्याचे चित्र आहे. कोयना परिसरात पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटला असलातरी चाºयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करावीदुष्काळ निवारण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. जर जनावरांसाठी शासन छावण्या उभारणार असेल तर त्यावेळी शेळ्या-मेंढ्यांचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर