शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

पुलाखाली गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:30 AM

कुत्र्यांची नसबंदी कुडाळ : पाचगणी येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त जेनी स्मित ॲनिमल वेल्फेअर ट्रस्टने केला आहे. येथील सुमारे १४० ...

कुत्र्यांची नसबंदी

कुडाळ : पाचगणी येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त जेनी स्मित ॲनिमल वेल्फेअर ट्रस्टने केला आहे. येथील सुमारे १४० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे, ही ट्रस्ट गेली दहा वर्षांपासून भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांचे संरक्षण करत आहे. पाचगणी महाबळेश्‍वर परिसरात भटक्या कुत्र्यांची प्रमाण वाढले होते..

नागझरीत वणवा

कोरेगाव : नागझरी (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीवर भीषण वणवा लागला. मात्र कोरेगाव वनविभागाच्या सतर्कतेमुळे आटोक्यात आला. अन्यथा साडेनऊ हेक्टरवरील जंगलातील पशुपक्ष्यांचा निवारा, नैसर्गिक साधन संपत्ती जळून खाक झाली असती.

कोबी झाला स्वस्त

सातारा : कमी कालावधीत जादा पैसा मिळतो, या आशेवर अलीकडे शेतकरी भाजीपाला, पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याकडे वळले आहेत. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यात कोबीचा दर तर एक रुपया किलोवर आला आहे. त्यामुळे कोबी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे.

एसटी सेवा पूर्ववत

सातारा : कोरोना कमी झाल्याने कॉलेज, महाविद्यालये पूर्ववत सुरू होत आहेत. विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सीसीटीव्हीची गरज

सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकातील प्रतीक्षालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मात्र एकाच वेळी दोन-तीन लाइनमध्ये गाड्या लावलेल्या असतात. त्यामुळे अनेक भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत नाहीत. त्यामुळे कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मास्कला मागणी

सातारा : जिल्ह्यात आता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाले आहेत. शाळेत मुलांची गर्दी वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे मुलांना दप्तरासोबत पाण्याची बॉटल तसेच सॅनिटायझर दिले जात आहे. त्याचप्रमाणे मास्क घेतले जात आहेत. त्यामुळे मागणी वाढत आहे.

पाण्याची टंचाई

खटाव : सतत भेडसावणार्‍या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने १९७२च्या दुष्काळात मांजरवाडी शिवारात गव्हल आणि पवारवस्तीनजीक अशा दोन हजार तलावांची निर्मिती केली. मात्र या तलावांना सुरुवातीपासून गळतीचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. त्यामुळे तलाव महिन्याभरात कोरडे पडत आहे.

ओढ्यावर अतिक्रमणे

सातारा : पालिकेच्या हद्दवाढीत विलासपूर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. भागातील प्लॉटधारकांनी अनधिकृत बांधकामे केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या परिसरातील रहदारी वाढल्याने आता पालिकेने अनधिकृत बांधकामे पाडून मुख्य रस्ते मोठे करण्याची गरज आहे.