शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

पर्यटकांच्या आवडत्या गावातली मंडळीच गेली पर्यटनाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:03 AM

सातारा : जगभरातील लाखो पर्यटक जागतिक दर्जाचं पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर भेटी देऊन येथील पर्यटनाचा आनंद लुटतात. मात्र, महाबळेश्वरवासीय देखील पर्यटनप्रेमी आहेत.

ठळक मुद्दे♦ पाचगणीला दरवर्षी सुमारे दहा लाखांहून अधिक पर्यटक ♦ काहीजण वारासणी, शिमला, कुल्लू मनाली, उटी, म्हैसूर या स्थळांना भेटी♦स्थानिक नागरिकही सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर

सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जगभरातील लाखो पर्यटक जागतिक दर्जाचं पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर भेटी देऊन येथील पर्यटनाचा आनंद लुटतात. मात्र, महाबळेश्वरवासीय देखील पर्यटनप्रेमी आहेत. येथील स्थानिक नागरिक फिरायला कुठे जातातं? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. सध्या पर्यटनाचा हंगाम मंदावल्याने महाबळेश्वरवासीय तिरूपती, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर अन् अष्टविनायकाच्या दर्शनाला घराबाहेर पडले असून युवावर्गाचे कोकण, गोवा हे आवडते ‘डेस्टीनेशन’ आहे.महाराष्ट्राची चेरापुंजी, थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीला दरवर्षी सुमारे दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. उन्हाळ्यात व दिवाळीत याठिकाणी पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहते. मात्र, पावसाळ्यात पर्यटकांना हंगाम पूर्णपणे ओसरतो.देशी-विदेशी पर्यटक ज्याप्रमाणे पर्यटनासाठी महाबळेश्वरला येतात त्याचप्रमाणे महाबळेश्वरवासीय देखील ‘पर्यटक’ आहेत. पावसाळा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकही सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. तिरूपती, शिर्डी, अष्टविनायक, शनी शिंगणापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर ही स्थानिक नागरिकांची आवडती ठिकाणे असून अनेकजण याठिकाणी देवदर्शनासाठी जात आहेत. युवा वर्गाचे कोकण, गोवा हे आवडते पर्यटनस्थळ असून युवक मोठ्या संख्येने ‘ट्रीप’चे आयोजन करून कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.केरळ, वाराणसीलाही पसंतीमहाबळेश्वरचा पाऊस पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मात्र, स्थानिकांना या पावसाचा अपु्रव वाटत नाही. त्यामुळे अनेक हौशी नागरिक केरळच्या वैविध्यपूर्ण पावसाची मजा लुटण्यासाठी केरळला भेट देऊन पर्यटनाची सैर करीत आहेत. तर काहीजण वारासणी, शिमला, कुल्लू मनाली, उटी, म्हैसूर या स्थळांना भेटी देत आहेत.कर्मचाºयांची पावसाळी सुटी फक्त कुटुंबासोबतमहाबळेश्वर, पाचगणीतील हॉटेलची संख्या हजारोंच्या घरात आहे. ग्रामीण भागातील अनेक युवक या हॉटेल्समध्ये काम करतात. पावसामुळे बहुतांश हॉटेल बंद झाल्याने कर्मचाºयांनाही ‘पावसाळी सुटी’ मिळली आहे. वर्षातून एकदाच सलग दीड-दोन महिने सुटी मिळत असल्याने कर्मचारी आपल्या कुटुंबियांसमवेत सुटीचा आनंद लुट आहेत.पावसाळ्यात महाबळेश्वरला येणाºया पर्यटकांची संख्या अत्यल्प असते. त्यामुळे अनेक हॉटेल्स व व्यवसाय बंद असतात. या कालावधीत आम्ही दरवर्षी फॅमिली ट्रीपचे आयोजन करतो. यंदा कोकणाच्या निसर्गसौंदर्यांचा आनंद लुटला तर गोव्याचा अल्याददायक वातावरणाचाही.- प्रमोद जेधे, स्थानिक नागरिकदेवदर्शनबालाजी, तुळजापूर, कोल्हापूर, अष्टविनायक, शिर्डी, पंढरपूर, शनी शिंगणापूररोप वे...वारासणी, उटी, म्हैसूर, कुल्लू मनाली, केरळ, शिमलासागर किनाराकोकण,गोवा,हैद्राबाद