शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

टोमॅटोच्या अकरा हजार रोपांची पाईपमध्ये लागण : कोपर्डेत शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:44 IST

कोपर्डे हवेली : उन्हाळी हंगामातील टोमॅटोला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. वाढत्या तापमानामुळे रोपे वाळून जाणे, करपा पडणे, तांबोरा, मूळ कुजवा आदींचा प्रभाव पिकांवर पडू लागतो.

ठळक मुद्देरोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लढवली शक्कल

शंकर पोळ।कोपर्डे हवेली : उन्हाळी हंगामातील टोमॅटोला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. वाढत्या तापमानामुळे रोपे वाळून जाणे, करपा पडणे, तांबोरा, मूळ कुजवा आदींचा प्रभाव पिकांवर पडू लागतो. हे रोखण्यासाठी कोपर्डे हवेली येथील शेतकरी बजरंग चव्हाण यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या संकटावर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांनी दीड एकर क्षेत्रावर अकरा हजार टोमॅटोच्या रोपांची लागण करण्यासाठी पाईपचा वापर केला.

इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामातील टोमॅटोच्या पिकाला संकटाचा सामना करावा लागतो. पीक चांगले आणण्याचे शेतकºयांसमोर आव्हान असते. त्यासाठी शेतकरी आपल्याला शेतात विविध आधुनिक पद्धतीचे प्रयोग करतो. कोपर्डे हवेलीतील चव्हाण यांनी असाच एक प्रयोग अमलात आणला आहे.बजरंग चव्हाण हे अनेक वर्षांपासून टोमॅटोचे शेतात उत्पादन घेतात. ते आपल्या शेतात सतत नवनवीन प्रयोग करत असतात. यंदा त्यांनी दीड ऐकर क्षेत्रावर टोमॅटो पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी अकरा हजार रोपांची लागण करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रत्येक रोपांना त्या पीव्हीसी पाईपमध्ये लावण्याचे ठरविले. त्यांनी अकरा हजार पीव्हीसी पाईपचा वापर लावलेल्या रोपांमध्ये केला आहे. पाईपची उंची अडीच इंची असून, गोलकार पाईप दोन इंची आहे. त्यामध्ये रोपांची लागण केली. एक इंच पाईप जमिनीत खोल मातीत रुतवली. सरीतील अंतर सहा फुटांचे आहे. संपूर्ण सरीच्या भुंड्यावर मल्चिंग पेपरचा वापर केल्याने तणाचा बंदोबस्त होणार आहे. रोपांना पाणी देण्यासाठी ड्रीपचा वापर केला आहे.

त्यांना पाईपचा वापर करून त्यांना रोपाची मर टाळता येण्यात यश मिळाले आहे. तसेच उष्णतेपासून रोपांचा बचाव होत आहे. मूळ कुजवा, करपा आदी रोगांपासून पिकांची मुक्तता होत असल्याने पिकांची वाढ जोमदार झाल्याचे दिसत आहे. ड्रीपमधून पिकाला पाणी मिळत असल्याने पाण्याचा आणि खताचा मात्रा नियोजन पद्धतीने देण्यातते यशस्वी झाले आहेत. पाच फुटापर्यंत रोपाची वाढ होणार आहे. रोपांची सुरळीत वाढ झाल्यानंतर पाईप काढण्यात येणार असून, रोपांना यांत्रिक पध्दतीने मातीची भर लावली जाते. त्यांना एक लाख तीस हजार रुपये उत्पादन खर्च येणार आहे.शेतीत व्यावसायिक पद्धतीचा वापरदिवसेंदिवस शेतकरी व्यावसायिक पध्दतीने शेती करू लागलेत. मल्चिंग पेपरचा वापर, ड्रीपमधून पाणी देणे आदी गोष्टींचा वापर ते करू लागले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात मजुरांचा वापर खर्च कमी होत आहे. तर उन्हाचा रोपांच्यावर परिणाम होऊ नये म्हणून आता तर चक्क रोपांची लागण पाण्याच्या पाईपमध्येच करू लागले आहेत.उन्हाळी टोमॅटोची बाग आणणे फार मोठे जिकिरीचे ठरत आहे. त्यामध्ये लहान रोपांची मर आणि रोगाचा प्रादूर्भाव हटविणे कठीणच. त्यासाठीच पाईपातच रोपांची लागण केली आहे. त्यामुळे मर टाळता आली असून, रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे.- बजरंग चव्हाण, टोमॅटो उत्पादक शेतकरी, कोपर्डे हवेली

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी