शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

टोमॅटोच्या अकरा हजार रोपांची पाईपमध्ये लागण : कोपर्डेत शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:44 IST

कोपर्डे हवेली : उन्हाळी हंगामातील टोमॅटोला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. वाढत्या तापमानामुळे रोपे वाळून जाणे, करपा पडणे, तांबोरा, मूळ कुजवा आदींचा प्रभाव पिकांवर पडू लागतो.

ठळक मुद्देरोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लढवली शक्कल

शंकर पोळ।कोपर्डे हवेली : उन्हाळी हंगामातील टोमॅटोला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. वाढत्या तापमानामुळे रोपे वाळून जाणे, करपा पडणे, तांबोरा, मूळ कुजवा आदींचा प्रभाव पिकांवर पडू लागतो. हे रोखण्यासाठी कोपर्डे हवेली येथील शेतकरी बजरंग चव्हाण यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या संकटावर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांनी दीड एकर क्षेत्रावर अकरा हजार टोमॅटोच्या रोपांची लागण करण्यासाठी पाईपचा वापर केला.

इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामातील टोमॅटोच्या पिकाला संकटाचा सामना करावा लागतो. पीक चांगले आणण्याचे शेतकºयांसमोर आव्हान असते. त्यासाठी शेतकरी आपल्याला शेतात विविध आधुनिक पद्धतीचे प्रयोग करतो. कोपर्डे हवेलीतील चव्हाण यांनी असाच एक प्रयोग अमलात आणला आहे.बजरंग चव्हाण हे अनेक वर्षांपासून टोमॅटोचे शेतात उत्पादन घेतात. ते आपल्या शेतात सतत नवनवीन प्रयोग करत असतात. यंदा त्यांनी दीड ऐकर क्षेत्रावर टोमॅटो पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी अकरा हजार रोपांची लागण करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रत्येक रोपांना त्या पीव्हीसी पाईपमध्ये लावण्याचे ठरविले. त्यांनी अकरा हजार पीव्हीसी पाईपचा वापर लावलेल्या रोपांमध्ये केला आहे. पाईपची उंची अडीच इंची असून, गोलकार पाईप दोन इंची आहे. त्यामध्ये रोपांची लागण केली. एक इंच पाईप जमिनीत खोल मातीत रुतवली. सरीतील अंतर सहा फुटांचे आहे. संपूर्ण सरीच्या भुंड्यावर मल्चिंग पेपरचा वापर केल्याने तणाचा बंदोबस्त होणार आहे. रोपांना पाणी देण्यासाठी ड्रीपचा वापर केला आहे.

त्यांना पाईपचा वापर करून त्यांना रोपाची मर टाळता येण्यात यश मिळाले आहे. तसेच उष्णतेपासून रोपांचा बचाव होत आहे. मूळ कुजवा, करपा आदी रोगांपासून पिकांची मुक्तता होत असल्याने पिकांची वाढ जोमदार झाल्याचे दिसत आहे. ड्रीपमधून पिकाला पाणी मिळत असल्याने पाण्याचा आणि खताचा मात्रा नियोजन पद्धतीने देण्यातते यशस्वी झाले आहेत. पाच फुटापर्यंत रोपाची वाढ होणार आहे. रोपांची सुरळीत वाढ झाल्यानंतर पाईप काढण्यात येणार असून, रोपांना यांत्रिक पध्दतीने मातीची भर लावली जाते. त्यांना एक लाख तीस हजार रुपये उत्पादन खर्च येणार आहे.शेतीत व्यावसायिक पद्धतीचा वापरदिवसेंदिवस शेतकरी व्यावसायिक पध्दतीने शेती करू लागलेत. मल्चिंग पेपरचा वापर, ड्रीपमधून पाणी देणे आदी गोष्टींचा वापर ते करू लागले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात मजुरांचा वापर खर्च कमी होत आहे. तर उन्हाचा रोपांच्यावर परिणाम होऊ नये म्हणून आता तर चक्क रोपांची लागण पाण्याच्या पाईपमध्येच करू लागले आहेत.उन्हाळी टोमॅटोची बाग आणणे फार मोठे जिकिरीचे ठरत आहे. त्यामध्ये लहान रोपांची मर आणि रोगाचा प्रादूर्भाव हटविणे कठीणच. त्यासाठीच पाईपातच रोपांची लागण केली आहे. त्यामुळे मर टाळता आली असून, रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे.- बजरंग चव्हाण, टोमॅटो उत्पादक शेतकरी, कोपर्डे हवेली

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी