शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आधी सुविधा मगच मिळणार टोलचा मेवा : पवनजित माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:02 IST

रस्ता चांगला केला तर टोल द्यायला कोणालाच काहीच वाटणार नाही. सुविधेशिवाय टोल घेणं हा खंडणीचाच प्रकार वाटतोय. - पवनजित माने

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद == टोल फ्री... होल फ्री... झोल फ्री ची साद

प्रगती जाधव-पाटील ।वाहन चालवताना रस्त्यावर किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने टोल फ्री, होल फ्री, झोल फ्री अशी अनोखी मोहीम फेसबुकच्या माध्यमातून गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. या मोहिमेत साताऱ्यातील पवनजित माने याने पुढाकार घेतला आहे. टोलमुक्त रस्त्यांची हाक देणा-या पवनजितने या मोहिमेविषयी संवाद साधला ...

प्रश्न : या मोहिमेची सुरुवात कशी झाली आणि पुढील स्वरुप कसे आहे?उत्तर : सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांतून नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्यांमध्ये रस्त्यांची दुर्दशा या अनुषंगाने कायम चर्चा व्हायची. कष्टानं कमावलेले पैसे पात्रता नसलेल्या रस्त्यासाठी टोलच्या स्वरुपात का भरायचे? असा प्रश्न अनेकांना पडला. याविषयी आम्ही एकत्र चर्चा करत असतानाच ही मोहीम आकाराला येऊ लागली. सर्वसामान्यांसह स्थानिकांना सोबत घेऊन ही मोहीम पुढं नेण्याचं नियोजित आहे. यासाठीची पूर्ण यंत्रणा पुण्यातून कार्यान्वित होत आहे. याची जनहित याचिकाही लवकरच दाखल करणार आहे.

प्रश्न : मोहिमेला प्रतिसाद कसा मिळतोय?उत्तर : ही मोहीम मुळातच सामान्यांच्या उठावाचा परिणाम आहे. अनेकांच्या मनातील प्रश्न आम्ही समाज माध्यमांद्वारे मांडला आणि तो सर्वांनाच भावला. हजारो नेटकºयांनी ही पोस्ट आपापल्या परीनं फिरवली आणि मोहीम सुरू झाली. लोकांचा सहभाग वाढवून त्यांना आपल्या न्याय हक्कांची जाणीव करून देणं हा या मोहिमेचा पुढील टप्पा असणार आहे. त्याबरोबरच असुविधा असणाºया रस्त्यांवर टोलबंदी हा विषयही न्यायालयात याचिकेद्वारे मांडण्यात येणार आहे. प्रत्येक गावात ‘नो टोल बुथ’ दिवाळीनंतर सुरू करणार आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांपुढं जनरेट्याचा आधार घेऊन काम करण्यास भाग पाडणार. समाज माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांना याप्रश्नी जागृत करून त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यास सर्व स्त्रातून या माहिमेस प्रतिसाद मिळत आहे.प्रशासनाला निवेदनसलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे पुण्यातून कोण, कसं आणि कधी प्रवास करणार याची एकत्रित माहिती आम्हाला संकलित करणं शक्य झालं नाही. त्यामुळे सातारा प्रशासनाला निवेदन दिलं नसल्याचे पवनजितने सांगितले.मंत्रिमंडळापुढे मांडणार प्रश्नसोशल मीडियाद्वारे सुरू झालेली ही मोहीम व्यापक प्रसिद्धी मिळवत आहे. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, मतदान आणि मतमोजणी यामुळे प्रशासनावर सध्या चांगलाच ताण आहे. त्यानंतर येणारी दिवाळी यामुळे अनेकजण उत्सवाच्या तयारीत आहेत. सर्वांचा विचार करता सध्या सर्वांकडून माहिती घेणं आणि संकलित करून ठेवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. दिवाळीनंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर सविस्तर आराखडा मांडणार आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाSatara areaसातारा परिसरSocial Mediaसोशल मीडिया