शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

आघाडीत साथ; सत्तेत द्या ‘हात’ काँग्रेस रोखठोक : राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:12 IST

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने कधीच ही भूमिका बजावली नाही. त्यामुळे काँग्रेसला गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा मिळाला नाही.

ठळक मुद्दे१७ वर्षांपासून झेडपीतील सत्तेपासून दूर

नितीन काळेल ।सातारा : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने कधीच ही भूमिका बजावली नाही. त्यामुळे काँग्रेसला गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा मिळाला नाही. आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून जिल्हा परिषदेतील सत्तेत सन्मान द्या, अशी भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची ही आक्रमक भूमिका येणाऱ्या काळात राष्ट्रवादीसाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकते.ग्रामीण भागाचा कणा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते.

याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेकांनी सदस्य होत विधानसभेची पायरीही चढली आहे. त्यामुळे नवे नेतृत्व घडविणारी कार्यशाळा म्हणूनही जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. अशाचप्रकारे सातारा जिल्हा परिषदेनेही काही आमदारांना घडविले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने विधानसभाही दणाणून सोडली. याच जिल्हा परिषदेत गेल्या १७ वर्षांपासून सत्तेचा लंबक हा राष्ट्रवादीच्या बाजूनेच राहिला. त्या तुलनेत विरोधी पक्ष असणारे शिवसेना आणि भाजप हे दूरच राहिले. असे असलेतरी राज्यात आघाडीत असणाऱ्या काँग्रेसलाही राष्ट्रवादीने कधीच स्थान दिले नाही. सतत मागच्या बाकावर बसविण्याचा विडाच राष्ट्रवादीने उचलला. तर वारंवार सत्तेत वाटा देण्याची मागणी करूनही राष्ट्रवादीने काँग्रेसला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे १७ वर्षांत काँग्रेसचा एकही सदस्य सभापतिपदापर्यंतही गेला नाही; पण आता काँग्रेसने पुन्हा जिल्हा परिषदेतील सत्तेत सन्मानाने वाटा देण्याची भाषा सुरू केली आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दीड महिन्यापूर्वी घेतली. तेव्हापासून काँग्रेसने आक्रमक रूप धारण केले आहे. साताºयात काँग्रेस कमिटीत झालेल्या पहिल्याच मेळाव्यात आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेला जिल्ह्यातील चार जागा मिळविण्याची भाषा सुरू केली. तर आता जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे जिल्ह्यात बैठका घेत आहेत. या बैठकांमधून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा घ्या, अशी भाषा करू लागले आहेत. त्यामुळे निंबाळकर यांनीही सत्तेत वाटा मिळवायचा, असा निर्धार केला आहे.ताणून धरणार की गळ्यात गळे...सत्तेत तुम्हीच राहायचे, आघाडी धर्म आम्ही पाळायचा, हे आता चालणार नाही. त्यासाठी आता जिल्हा परिषदेतही आम्ही वाटा मागतो. नाहीतर येणाºया निवडणुकीत पक्षाची भूमिका वेगळी असेल, असे सांगण्यासही काँग्रेसचे पदाधिकारी कचरत नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या या आक्रमकतेपुढे राष्ट्रवादी किती ताणून धरणार का गळ्यात गळे घालणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.गायत्रीदेवी राष्ट्रवादीच्या पहिल्या अध्यक्षा...गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेचे ८ अध्यक्ष झाले. हे सर्व राष्ट्रवादीचे होते. नारायणराव पवार हे काँग्रेसचे शेवटचे अध्यक्ष ठरले. पवार यांच्यानंतर गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या अध्यक्षा झाल्या. तर आता संजीवराजे नाईक-निंबाळकर हे अध्यक्ष आहेत. 

राज्यात, देशात आघाडी चालते; पण साताºयात नाही. वरिष्ठांनी कधीतरी याकडे लक्ष द्यावे. कारण, गेल्या १७ वर्षांत काँग्रेस जिल्हा परिषदेत सत्तेत नाही. आघाडी धर्मासाठी राष्ट्रवादीने सन्मानाने सभापतीचे एक पद तरी द्यावे.- भीमराव पाटील, सदस्य जिल्हा परिषदकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे; पण सातारा जिल्ह्यात आघाडी धर्म कोठे आहे.? प्रत्येकवेळी आम्हीच पालखीचे भोई व्हायचे, हे बंद झाले पाहिजे. त्यासाठी आता विधानसभेला जिल्ह्यातील चार जागा आणि जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा द्या, हीच आमची भूमिका राहणार आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर