शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

आघाडीत साथ; सत्तेत द्या ‘हात’ काँग्रेस रोखठोक : राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:12 IST

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने कधीच ही भूमिका बजावली नाही. त्यामुळे काँग्रेसला गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा मिळाला नाही.

ठळक मुद्दे१७ वर्षांपासून झेडपीतील सत्तेपासून दूर

नितीन काळेल ।सातारा : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने कधीच ही भूमिका बजावली नाही. त्यामुळे काँग्रेसला गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा मिळाला नाही. आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून जिल्हा परिषदेतील सत्तेत सन्मान द्या, अशी भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची ही आक्रमक भूमिका येणाऱ्या काळात राष्ट्रवादीसाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकते.ग्रामीण भागाचा कणा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते.

याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेकांनी सदस्य होत विधानसभेची पायरीही चढली आहे. त्यामुळे नवे नेतृत्व घडविणारी कार्यशाळा म्हणूनही जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. अशाचप्रकारे सातारा जिल्हा परिषदेनेही काही आमदारांना घडविले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने विधानसभाही दणाणून सोडली. याच जिल्हा परिषदेत गेल्या १७ वर्षांपासून सत्तेचा लंबक हा राष्ट्रवादीच्या बाजूनेच राहिला. त्या तुलनेत विरोधी पक्ष असणारे शिवसेना आणि भाजप हे दूरच राहिले. असे असलेतरी राज्यात आघाडीत असणाऱ्या काँग्रेसलाही राष्ट्रवादीने कधीच स्थान दिले नाही. सतत मागच्या बाकावर बसविण्याचा विडाच राष्ट्रवादीने उचलला. तर वारंवार सत्तेत वाटा देण्याची मागणी करूनही राष्ट्रवादीने काँग्रेसला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे १७ वर्षांत काँग्रेसचा एकही सदस्य सभापतिपदापर्यंतही गेला नाही; पण आता काँग्रेसने पुन्हा जिल्हा परिषदेतील सत्तेत सन्मानाने वाटा देण्याची भाषा सुरू केली आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दीड महिन्यापूर्वी घेतली. तेव्हापासून काँग्रेसने आक्रमक रूप धारण केले आहे. साताºयात काँग्रेस कमिटीत झालेल्या पहिल्याच मेळाव्यात आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेला जिल्ह्यातील चार जागा मिळविण्याची भाषा सुरू केली. तर आता जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे जिल्ह्यात बैठका घेत आहेत. या बैठकांमधून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा घ्या, अशी भाषा करू लागले आहेत. त्यामुळे निंबाळकर यांनीही सत्तेत वाटा मिळवायचा, असा निर्धार केला आहे.ताणून धरणार की गळ्यात गळे...सत्तेत तुम्हीच राहायचे, आघाडी धर्म आम्ही पाळायचा, हे आता चालणार नाही. त्यासाठी आता जिल्हा परिषदेतही आम्ही वाटा मागतो. नाहीतर येणाºया निवडणुकीत पक्षाची भूमिका वेगळी असेल, असे सांगण्यासही काँग्रेसचे पदाधिकारी कचरत नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या या आक्रमकतेपुढे राष्ट्रवादी किती ताणून धरणार का गळ्यात गळे घालणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.गायत्रीदेवी राष्ट्रवादीच्या पहिल्या अध्यक्षा...गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेचे ८ अध्यक्ष झाले. हे सर्व राष्ट्रवादीचे होते. नारायणराव पवार हे काँग्रेसचे शेवटचे अध्यक्ष ठरले. पवार यांच्यानंतर गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या अध्यक्षा झाल्या. तर आता संजीवराजे नाईक-निंबाळकर हे अध्यक्ष आहेत. 

राज्यात, देशात आघाडी चालते; पण साताºयात नाही. वरिष्ठांनी कधीतरी याकडे लक्ष द्यावे. कारण, गेल्या १७ वर्षांत काँग्रेस जिल्हा परिषदेत सत्तेत नाही. आघाडी धर्मासाठी राष्ट्रवादीने सन्मानाने सभापतीचे एक पद तरी द्यावे.- भीमराव पाटील, सदस्य जिल्हा परिषदकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे; पण सातारा जिल्ह्यात आघाडी धर्म कोठे आहे.? प्रत्येकवेळी आम्हीच पालखीचे भोई व्हायचे, हे बंद झाले पाहिजे. त्यासाठी आता विधानसभेला जिल्ह्यातील चार जागा आणि जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा द्या, हीच आमची भूमिका राहणार आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर