शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : तळहिरा, अरबवाडी तलावातून बेसुमार पाणी उपसा, ४७ गावांची तहान अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:10 IST

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देतळहिरा, अरबवाडी तलावातून बेसुमार पाणी उपसा४७ गावांची तहान अवलंबून कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात समस्या निर्माण होणार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच म्हणजे दिवाळीनंतर अनेक गावांतून पाणी टँकरची मागणी होत असते. गेल्या दोन वर्षांत या भागात झालेल्या जययुक्त शिवारच्या कामामुळे बरीच गावे आज टँकरमुक्त झाली आहेत. तर अनेक गावांचे भवितव्य हे या भागातील असलेल्या पाझर तलावातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे.या भागातील तळहिरा, नांदवळ आणि अरबवाडी हे प्रमुख तलाव गेल्यावर्षीच्या पावसात केवळ ५० टक्के भरले होते. तर वसना नदीवरील नांदवळ पाझर तलाव शंभर टक्के भरला होता. मात्र, या सर्व तलावांतून सध्या रात्री आणि दिवसाही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे हे तलाव आता रिकामे होऊ लागले आहेत.तळहिरा, अरबावाडी तलावांतून तर दिवसाही खुलेआम अनेक विनापरवाना मोटारीद्वारे पाणी उपसा केला जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही या विभागाने कानावर हात ठेवण्याचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.अरबावाडी तलावाचा आधार या भागातील अरबवाडी, अंबवडे, बनवडी, इब्राहमपूर, खामकरवाडी या गावांना आहे. तर तळहिरा पाझर तलावावर तळिये, वाठार स्टेशन, देऊर या गावांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या तलावातून होणारा पाणी उपसा थांबविण्याचे काम जिल्हाधिकाºयांनी करावे, अशी या भागातील ग्रामस्थातून मागणी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी