शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

सातारा : तळहिरा, अरबवाडी तलावातून बेसुमार पाणी उपसा, ४७ गावांची तहान अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:10 IST

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देतळहिरा, अरबवाडी तलावातून बेसुमार पाणी उपसा४७ गावांची तहान अवलंबून कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात समस्या निर्माण होणार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच म्हणजे दिवाळीनंतर अनेक गावांतून पाणी टँकरची मागणी होत असते. गेल्या दोन वर्षांत या भागात झालेल्या जययुक्त शिवारच्या कामामुळे बरीच गावे आज टँकरमुक्त झाली आहेत. तर अनेक गावांचे भवितव्य हे या भागातील असलेल्या पाझर तलावातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे.या भागातील तळहिरा, नांदवळ आणि अरबवाडी हे प्रमुख तलाव गेल्यावर्षीच्या पावसात केवळ ५० टक्के भरले होते. तर वसना नदीवरील नांदवळ पाझर तलाव शंभर टक्के भरला होता. मात्र, या सर्व तलावांतून सध्या रात्री आणि दिवसाही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे हे तलाव आता रिकामे होऊ लागले आहेत.तळहिरा, अरबावाडी तलावांतून तर दिवसाही खुलेआम अनेक विनापरवाना मोटारीद्वारे पाणी उपसा केला जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही या विभागाने कानावर हात ठेवण्याचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.अरबावाडी तलावाचा आधार या भागातील अरबवाडी, अंबवडे, बनवडी, इब्राहमपूर, खामकरवाडी या गावांना आहे. तर तळहिरा पाझर तलावावर तळिये, वाठार स्टेशन, देऊर या गावांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या तलावातून होणारा पाणी उपसा थांबविण्याचे काम जिल्हाधिकाºयांनी करावे, अशी या भागातील ग्रामस्थातून मागणी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी