शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अंगठाछापही सरपंचपदाचे दावेदार! गावभर बोभाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:13 IST

sarpanch Grampanchyat Sataranews- गावकारभार हाकण्यासाठी गावगुंडी आली म्हणजे बास झालं...त्याला कशाला लागतंय शिक्षण! सरपंच आणि सदस्य पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले तरुण किमान ७ वी पास तरी पाहिजेत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. मात्र १९९५ च्या आधी जन्माला आलेला गावकारभारी जरी अंगठा छाप असला तरी तो ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून येऊन सरपंचपदाचादेखील दावेदार ठरु शकतो!

ठळक मुद्देअंगठाछापही सरपंचपदाचे दावेदार! गावभर बोभाटा १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांना ७ वी पासची अट

सागर गुजरसातारा : गावकारभार हाकण्यासाठी गावगुंडी आली म्हणजे बास झालं...त्याला कशाला लागतंय शिक्षण! सरपंच आणि सदस्य पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले तरुण किमान ७ वी पास तरी पाहिजेत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. मात्र १९९५ च्या आधी जन्माला आलेला गावकारभारी जरी अंगठा छाप असला तरी तो ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून येऊन सरपंचपदाचादेखील दावेदार ठरु शकतो!मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४0 नुसार १ जून १९५९ मध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली. सध्याच्या घडीला राज्यामध्ये २८ हजारांच्यावर ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. शासनाने त्रिस्तरीय शासन पध्दतीचा स्वीकार १९६१ मध्ये केला. या घटनेला तब्बल ५९ वर्षे उलटली आहेत. पुलाखालून बरेच पाणी निघून गेलेय. राजकारणात तेव्हाही अंगठा छाप मंडळींचे वर्चस्व होते आणि अजूनही ते कायम आहे, असंच खेदानं म्हणावं लागत आहे. कारण ग्रामसेवक, लिपिक आणि तलाठी व्हायचं असेल तर किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आणि सरपंच व्हायचं म्हटलं तर अंगठाछापही चालतंय!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, अशा पुरोगामी विचारांच्या विद्वानांनी महाराष्ट्र घडविण्यात योगदान दिले. मात्र सध्याच्या काळात धोरण ठरविणाऱ्यांची मानसिकता बदलत नसल्याने महाराष्ट्रात शिक्षितांचा वर्ग राजकारणापासून बाजूला फेकला जात असल्याचे चित्र आहे.त्रिस्तरीय शासन व्यवस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यांच्या कारभाराला महत्त्व आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. आता सरकार बदलले असले तरी हा निर्णय कायम आहे. गावचा कारभार हाकणाºया सरपंच आणि सदस्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. हीच मंडळी अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असतील तर गावचा विकास कशा पध्दतीने साधला जात असेल हे सांगावे लागेल काय?धोरण ठरविणाऱ्यांचे शिक्षण तपासावे!निवडणूक आयोगाने नुकत्याच एका आदेशाने १९९५ नंतर जन्मलेला व्यक्ती जर ग्रामपंचायत लढवू इच्छित असेल तर तो किमान ७ वी पास असावा, असे घोषित केलेय. निवडणूक आयोगाची यंत्रणा जर स्वायत्त असेल तर निवडणुकीतील उमेदवारांच्या शिक्षणाबाबत ती निर्णय घेऊ शकत नाही का? असा सवाल उपस्थित होतो. प्रशासकीय यंत्रणेवर ज्यांचा अंमल चालतो, त्यांचेही ह्यशिक्षणह्ण तपासण्याचीच वेळ आता आलीय!शिपाई ग्रॅज्युएट अन सदस्य सातवी पासहातात डिग्री असूनही रोजगार मिळत नसल्याने अनेक तरुण मिळेल ती नोकरी करत आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये मानधन तत्वावर पदवीधारक तरुण शिपाई पदावरदेखील काम करत आहेत. मात्र, त्यांना कामे लावणाºया ग्रामपंचायत सरपंच अथवा सदस्याची शैक्षणिक पात्रता काय तर केवळ सातवी पास!

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसर