शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

अपक्ष बदलणार तीन मतदारसंघांचं ‘गणित’! -अंदाज बांधणे अंधारातील तीरासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:35 IST

आता अपक्ष उतरलेत. त्यांना मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे; पण हा पाठिंबा बोलण्यातून आहे की करणीतून हे कळायला मार्ग नाही. जर सर्वपक्षीय नेत्यांचा तन, मन, धनाने पाठिंबा राहिल्यास देशमुख दोघा बंधूंना भारी ठरू शकतात.

ठळक मुद्देक-हाड दक्षिण-उत्तर अन् माणमधील स्थिती; अटीतटीच्या तिरंगी लढतीचा परिणाम

नितीन काळेल ।सातारा : जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघांत चुरीशीच्या लढती होत असल्यातरी कºहाड दक्षिण, क-हाड उत्तर आणि माणमध्ये तुल्यबळ असणारे अपक्षच स्वत:सह दुसऱ्यांचे भवितव्य ठरविणार आहेत. त्यामुळे या तीन मतदारसंघांतील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याचा अंदाज बांधणे सद्य:स्थितीत तरी अंधारात तीर मारण्यासारखे होईल.क-हाड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार, तर भाजपकडून डॉ. अतुल भोसले, अपक्ष उदयसिंह पाटील रिंगणात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत चव्हाण आणि भोसले रिंगणात होते. त्यावेळी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे अपक्ष म्हणून उतरलेले. यावेळी त्यांचा मुलगा उदयसिंह हे खिंड लढवतात. आताही निवडणूक अटीतटीची होईल; पण यावेळी चुरस अधिक आहे. मागे पराभूत झाल्यानंतर भोसलेंनी मतदारसंघात बांधणी केली तसेच लोकसंपर्कही वाढवला. त्यांच्या पाठीमागे युतीची ताकद आहेच. त्याचबरोबर त्यांचा गटही येथे मजबूत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी अस्तित्वापेक्षा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कारण देशपातळीवर नेतृत्व करणाºया चव्हाणांना पुन्हा विजय मिळवावाच लागेल. येथे काँग्रेसमधील काहीजण भाजपात गेलेत. तरीही चव्हाण जोरदारपणे खिंड लढवतात. त्यांच्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद राहील. तर मतदारसंघ उंडाळकरांचा बालेकिल्ला राहिलेला. या जोरावर उदयसिंहांनाही गट मजबूत करणे व अस्तित्वासाठी निकराची लढाई लढावी लागतेय. उदयसिंह पाटील किती मते घेतात, यावरच त्यांच्यासह चव्हाण आणि अतुल भोसलेंचेही गणित अवलंबून असेल.

क-हाड उत्तरमध्ये कोणाचे पारडे जड राहणार? हे आता सांगणे कठीण आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेनेकडून धैर्यशील कदम तर अपक्ष म्हणून भाजपचे बंडखोर मनोज घोरपडे आहेत. २०१४ लाही या तिघांतच सामना रंगलेला. यावेळचा फरक म्हणजे पाटील राष्ट्रवादीतच असून, कदमांनी ‘हात’ सोडून बाण घेत नेम धरलाय. तर मतदारसंघ सेनेकडे गेल्याने घोरपडे अपक्ष उभे राहिलेत. आमदार पाटलांचा हा बालेकिल्ला राहिलाय. स्वत:बरोबरच पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. मात्र, काँग्रेसमधील काहीजण कदम आणि घोरपडेंबरोबर आहेत. याठिकाणी आघाडीत बिघाडी झालीय. त्यामुळे पाटलांची दमछाक होऊ शकते. तर धैर्यशील कदम यांच्यासाठी युतीची ताकद आहे. तसेच त्यांचा एक गटही जमेची बाजू ठरलीय. अपक्ष मनोज घोरपडेंनी यावेळीही निवडणुकीत रंगत आणलीय. गावोगावी जाऊन चांगला संपर्क वाढवलाय. मागीलवेळची तिघांचीही मते पाहता आता कोण वरचढ ठरेल, हे सांगता येत नाही. घोरपडेंच्या मतावरच कोणाच्याही जय-पराजयाचा तराजू राहणार आहे.

देशमुखांना पाठिंबा बोलण्यातून का कृतीतून...माण मतदारसंघात माजी आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या भावातच निवडणुकीचे द्वंद्व होईल, अशी स्थिती सुरुवातीला होती; पण नंतर ‘आमचं ठरलंय’मधून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख रणांगणात उतरले. त्यांना ‘आमचं ठरलंय’मधील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अपक्ष देशमुख यांनी भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासमोर खऱ्या अर्थाने कडवे आव्हान उभे केले आहे.

जयकुमारांच्या मागे भाजपची ताकद आहे; पण यामध्येही फाटाफूट झालीय. तर गेली दहा वर्षे आमदार असल्याने ते मजबूत गट बांधून आहेत. विकासकामे आणि पाणी आणल्याच्या मुद्द्यावर ते मतदारांना सामोरे जातायत. शेखर गोरे यांचाही स्वत:चा गट आहे. शिवसेनेची असणारी ताकद मागे आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी केलेली तयारी त्यांना कुठपर्यंत घेऊन जाते, ते पाहावे लागेल. प्रभाकर देशमुख हे राष्ट्रवादीचे.आता अपक्ष उतरलेत. त्यांना मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे; पण हा पाठिंबा बोलण्यातून आहे की करणीतून हे कळायला मार्ग नाही. जर सर्वपक्षीय नेत्यांचा तन, मन, धनाने पाठिंबा राहिल्यास देशमुख दोघा बंधूंना भारी ठरू शकतात. देशमुख किती मते घेणार? यावरच गोरे बंधूंसह त्यांचेही अस्तित्व अवलंबून असेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक