शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

हजारो रेल्वेगाड्या धावताहेत खासगी जागेतून; पुणे-मिरज दुहेरी मार्गासाठी तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 19:47 IST

सातारा : ब्रिटिशकाळा पासून शिस्तीत चाललेली यंत्रणा म्हणून बोलबाला असलेली रेल्वे जिल्ह्यातील अनेक गावांमधून खासगी जागेतून धावत आहे. १९६८-६९ दरम्यान पुणे-मिरज ब्रॉडगेज रेल्वे लाईन गेली असून, त्याची कोणत्याच सातबारावर नोंद नाही. बाधित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यां कडे धाव घेतली.कोपर्डे हवेली, शिरवडे, खराडे, पार्ले, ...

सातारा : ब्रिटिशकाळापासून शिस्तीत चाललेली यंत्रणा म्हणून बोलबाला असलेली रेल्वे जिल्ह्यातील अनेक गावांमधून खासगी जागेतून धावत आहे. १९६८-६९ दरम्यान पुणे-मिरज ब्रॉडगेज रेल्वे लाईन गेली असून, त्याची कोणत्याच सातबारावर नोंद नाही. बाधित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

कोपर्डे हवेली, शिरवडे, खराडे, पार्ले, कालगाव, तारगाव, नलवडेवाडी, टकले, बोरगाव, नहरवाडी, रहिमतपूर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे-मिरज ही रेल्वेलाईन १९६८-६९ च्या दरम्यान गेली आहे. रेल्वे प्रशासन किंवा शासनाकडून या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मोबदला दिलेला नाही. कोणताही शासकीय प्रकल्प उभारताना संपादित शेतजमिनीच्या सात बारा व फेरफार उताºयावर संबंधित प्रकल्पाचा उल्लेख करून संपादित क्षेत्र उताऱ्यातून कमी केले जाते.

नहरवाडी, रहिमतपूर येथील संपादित क्षेत्राचा सातबारा, फेरफारवर कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. तसेच सातबारावरून क्षेत्र कमीही केलेले नाही. सर्व शेतकरी शासनाचा महसूल भरत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या कामकाजाबाबत सर्व शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.

परिसरातील बागायती क्षेत्रामध्ये मध्य रेल्वेने लोहमार्गापासून पश्चिम दिशेला चाळीस ते ऐंशी मीटर अंतरावर खांब रोवले आहेत. हे क्षेत्र संपादित करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा पूर्वसूचना रेल्वे विभागाने दिली नाही. तसेच या क्षेत्राचे सर्व्हे पूर्ण न करता प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. या कामासंबंधित नकाशे, संपादनाची कागदपत्रे रेल्वे विभागाकडे मागितली असता ती न देता भूमी संपादनाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. रेल्वेच्या हद्दीची मर्यादा रेल्वे कार्यालयाकडे नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर भूमिसंपादन समन्वय सातारा शाखा यांच्यामार्फत पुणे, कऱ्हाड येथीळ वरिष्ठ विभाग अभियंता कार्यालयानेही पत्र स्वीकारलेले नाही, असेही पत्रात म्हटले आहे.दुहेरीकरणातील नुकसानभरपाईसाठी बैठकपुणे-मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम करण्यास कोणाचाही विरोध नाही; पण यामध्ये जाणार असलेल्या जमिनीची नोंद सातबारावर करावी. तसेच शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

शासनाच्या प्रकल्पात जमिनी गेल्यास नुकसान भरपाई, कुटुंबातील एकाला नोकरी देणे अपेक्षित आहे; पण रेल्वेकडून यातील कोणताही लाभ शेतकºयांना मिळालेला नाही.- मनोज ढाणे रहिमतपूर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वे