शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

सातारा जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र तहानलेलेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:10 IST

सागर गुजर ।सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिंचनाची कामे सुरू आहेत. प्रस्तावित कामांतून केवळ ४५ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. उर्वरित ५५ टक्के क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था करायची झाल्यास कोयनेच्या पाण्याशिवाय पर्याय उरत नाही.जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम-बलकवडी, धोम, कोयना, उरमोडी, तारळी ही मोठी धरणे आहेत. ...

ठळक मुद्देपाण्याची खरी गरज : प्रस्तावित कामांतून उरलेले ५५ टक्के क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे आव्हान;

सागर गुजर ।सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिंचनाची कामे सुरू आहेत. प्रस्तावित कामांतून केवळ ४५ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. उर्वरित ५५ टक्के क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था करायची झाल्यास कोयनेच्या पाण्याशिवाय पर्याय उरत नाही.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम-बलकवडी, धोम, कोयना, उरमोडी, तारळी ही मोठी धरणे आहेत. मात्र, त्याचे लाभक्षेत्र मर्यादित आहे. कोयनेतून कृष्णेत येणाऱ्या पाण्यावर सातारा जिल्ह्यातील कºहाड तालुक्यातील केवळ सहा गावे ओलिताखाली आली आहेत. उर्वरित पाणी सांगली व सोलापूर नेण्यात आले आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने सोलापूरला पाणी नेण्यात आले. मात्र, भीमा खोºयात असलेल्या कोरड्या ठाक माणगंगेत अद्याप पाणी आलेले नाही. माण व खटाव तालुक्यांत अत्यल्प पाऊस पडत असल्याने या तालुक्यांचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी आता धोरणात्मक निर्णय घ्यावाच लागणार आहे.

कोयना व मुळशी धरणातून अरबी समुद्राकडे जाणारे तब्बल ११० टीएमसी पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी शासनाने अभ्यासगट स्थापन केला आहे. या निर्णयामुळे सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. मुळशी धरणातून तब्बल ४२.५० टीएमसी पाणी पुणे, सोलापूर या जिल्ह्यांसह मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांना उपलब्ध केले जाऊ शकते, त्याचवेळी कोयना धरणातील ६७.०५ टीएमसी एवढा मोठा पाणीसाठा वापरून जिल्हा संपूर्णत: दुष्काळमुक्त करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते. कोकणातील सिंचन क्षेत्र व औद्योगिक वापरासाठी केवळ ७ टीएमसी पाणी वापरले जाते. उर्वरित ६० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते.६0 टीएमसी पाणी मिळू शकते..विद्युत निर्मितीचे पाणी कमी केल्यास जवळपास ६० टीएमसी पाणी सातारा, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील दुष्काळ निवारणासाठी उपयोगी ठरू शकते. सातारा जिल्ह्यात ७ लाख ९९ हजार हेक्टर इतके मोठे क्षेत्र लागवडी योग्य आहे. त्यापैकी ३ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रालाच म्हणजे केवळ ४५ टक्के क्षेत्रालाच प्रस्तावित प्रकल्पांच्या माध्यमातून पाणी मिळू शकते. म्हणजे जिहे-कटापूर व इतर चालू योजना पूर्ण झाल्या तरीही ५५ टक्के क्षेत्र सिंचनापासून वंचित राहणार आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात केवळ ४० टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. प्रस्तावित कामांतून आणखी पाच टक्के क्षेत्र ओलिताखाली येईल. उर्वरित ५५ टक्के क्षेत्राचा प्रश्न बाकी उरतोच.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण