शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र तहानलेलेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:10 IST

सागर गुजर ।सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिंचनाची कामे सुरू आहेत. प्रस्तावित कामांतून केवळ ४५ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. उर्वरित ५५ टक्के क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था करायची झाल्यास कोयनेच्या पाण्याशिवाय पर्याय उरत नाही.जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम-बलकवडी, धोम, कोयना, उरमोडी, तारळी ही मोठी धरणे आहेत. ...

ठळक मुद्देपाण्याची खरी गरज : प्रस्तावित कामांतून उरलेले ५५ टक्के क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे आव्हान;

सागर गुजर ।सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिंचनाची कामे सुरू आहेत. प्रस्तावित कामांतून केवळ ४५ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. उर्वरित ५५ टक्के क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था करायची झाल्यास कोयनेच्या पाण्याशिवाय पर्याय उरत नाही.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम-बलकवडी, धोम, कोयना, उरमोडी, तारळी ही मोठी धरणे आहेत. मात्र, त्याचे लाभक्षेत्र मर्यादित आहे. कोयनेतून कृष्णेत येणाऱ्या पाण्यावर सातारा जिल्ह्यातील कºहाड तालुक्यातील केवळ सहा गावे ओलिताखाली आली आहेत. उर्वरित पाणी सांगली व सोलापूर नेण्यात आले आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने सोलापूरला पाणी नेण्यात आले. मात्र, भीमा खोºयात असलेल्या कोरड्या ठाक माणगंगेत अद्याप पाणी आलेले नाही. माण व खटाव तालुक्यांत अत्यल्प पाऊस पडत असल्याने या तालुक्यांचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी आता धोरणात्मक निर्णय घ्यावाच लागणार आहे.

कोयना व मुळशी धरणातून अरबी समुद्राकडे जाणारे तब्बल ११० टीएमसी पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी शासनाने अभ्यासगट स्थापन केला आहे. या निर्णयामुळे सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. मुळशी धरणातून तब्बल ४२.५० टीएमसी पाणी पुणे, सोलापूर या जिल्ह्यांसह मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांना उपलब्ध केले जाऊ शकते, त्याचवेळी कोयना धरणातील ६७.०५ टीएमसी एवढा मोठा पाणीसाठा वापरून जिल्हा संपूर्णत: दुष्काळमुक्त करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते. कोकणातील सिंचन क्षेत्र व औद्योगिक वापरासाठी केवळ ७ टीएमसी पाणी वापरले जाते. उर्वरित ६० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते.६0 टीएमसी पाणी मिळू शकते..विद्युत निर्मितीचे पाणी कमी केल्यास जवळपास ६० टीएमसी पाणी सातारा, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील दुष्काळ निवारणासाठी उपयोगी ठरू शकते. सातारा जिल्ह्यात ७ लाख ९९ हजार हेक्टर इतके मोठे क्षेत्र लागवडी योग्य आहे. त्यापैकी ३ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रालाच म्हणजे केवळ ४५ टक्के क्षेत्रालाच प्रस्तावित प्रकल्पांच्या माध्यमातून पाणी मिळू शकते. म्हणजे जिहे-कटापूर व इतर चालू योजना पूर्ण झाल्या तरीही ५५ टक्के क्षेत्र सिंचनापासून वंचित राहणार आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात केवळ ४० टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. प्रस्तावित कामांतून आणखी पाच टक्के क्षेत्र ओलिताखाली येईल. उर्वरित ५५ टक्के क्षेत्राचा प्रश्न बाकी उरतोच.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण