शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

सातारा जिल्ह्यावर वरुणराजाची वक्रदृष्टी; यंदा नवजा, कोयना, महाबळेश्वरमध्ये पावसाची किती झाली तूट.. वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:41 IST

कोयनेत किती टीएमसी पाणीसाठा..

सातारा : जिल्ह्यात यंदा जून महिन्यात धुवाधार पाऊस झाल्यानंतर जुलै आणि आता ऑगस्ट महिन्यातही कमी पर्जन्यमान राहिले आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच मागील वर्षीपेक्षा यंदा कोयना नगरला १ हजार १५८, नवजा येथे १ हजार ५४५ आणि महाबळेश्वरला १ हजार २२५ मिलीमीटर पावसाची तूट आहे. तर सध्या प्रमुख सहा धरणांत १२९ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा पाऊस पडतो. या चार महिन्यांतील जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८८६ मिलीमीटर आहे. यावर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे तलाव, धरणात पाणीसाठा वाढला. तसेच ओढे, नद्या ही वाहू लागल्या. यानंतर जून महिन्यात मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जून महिन्यात १२५ टक्के पाऊस पडला.मात्र, जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली नाही. अवघा ८५ टक्केच पाऊस झाला. तर ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर बहुतांशी भागात पावसाची उघडीपच आहे. पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. तरीही यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान कमी आहे.पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, तापोळा हा भाग अतिवृष्टीचा. पण, येथेही पर्जन्यमान कमी आहे. नवजाला गतवर्षीपेक्षा तब्बल दीड हजार मिलीमीटर पावसाची तूट आहे. अशीच स्थिती कोयना आणि नवजा येथील पावसाची आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्यात किती पाऊस होतो यावर या तीन ठिकाणचा पाऊस सरासरी गाठणार का हे स्पष्ट होणार आहे.

कोयनेत अडीच टीएमसी पाणीसाठा कमी..कोयना धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असला तरी प्रमाण कमी आहे. त्यातच मागील महिन्यात कोयना धरणातून पाणी विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. यामुळे धरणात सध्या ८८.११ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर गतवर्षी १३ ऑगस्टला कोयनेत ९०.६७ टीएमसी साठा होता. गतवर्षीपेक्षा धरणात सुमारे अडीच टीएमसीहून कमी पाणीसाठा आहे.

पश्चिम भागातील पाऊस (मिलीमीटरमध्ये..)ठिकाण -  २०२४ - २०२५कोयना - ३१२८ - ४२८६नवजा - ३५४८ - ५०९३महाबळेश्वर - ३६२० - ४८४५

धोम, कण्हेर, उरमोडी धरणाची भरण्याकडे वाटचाल..जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रमुख सहा धरणे आहेत. याची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्या १२८.९२ टीएमसी साठा झालेला आहे. यातील कोयना धरण सुमारे ८४ टक्के भरलेले आहे. तर धोम आणि बलकवडी ९४ टक्के, कण्हेर ९४.५५, उरमोडी ९५.६८ तर तारळी धरणात ८८.४ टक्के भरलेले आहे. यावरून धोम, कण्हेर, उरमोडी धरणाची पूर्ण भरण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.