शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
3
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
4
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
5
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
6
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
7
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
8
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
9
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
10
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
11
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
12
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
13
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
14
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
15
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
16
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
17
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
19
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
20
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यावर वरुणराजाची वक्रदृष्टी; यंदा नवजा, कोयना, महाबळेश्वरमध्ये पावसाची किती झाली तूट.. वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:41 IST

कोयनेत किती टीएमसी पाणीसाठा..

सातारा : जिल्ह्यात यंदा जून महिन्यात धुवाधार पाऊस झाल्यानंतर जुलै आणि आता ऑगस्ट महिन्यातही कमी पर्जन्यमान राहिले आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच मागील वर्षीपेक्षा यंदा कोयना नगरला १ हजार १५८, नवजा येथे १ हजार ५४५ आणि महाबळेश्वरला १ हजार २२५ मिलीमीटर पावसाची तूट आहे. तर सध्या प्रमुख सहा धरणांत १२९ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा पाऊस पडतो. या चार महिन्यांतील जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८८६ मिलीमीटर आहे. यावर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे तलाव, धरणात पाणीसाठा वाढला. तसेच ओढे, नद्या ही वाहू लागल्या. यानंतर जून महिन्यात मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जून महिन्यात १२५ टक्के पाऊस पडला.मात्र, जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली नाही. अवघा ८५ टक्केच पाऊस झाला. तर ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर बहुतांशी भागात पावसाची उघडीपच आहे. पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. तरीही यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान कमी आहे.पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, तापोळा हा भाग अतिवृष्टीचा. पण, येथेही पर्जन्यमान कमी आहे. नवजाला गतवर्षीपेक्षा तब्बल दीड हजार मिलीमीटर पावसाची तूट आहे. अशीच स्थिती कोयना आणि नवजा येथील पावसाची आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्यात किती पाऊस होतो यावर या तीन ठिकाणचा पाऊस सरासरी गाठणार का हे स्पष्ट होणार आहे.

कोयनेत अडीच टीएमसी पाणीसाठा कमी..कोयना धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असला तरी प्रमाण कमी आहे. त्यातच मागील महिन्यात कोयना धरणातून पाणी विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. यामुळे धरणात सध्या ८८.११ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर गतवर्षी १३ ऑगस्टला कोयनेत ९०.६७ टीएमसी साठा होता. गतवर्षीपेक्षा धरणात सुमारे अडीच टीएमसीहून कमी पाणीसाठा आहे.

पश्चिम भागातील पाऊस (मिलीमीटरमध्ये..)ठिकाण -  २०२४ - २०२५कोयना - ३१२८ - ४२८६नवजा - ३५४८ - ५०९३महाबळेश्वर - ३६२० - ४८४५

धोम, कण्हेर, उरमोडी धरणाची भरण्याकडे वाटचाल..जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रमुख सहा धरणे आहेत. याची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्या १२८.९२ टीएमसी साठा झालेला आहे. यातील कोयना धरण सुमारे ८४ टक्के भरलेले आहे. तर धोम आणि बलकवडी ९४ टक्के, कण्हेर ९४.५५, उरमोडी ९५.६८ तर तारळी धरणात ८८.४ टक्के भरलेले आहे. यावरून धोम, कण्हेर, उरमोडी धरणाची पूर्ण भरण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.