शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

देशसेवेसाठी सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही, परमवीर चक्र विजेते संजय कुमार यांचे मत

By प्रमोद सुकरे | Updated: August 27, 2022 15:59 IST

कराड : देशसेवा करण्यासाठी फक्त सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात आणि ज्या ठिकाणी काम करता ...

कराड : देशसेवा करण्यासाठी फक्त सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात आणि ज्या ठिकाणी काम करता ते काम प्रामाणिकपणे केले तरी ती देशसेवाच असते. असे मत परमवीर चक्र विजेते सभेदार, मेजर संजय कुमार यांनी व्यक्त केले.परमवीर चक्र विजेते संजय कुमार एका कार्यक्रमासाठी कराडात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. अशोक गुजर, डॉ. माधुरी गुजर, डॉ. माधव कुमठेकर, प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला आदींची उपस्थित होते.संजय कुमार म्हणाले, देशाच्या सरहद्दीवर सीमांचे रक्षण करणे हे आमचे मुख्य काम आहे. भारतीय सैन्य दलाने आजवर या सीमारेषा तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जशासतसे उत्तर दिले आहे. आपली सेना कधीही पाठीमागे हटलेली नाही. त्यामुळे भारताची जी हद्द आहे ती आज आपल्या ताब्यात आहे आणि भविष्यातही ताब्यात राहतील.काश्मीर युद्धातील अनुभव कथन करताना ते म्हणाले, आमचे शत्रू खूप उंचीवर जाऊन बसले होते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त उंचावर जाऊन आम्हाला त्यांच्याशी सामना करावा लागला. परिणामी तेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. मात्र या सगळ्यावर मात करीत भारतीय सैन्याने शत्रूला गारद केले. आपला जो प्रदेश ते घेऊ पाहत होते तो पुन्हा ताब्यात घेतला.अग्निपथ योजना चांगलीचसैन्य दलामध्ये भरतीसाठी सुरू करण्यात आलेली नवी अग्निपथ योजना ही चांगलीच आहे. ती किती आणि कशी चालली आहे याचे प्रत्यंतर काही काळ गेल्यानंतर समोर येईल असेही संजय कुमार यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडIndian Armyभारतीय जवानAgneepath Schemeअग्निपथ योजना