शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Satara: वाईतील जललक्ष्मी योजनेच्या ३२ व्हॉल्व्हची चोरी

By सचिन काकडे | Updated: January 9, 2024 14:14 IST

या योजनेतून नुकतेच शेतीसाठी पाणी सोडण्यात आले

वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागासाठी वरदान ठरलेल्या ‘जललक्ष्मी’ योजनेचे एकूण ३२ व्हॉल्व्ह चोरट्यांकडून लंपास करण्यात आले. याप्रकरणी धोम पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता विक्रम मोकाशी यांनी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.जललक्ष्मी योजना बलकवडी धरणावर उभारण्यात आली आहे. या धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे धोम जलाशयाच्या डाव्या व उजव्या तीरांवरील शेतजमिनीला पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. २०१६ मध्ये या योजनेचे बहुतांशी काम पूर्ण होऊन २७ गावांमधील ८५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. मात्र, या योजनेतील वितरणव्यवस्थेचे काम प्रलंबित असून, देखभाल-दुरुस्तीअभावी जलवाहिनीला सातत्याने गळती लागते. त्यामुळे ही योजना कायमच चर्चेचा विषय ठरते. या योजनेतून नुकतेच शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. आवर्तन सुरू झाल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता विक्रम मोकाशी पाहणी करण्यासाठी पश्चिम भागात गेले असता त्यांना कुसगाव, न्हाळेबाडी व पसरणी गावांच्या हद्दीतील जलवाहिनीचे ३२ व्हॉल्व्ह चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याची किमंत सुमारे ५४ हजार रुपये असून, वजन १ हजार ३५० किलो इतके आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक बिराजदार तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीtheftचोरीwai-acवाई