शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

तरडगावातील बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 13:06 IST

 पुढील महिन्यात २९ जून  रोजी आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत असून फलटण तालुक्यातील तरडगाव येथे ८ जुलै रोजी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे.

तरडगाव- पुढील महिन्यात २९ जून  रोजी आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत असून फलटण तालुक्यातील तरडगाव येथे ८ जुलै रोजी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. मात्र बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.तसेच काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार आहे. अशात हे काम पूर्ण होणार की नाही?  याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. पालखी तळ लगत पुलाचे काम पूर्ण होवून तो वाहतुकीसाठी खुला झाल्याने सर्वाँना येथील दुसऱ्या पुलाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा लागली आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व त्यामधील चांदोबाचा लिंब येथील उभे रिंगण यामुळे अवघ्या राज्याला परिचित असणार  सांप्रदायिक गाव म्हणजे तरडगाव होय. आषाढी वारीतील पालखी सोहळ्याचा येथे एक दिवस मुक्काम असतो. वारीत सहभागी वारकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी दरवर्षी तात्पुरत्या योजना केल्या जातात. मात्र वर्षानुवर्षे बसस्थानक परिसरात रखडलेल्या कामामुळे  आजवर नागरिक व प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

आळंदी - पंढरपूर - मोहोळ या पालखी मार्गाच्या सहापदरीकरण कामात तरडगाव मधील पालखी तळ लगत व बसस्थानक परिसर या दोन ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले.सुरुवाती पासून संथ गतीने सुरू राहिलेल्या या कामातील पालखी तळ येथील पुलाचे काम पूर्ण होवून त्यावरून सध्या वाहतूक सुरू झाल्याचे दिसत आहे. मात्र बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही पूर्णावस्थेत न आल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.

सध्या अपूर्णवस्थेतील पुला शेजारून एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. काम संथगतीने सुरू राहिल्याने व्यवसायिकांना देखील मोठा फटका बसला आहे. तर धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी अन् सुरू असलेल्या कामामुळे परिसर पूर्णतः बदलून गेल्याने बाहेरून एखादा प्रवाशी येथे आला तर बसस्थानक कुठे आहे? असा प्रश्न विचारताना तो दिसतो. 

काम पूर्णत्वास झाल्यावर समस्या दूर होतील मात्र सध्याची परिस्थिती पाहता नागरिक,प्रवाशी वर्ग ,व्यवसायिक यांचा विचार करता त्यांना भेडसावणाऱ्या इतर  अडचणी दूर करण्यासाठी व  वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. तसेच पालखी आगमनापूर्वी या पुलाचे काम पूर्ण न झाल्यास पालखी सोहळ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल अशी चर्चा होताना दिसत आहे.  

ते 'वळण ' होणार का सरळ?

२०१० पासून चौपदरीकरण रस्त्याच्या कामात रखडलेले  तरडगाव ओढया जवळील  अपघाती वळण अजून जैसे थे आहे. आजवर रात्रीच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडून यामध्ये अनेक जखमी झाले आहेत.तर काहीना जीवास मुकावे लागले आहे.अपघात झाल्यावरच यावर केवळ तात्पुरत्या उपाय योजना झाल्या आहेत.

'सबंधित विभागाने पालखी सोहळा व पावसाळा या गोष्टी लक्षात घेवून यापूर्वीच योग्य नियोजन करून पुलाच्या कामाची पूर्तता करणे आवश्यक होते.नैसर्गिक आपत्तीत अशी कामे सुरू ठेवणे शक्य नसते.काम पूर्ण न झाल्यास याचा फटका वारकऱ्यांसह सर्वांना बसेल.तो बसू नये याची दक्षता घेण्यात यावी.                                       सतीश गायकवाड                                       संस्थापक अध्यक्ष                              माऊली सेवा दल,तरडगाव

टॅग्स :satara-acसातारा