शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

किल्ले सज्जनगडाच्या स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो तरुण, संवर्धन पथकाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 16:21 IST

इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले सज्जनगडाची दुरवस्था

अक्षय सोनटक्केपरळी: सातारा शहराच्या पश्चिमेस अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले सज्जनगडाची दुरवस्था झाली आहे. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर किल्ले सज्जनगडाच्या स्वच्छतेसाठी शेकडो तरुण पुढे सरसावले आहेत. परळी खोऱ्यातील ‘सज्जनगड संवर्धन टीम’ने हा अनोखा उपक्रम राबविला आहे.यावेळी सज्जनगडाचे तटबंदी, बुरूज, पायरी मार्ग तसेच बुरजावरील स्वच्छता करण्यात आली. दरवर्षी ही सज्जनगडावरील दिवाळीपूर्व स्वच्छता मोहीम शेकडो युवक एकत्र येत फत्ते करत असल्याने या मोहिमेचे कौतुक होत आहे.दिवाळी म्हटले की फटाक्यांची आतषबाजी आणि विद्युत रोषणाई ठरलेली असते. सजलेली घरे असेच काहीचे समीकरण पाहायला मिळते. याच काळात सर्व जण आपल्या घरांची स्वच्छता करतात. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाची, इतिहासाची साक्ष म्हणून हे गडकिल्ले आपल्या जगण्याचाच एक भाग आहेत. दिवाळीमध्ये घराची साफसफाई केली जाते त्याचपद्धतीने परळी खोऱ्यातील किल्ले सज्जनगड संवर्धन टीमकडून सज्जनगड येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.या मोहिमेत परळी खोऱ्यातील शेकडो युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. किल्ले सज्जनगड संवर्धन टीमकडून सातत्याने सज्जनगडावरील स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवून इतिहासाची साक्ष देणारा सज्जनगड हा पुढच्या पिढीसाठी जसा आहे तसाच दिसण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते नक्कीच आदर्शवत असल्याचे स्थानिकांकडून म्हटले जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगड