शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

Satara: दुष्काळात तेरावा महिना; व्याजवाडीत धोम धरणाच्या उजव्या कालव्याला तळात भगदाड

By दीपक शिंदे | Updated: February 5, 2024 12:48 IST

ओढ्यावर फुटल्याने शेतजमिनीचे नुकसान टळले

वाई : धोम धरणाच्या उजव्या कालव्याला व्याजवाडी हद्दीत पहाटे चार वाजता भगदाड पडल्याने शेकडो क्युसेक पाणी वाहून गेले. कालवा ओढ्यावर फुटल्याने शेती वाहून जाण्याचे मोठे नुकसान टाळले. यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येणार आहे. धोम धरण पाटबंधारे विभागाने वेळीच कालवा दुरुस्त केला असता तर ही दुर्घटना टळली असती. रात्री कालवा फुटण्याच्या घटनेने ओढ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.कालवा फुटण्याच्या घटनांनी पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवर्तनाचा कालावधी संपल्याने रब्बी हंगामातील पिकांना थोडे दिवस पाणी देण्याची गरज नाही. दोन महिने कालव्यातून दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. पहाटे चार वाजता कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तसेच ओढ्यावरील कालवा फुटल्याने शेतीचे नुकसान झाले नाही. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. उसाची लागवड, कांदा, गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना सध्या पाण्याची गरज असल्याने कालव्यातून पाणी सोडले होते. परंतु पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे धोम धरणाच्या दोन्ही कालव्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. धरणातून पाणी सोडल्यास शेतात कमी ओढ्यातून जास्त वाहून जाते. यामुळे संबंधित विभागाला गळतीमुळे लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. वाई परिसरात अकरा किलोमीटर उजवा आणि डावा कालवा आहे. कालव्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. कालव्याची दुरुस्ती व पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाल्यास पाटबंधारे खात्याला नुकसान सहन करावे लागणार नाही.

कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी शासनाच्या दरबारी पाटबंधारे खात्याचे संबंधित अधिकारी निधीचा पाठपुरावा करीत आहेत. परंतु कृष्णा खोऱ्याच्या जलसिंचन विभागाकडून उदासीनता असल्याने कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळताना अडचणी निर्माण होत असल्याने पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात येत आहे. शासनाने निधीची कमतरता भासू देणार नाही अशा वल्गना करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून धोम धरणाच्या कालव्यासाठी निधीची तरतूद करावी जेणेकरून पुढील तीन ते चार महिन्यांत पाण्याच्या टंचाईचा सामना करताना अडचणी येणार नाहीत.जिल्ह्यातून पाच तालुक्यांतील हजारो एकर जमीन या कालव्यावर अवलंबून आहे, तरी आमदार मकरंद पाटील यांनी संसदेत हा प्रश्न मांडून पाटबंधारे खात्याला निधी उपलब्ध करून द्यावा व त्वरित कालवा दुरुस्त करून चालू हंगामाचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी करण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद केले असले तरीही दुपारी तीनपर्यंत पाणी ओढ्यात वाहून जात होते. दोन महिन्यांत दोन मोठ्या घटना घडल्याने संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहू शकते. वाई तालुक्यात दुष्काळ गडद होणार यात शंका नाही.

ओढ्यांची तपासणी करून अहवाल करावागेल्या दोन महिन्यांत ओढ्यावरील कालव्यावर मोठ्या दोन घटना घडून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ओढ्यावर कालवा फुटल्याने शेतीचे नुकसान टळले आहे. परंतु रब्बी हंगामाच्या तोंडावर कालवा फुटल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. प्रत्येक वेळी ओढ्यावरच कालव्याला भगदाड पडत असेल तर धोम धरणापासून अकरा किलोमीटर अंतरात कालवे किती ओढ्यावरून गेले आहेत याचा सर्व्हे करून दुरुस्तीचा प्रथम दर्शनी विचार व्हावा. तरच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यात यश मिळेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी