शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: दुष्काळात तेरावा महिना; व्याजवाडीत धोम धरणाच्या उजव्या कालव्याला तळात भगदाड

By दीपक शिंदे | Updated: February 5, 2024 12:48 IST

ओढ्यावर फुटल्याने शेतजमिनीचे नुकसान टळले

वाई : धोम धरणाच्या उजव्या कालव्याला व्याजवाडी हद्दीत पहाटे चार वाजता भगदाड पडल्याने शेकडो क्युसेक पाणी वाहून गेले. कालवा ओढ्यावर फुटल्याने शेती वाहून जाण्याचे मोठे नुकसान टाळले. यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येणार आहे. धोम धरण पाटबंधारे विभागाने वेळीच कालवा दुरुस्त केला असता तर ही दुर्घटना टळली असती. रात्री कालवा फुटण्याच्या घटनेने ओढ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.कालवा फुटण्याच्या घटनांनी पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवर्तनाचा कालावधी संपल्याने रब्बी हंगामातील पिकांना थोडे दिवस पाणी देण्याची गरज नाही. दोन महिने कालव्यातून दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. पहाटे चार वाजता कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तसेच ओढ्यावरील कालवा फुटल्याने शेतीचे नुकसान झाले नाही. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. उसाची लागवड, कांदा, गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना सध्या पाण्याची गरज असल्याने कालव्यातून पाणी सोडले होते. परंतु पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे धोम धरणाच्या दोन्ही कालव्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. धरणातून पाणी सोडल्यास शेतात कमी ओढ्यातून जास्त वाहून जाते. यामुळे संबंधित विभागाला गळतीमुळे लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. वाई परिसरात अकरा किलोमीटर उजवा आणि डावा कालवा आहे. कालव्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. कालव्याची दुरुस्ती व पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाल्यास पाटबंधारे खात्याला नुकसान सहन करावे लागणार नाही.

कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी शासनाच्या दरबारी पाटबंधारे खात्याचे संबंधित अधिकारी निधीचा पाठपुरावा करीत आहेत. परंतु कृष्णा खोऱ्याच्या जलसिंचन विभागाकडून उदासीनता असल्याने कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळताना अडचणी निर्माण होत असल्याने पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात येत आहे. शासनाने निधीची कमतरता भासू देणार नाही अशा वल्गना करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून धोम धरणाच्या कालव्यासाठी निधीची तरतूद करावी जेणेकरून पुढील तीन ते चार महिन्यांत पाण्याच्या टंचाईचा सामना करताना अडचणी येणार नाहीत.जिल्ह्यातून पाच तालुक्यांतील हजारो एकर जमीन या कालव्यावर अवलंबून आहे, तरी आमदार मकरंद पाटील यांनी संसदेत हा प्रश्न मांडून पाटबंधारे खात्याला निधी उपलब्ध करून द्यावा व त्वरित कालवा दुरुस्त करून चालू हंगामाचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी करण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद केले असले तरीही दुपारी तीनपर्यंत पाणी ओढ्यात वाहून जात होते. दोन महिन्यांत दोन मोठ्या घटना घडल्याने संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहू शकते. वाई तालुक्यात दुष्काळ गडद होणार यात शंका नाही.

ओढ्यांची तपासणी करून अहवाल करावागेल्या दोन महिन्यांत ओढ्यावरील कालव्यावर मोठ्या दोन घटना घडून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ओढ्यावर कालवा फुटल्याने शेतीचे नुकसान टळले आहे. परंतु रब्बी हंगामाच्या तोंडावर कालवा फुटल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. प्रत्येक वेळी ओढ्यावरच कालव्याला भगदाड पडत असेल तर धोम धरणापासून अकरा किलोमीटर अंतरात कालवे किती ओढ्यावरून गेले आहेत याचा सर्व्हे करून दुरुस्तीचा प्रथम दर्शनी विचार व्हावा. तरच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यात यश मिळेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी