शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदराची बैठक निष्फळ; साताऱ्यातील कारखानदार म्हणतात ३१००, संघटना ३५०० वर ठाम

By नितीन काळेल | Updated: November 30, 2023 15:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून ठाम भूमिका : गनिमी कावा अन् साखर अडविणार; शेतकरी संघटना एकत्र

सातारा : सातारा जिल्ह्यातील ऊसदराबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेतल्याने कारखानदारांच्या प्रतिनिधींनी ३१०० रुपये दर जाहीर केला. पण, शेतकरी संघटनांनी पहिला हप्ता ३५०० रुपयेच देण्याचीच आक्रमक भूमिका ठेवली. यामुळे तोडगा निघालाच नाही. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आता कारखानदारांना लवकर निर्णय घेण्याची सूचना केली असून संघटनांनी मात्र, एकत्र येत दोन दिवसानंतर गनिमी काव्याने आंदोलन आणि साखर अडविण्याचा इशारा दिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा तिडा संपला आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार काय भाव देणार याकडे लक्ष लागलेले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर कारखानदार प्रतिनिधी आणि शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, बळीराजा शेतकरी संघटनांचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी रघुनाथदादा पाटील, पंजाबराव पाटील, राजू शेळके, विकास जाधव, मधुकर जाधव, देवानंद पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकीत साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींकडून दर जाहीर होत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी डुडी यांनी जागेवरच दर जाहीर कारखान्यासाठी प्रतिनिधींना सूचना केली. यावर सर्वांनी एक होत यावर्षी उसाला प्रति टन पहिला हप्ता ३१०० रुपये दर देण्याचे जाहीर केले. पण, यावर शेतकरी संघटनांचे समाधान झाले नाही. त्यांनी बळीराजा अडचणीत आहे. साखरेला दर चांगला मिळत आहे. त्यामुळे उसाला पहिला हप्ता ३५०० रुपये मिळालाच पाहिजे, अशी ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली.तसेच गेल्यावर्षी तोडणी झालेल्या उसालाही टनामागे पैसे देण्याची मागणी करण्यात आली. पण, यावर चर्चा होऊन काहीच निर्णय झाला नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कारखानदारांना काही सूचनाही केली. सायंकाळपर्यंतच दराचा निर्णय घेण्याबाबत स्पष्ट केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची बैठक निष्फळ ठरली.दरम्यान, बैठकीनंतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. उसाला पहिला हप्ता ३५०० रुपये मिळालेच पाहिजे, मागील तोडलेल्या उसाला पैसे मिळावेत यासाठी कारखानदारांना दोन दिवसांची मुदत देत आहे. या दोन दिवसांत दराबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास गनिमी काव्याने आंदोलन करु. ऊस वाहतूक वाहने रोखण्याबरोबरच रास्ता रोको करु असा इशाराही दिला.

रघुनाथदादा म्हणाले पाच हजार दर..या बैठकीला रघुनाथदादा पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी उसाला पहिला हप्ता पाच हजार रुपये द्या, नाहीतर दोन कारखान्यामधील अंतराची अट रद्द करा अशी मागणी केली. तसेच याबाबत निर्णय न झाल्यास कारखान्यातील साखर अडविण्याचा इशाराही दिला.

जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहे. तर दुसरीकडे साखरेला चांगला दर मिळत आहे. पण, साखर कारखानदार शेतकऱ्यांना चांगला दर देण्यास तयार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार समाधानकारक दर देऊ शकतात. मग, जिल्ह्यातील कारखानदारांना काय होते. आता दोन दिवसांत दराबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी गनिमी काव्याने निर्णायक आणि अंतिम लढा देऊ. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेcollectorजिल्हाधिकारी