शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना धरणात पाण्याची आवक सुरुच; पाणीसाठा किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: August 3, 2024 18:48 IST

नद्यांच्या पातळीत वाढ : नीरा जुना पूल अन् वाठार-वीर रस्ता बंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असला तरी धरणात आवक कायम आहे. यामुळे धरणातील विसर्गात वाढ करण्यात येत आहे, तसेच वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी खंडाळा तालुक्यात लाेणंदजवळचा नीरा जुना पूल आणि वाठार-वीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर २४ तासांत महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील साठाही ८८ टीएमसीजवळ पोहोचला आहे.पश्चिम भागात कास, बामणोली, नवजा, तापोळा, कोयना, महाबळेश्वरला मागील २० दिवसांपासून खंड न पडता पाऊस सुरू आहे. सुरुवातीला धुवाधार पाऊस पडला. त्यानंतर जोर कमी झाला. मात्र, तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा चांगलाच पडू लागला आहे. त्यातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. सध्या बहुतांशी धरणे ही ८० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील छोटी धरणे पाठीमागेच भरून वाहत आहेत, तर इतर धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पाटण तालुक्यातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण भरणार आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात ८६.७१ टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर ४९ हजार क्युसेकने धरणात पाण्याची आवक होती. शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारीही पायथा वीजगृहातून २ हजार १०० आणि सहा दरवाजांतून ५० हजार क्युसेक वेगाने पाणी विसर्ग करण्यात येत होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७८, नवजाला ६० आणि महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली, तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ९३७, नवजा येथे ४ हजार ६२७ आणि महाबळेश्वरला ४ हजार ३२३ मिलिमीटरची नोंद झाली आहे.

शुक्रवारी रात्रीपासूनच वीरमधून विसर्ग वाढवला..वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच धरणाच्या वरील भागात असणाऱ्या नीरा देवघर धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे, तसेच भाटघर १००, तर गुंजवणी धरणही ८७ टक्के भरले. या तिन्ही धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार शुक्रवारी रात्री साडेदहापासून वीरमधील विसर्ग वाढविण्यात आला. धरण सांडव्याद्वारे ३२ हजारांवरून ४२ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग होऊ लागलाय. त्यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी