शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना धरणात पाण्याची आवक सुरुच; पाणीसाठा किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: August 3, 2024 18:48 IST

नद्यांच्या पातळीत वाढ : नीरा जुना पूल अन् वाठार-वीर रस्ता बंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असला तरी धरणात आवक कायम आहे. यामुळे धरणातील विसर्गात वाढ करण्यात येत आहे, तसेच वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी खंडाळा तालुक्यात लाेणंदजवळचा नीरा जुना पूल आणि वाठार-वीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर २४ तासांत महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील साठाही ८८ टीएमसीजवळ पोहोचला आहे.पश्चिम भागात कास, बामणोली, नवजा, तापोळा, कोयना, महाबळेश्वरला मागील २० दिवसांपासून खंड न पडता पाऊस सुरू आहे. सुरुवातीला धुवाधार पाऊस पडला. त्यानंतर जोर कमी झाला. मात्र, तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा चांगलाच पडू लागला आहे. त्यातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. सध्या बहुतांशी धरणे ही ८० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील छोटी धरणे पाठीमागेच भरून वाहत आहेत, तर इतर धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पाटण तालुक्यातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण भरणार आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात ८६.७१ टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर ४९ हजार क्युसेकने धरणात पाण्याची आवक होती. शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारीही पायथा वीजगृहातून २ हजार १०० आणि सहा दरवाजांतून ५० हजार क्युसेक वेगाने पाणी विसर्ग करण्यात येत होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७८, नवजाला ६० आणि महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली, तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ९३७, नवजा येथे ४ हजार ६२७ आणि महाबळेश्वरला ४ हजार ३२३ मिलिमीटरची नोंद झाली आहे.

शुक्रवारी रात्रीपासूनच वीरमधून विसर्ग वाढवला..वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच धरणाच्या वरील भागात असणाऱ्या नीरा देवघर धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे, तसेच भाटघर १००, तर गुंजवणी धरणही ८७ टक्के भरले. या तिन्ही धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार शुक्रवारी रात्री साडेदहापासून वीरमधील विसर्ग वाढविण्यात आला. धरण सांडव्याद्वारे ३२ हजारांवरून ४२ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग होऊ लागलाय. त्यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी