शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना धरणात पाण्याची आवक सुरुच; पाणीसाठा किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: August 3, 2024 18:48 IST

नद्यांच्या पातळीत वाढ : नीरा जुना पूल अन् वाठार-वीर रस्ता बंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असला तरी धरणात आवक कायम आहे. यामुळे धरणातील विसर्गात वाढ करण्यात येत आहे, तसेच वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी खंडाळा तालुक्यात लाेणंदजवळचा नीरा जुना पूल आणि वाठार-वीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर २४ तासांत महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील साठाही ८८ टीएमसीजवळ पोहोचला आहे.पश्चिम भागात कास, बामणोली, नवजा, तापोळा, कोयना, महाबळेश्वरला मागील २० दिवसांपासून खंड न पडता पाऊस सुरू आहे. सुरुवातीला धुवाधार पाऊस पडला. त्यानंतर जोर कमी झाला. मात्र, तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा चांगलाच पडू लागला आहे. त्यातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. सध्या बहुतांशी धरणे ही ८० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील छोटी धरणे पाठीमागेच भरून वाहत आहेत, तर इतर धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पाटण तालुक्यातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण भरणार आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात ८६.७१ टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर ४९ हजार क्युसेकने धरणात पाण्याची आवक होती. शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारीही पायथा वीजगृहातून २ हजार १०० आणि सहा दरवाजांतून ५० हजार क्युसेक वेगाने पाणी विसर्ग करण्यात येत होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७८, नवजाला ६० आणि महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली, तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ९३७, नवजा येथे ४ हजार ६२७ आणि महाबळेश्वरला ४ हजार ३२३ मिलिमीटरची नोंद झाली आहे.

शुक्रवारी रात्रीपासूनच वीरमधून विसर्ग वाढवला..वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच धरणाच्या वरील भागात असणाऱ्या नीरा देवघर धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे, तसेच भाटघर १००, तर गुंजवणी धरणही ८७ टक्के भरले. या तिन्ही धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार शुक्रवारी रात्री साडेदहापासून वीरमधील विसर्ग वाढविण्यात आला. धरण सांडव्याद्वारे ३२ हजारांवरून ४२ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग होऊ लागलाय. त्यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी