शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

केंद्रीय तांत्रिक समितीने अग्रिम फेटाळला; पीक कापणी प्रयोगावरच विम्याची मदत

By नितीन काळेल | Updated: January 30, 2024 18:35 IST

लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा 

सातारा : जिल्ह्यातील २०२३ च्या खरीप हंगामात कमी पावसामुळे अग्रिमसाठी पात्र ठरलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तीन पिकांसाठी विमा कंपन्यांनी मदत दिली; पण आता केंद्राच्या तांत्रिक सल्लागार समितीनेच अग्रिम फेटाळलाय. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यातच पीक विम्याची रक्कम कापणी प्रयोगानंतरच ठरणार आहे. यातूनच लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.शेतकऱ्यांना नैसर्गिक संकट, दुष्काळ, तसेच अतिवृष्टी आदी काळात मदत होण्यासाठी शासनाच्या वतीने पीक विमा योजना राबविण्यात येते. खरीप आणि रब्बी हंगामातील पिके, तसेच फळबागांसाठी ही विमा योजना आहे. त्यातच गेल्यावर्षीपासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देऊ केला आहे. उर्वरित रक्कम शासनाकडून भरली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते, तसेच खरीप हंगामात पावसाचा सलग २१ दिवसांचा खंड पडलेला.

यामुळे जिल्ह्यातील तब्बल ६३ मंडले पात्र ठरली होती. या मंडलांतील शेतकऱ्यांना पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनीही पीक विमा कंपन्यांबरोबर बैठक घेऊन सूचना केली होती. त्यानंतर आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील ६३ मंडलांतील तीन पिकांसाठी २५ टक्के अग्रिम देण्यात आले आहे. यामध्ये भात, बाजरी आणि नाचणी पिकांचा समावेश आहे; पण खरिपातील इतर पिकांसाठी अग्रिम मिळालाच नाही. त्यातच आता केंद्रीय तांत्रिक सल्लगार समितीने अग्रिम फेटाळल्याने पीक कापणी प्रयोगावरच विमा रक्कम ठरणार आहे.

अग्रिमसाठी पावणेदोन लाख शेतकरी..जिल्ह्यातील ६३ महसूल मंडलांत सलग २१ किंवा त्याहून अधिक दिवस पावसाचा खंड पडलेला. त्यामुळे नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळण्याची शक्यता होती. जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७३ हजार शेतकरी त्यासाठी पात्र ठरणार होते; पण विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्याने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त पातळीवरही बैठक झाली होती.

९ पिकांसाठी होती विमा योजना

जिल्ह्यात खरीप हंगामात विमा कंपन्यांनी ९ पिकांसाठी योजना राबविली होती. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, कांदा या पिकांचा समावेश होता. यातील बाजरी, भात आणि नाचणीसाठीच अग्रिम दिलेला आहे.

आतापर्यंत साडेतीन कोटी मिळालेजिल्ह्यातील अग्रिमसाठी आतापर्यंत तीन पिकांना साडेतीन कोटी रुपये मिळाले आहेत, तर बाजरी पीक घेतलेल्या आणि अग्रिमसाठी पात्र ठरलेल्या महसूल मंडलांतील शेतकऱ्यांनाच सुमारे तीन कोटी मिळालेत. यातून १३ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे.

२०२३ च्या खरीप हंगामातील अग्रिम केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळला आहे. आता पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीक कापणी प्रयोगाचे संकलन कृषी आयुक्त पातळीवर पाठविण्यात आले आहे. त्यानंतर विमा कंपन्यांकडे अहवाल गेल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. -भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी