शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

केंद्रीय तांत्रिक समितीने अग्रिम फेटाळला; पीक कापणी प्रयोगावरच विम्याची मदत

By नितीन काळेल | Updated: January 30, 2024 18:35 IST

लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा 

सातारा : जिल्ह्यातील २०२३ च्या खरीप हंगामात कमी पावसामुळे अग्रिमसाठी पात्र ठरलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तीन पिकांसाठी विमा कंपन्यांनी मदत दिली; पण आता केंद्राच्या तांत्रिक सल्लागार समितीनेच अग्रिम फेटाळलाय. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यातच पीक विम्याची रक्कम कापणी प्रयोगानंतरच ठरणार आहे. यातूनच लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.शेतकऱ्यांना नैसर्गिक संकट, दुष्काळ, तसेच अतिवृष्टी आदी काळात मदत होण्यासाठी शासनाच्या वतीने पीक विमा योजना राबविण्यात येते. खरीप आणि रब्बी हंगामातील पिके, तसेच फळबागांसाठी ही विमा योजना आहे. त्यातच गेल्यावर्षीपासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देऊ केला आहे. उर्वरित रक्कम शासनाकडून भरली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते, तसेच खरीप हंगामात पावसाचा सलग २१ दिवसांचा खंड पडलेला.

यामुळे जिल्ह्यातील तब्बल ६३ मंडले पात्र ठरली होती. या मंडलांतील शेतकऱ्यांना पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनीही पीक विमा कंपन्यांबरोबर बैठक घेऊन सूचना केली होती. त्यानंतर आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील ६३ मंडलांतील तीन पिकांसाठी २५ टक्के अग्रिम देण्यात आले आहे. यामध्ये भात, बाजरी आणि नाचणी पिकांचा समावेश आहे; पण खरिपातील इतर पिकांसाठी अग्रिम मिळालाच नाही. त्यातच आता केंद्रीय तांत्रिक सल्लगार समितीने अग्रिम फेटाळल्याने पीक कापणी प्रयोगावरच विमा रक्कम ठरणार आहे.

अग्रिमसाठी पावणेदोन लाख शेतकरी..जिल्ह्यातील ६३ महसूल मंडलांत सलग २१ किंवा त्याहून अधिक दिवस पावसाचा खंड पडलेला. त्यामुळे नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळण्याची शक्यता होती. जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७३ हजार शेतकरी त्यासाठी पात्र ठरणार होते; पण विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्याने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त पातळीवरही बैठक झाली होती.

९ पिकांसाठी होती विमा योजना

जिल्ह्यात खरीप हंगामात विमा कंपन्यांनी ९ पिकांसाठी योजना राबविली होती. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, कांदा या पिकांचा समावेश होता. यातील बाजरी, भात आणि नाचणीसाठीच अग्रिम दिलेला आहे.

आतापर्यंत साडेतीन कोटी मिळालेजिल्ह्यातील अग्रिमसाठी आतापर्यंत तीन पिकांना साडेतीन कोटी रुपये मिळाले आहेत, तर बाजरी पीक घेतलेल्या आणि अग्रिमसाठी पात्र ठरलेल्या महसूल मंडलांतील शेतकऱ्यांनाच सुमारे तीन कोटी मिळालेत. यातून १३ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे.

२०२३ च्या खरीप हंगामातील अग्रिम केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळला आहे. आता पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीक कापणी प्रयोगाचे संकलन कृषी आयुक्त पातळीवर पाठविण्यात आले आहे. त्यानंतर विमा कंपन्यांकडे अहवाल गेल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. -भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी