शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चाचण्या कमी झाल्या नव्हे अधिकच वाढल्या; पॉझिटिव्हिटी दर पंधरा टक्के कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्क: सातारा: कोरोना चाचण्या कमी झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहायला मिळत ...

लोकमत न्यूज नेटवर्क:

सातारा: कोरोना चाचण्या कमी झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सातारा जिल्ह्यात याहून उलट परिस्थिती असून कोरोना चाचण्या अधिक वाढवल्या जात आहेत. त्यामुळे बाधितांची संख्याही आणखीनच वाढत आहे. परिणामी पॉझिटिव्हिटीचा दर १५ टक्के कायम राहिला आहे.

जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र साताऱ्यात रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. रोज हजार ते दोन हजारजणांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. अनेक जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट होत आहेत. अँटिजन टेस्टमध्ये अनेकजण निगेटिव्ह येत आहेत. मात्र त्याच व्यक्तीची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसून येत आहे.

प्रत्यक्षात चाचण्या कमी झाल्याने असे घडत असल्याचे दिसून येत आहे.

विशेषता जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. या ठिकाणी दिवसाला दीड हजार ते दोन हजार चाचण्या होत आहेत. अद्यापही चाचण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. जितक्या गतीने चाचण्या केल्या जात आहेत. तितक्या पटीने रुग्ण संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

चौकट: ग्रामीण भागात टेस्टिंग कमीच!

ग्रामीण भागामध्ये कोरोना चाचणी करण्यास ग्रामस्थ पुढे येत नाहीत. आपल्याला कोरोना झाला आहे, हे गावात समजले तर आपल्याला वाळीत टाकतील. आपल्याशी कोणीही बोलायचे नाही, अशी भीती ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकजण कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्णालयात जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोना चाचण्या कमी होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

चौकट: अँटिजन टेस्टपेक्षा आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह!

अँटिजन टेस्टच्या तुलनेत आरटीपीसीआर टेस्टमध्ये सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. बऱ्याचदा एंटीजन टेस्ट लोकांच्या निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे लोक काही झाले नाही, असे समजून घरी जात आहेत. घरात गेल्यानंतर त्रास होऊ लागल्यानंतर लोक पुन्हा रुग्णालयात येत आहेत. अशावेळी जर संबंधित रुग्णाने आरटीपीसीआर टेस्ट केली तर त्याचीही टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडत आहेत.

कोट: इतर जिल्ह्यात कोरोना चाचण्या वेगाने होत आहेत की नाही हे माहिती नाही. मात्र आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना चाचणीवर अधिक भर देण्यात आला आहे. अत्यंत वेगाने चाचण्या करण्यात येत आहेत. लसीकरणही करण्यात येत आहे. लवकरात लवकर करून ही लाट आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक सातारा