शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
4
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
5
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
6
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
7
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
8
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
9
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
10
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
11
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
13
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
14
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
15
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
16
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
17
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
19
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

दहावीची परीक्षा.. टेन्शन काय को !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:26 IST

सातारा : शालेय जीवनातून महाविद्यालयीन आयुष्यात जाण्याची मोठी पायरी म्हणजे दहावीची परीक्षा. या परीक्षेचा अनेक घरांमध्ये इतका बाऊ होतो ...

सातारा : शालेय जीवनातून महाविद्यालयीन आयुष्यात जाण्याची मोठी पायरी म्हणजे दहावीची परीक्षा. या परीक्षेचा अनेक घरांमध्ये इतका बाऊ होतो की, पालकांच्या चेहऱ्यावरील ताण पाहून बिच्चारे विद्यार्थीच गांगरून जातात. त्यामुळे बोर्डाची परीक्षा म्हणून सामाजिक दबावाने भेदरलेला विद्यार्थी पुरता गोंधळून जातो. दहावी बोर्ड टेन्शन काय को लेने का? अशी मानसिकता पालकांची झाली तरच विद्यार्थी या परीक्षा तणावरहित वातावरणात देऊ शकतील.महाविद्यालय प्रवेशाची पायरी म्हणून दहावीच्या परीक्षांकडे पाहिले जाते. त्यामुळे येथे काही कमी अधिक झाले तर महाविद्यालयीन एन्ट्री लांबली, ही मानसिकता दहावीत प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यात वर्षभर विविध कारणांनी येणाºया पै-पाहुण्यांचे लेक्चर आणि शेजाºयांच्या खत पाण्यामुळे तर विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढत जातो. सामान्य परीक्षांसारखी ही परीक्षा आहे, त्यासाठी आवश्यक अभ्यास करा इतकंच विद्यार्थ्यांना सांगितले तरी पुरेसे ठरते.आपली शाळा सोडून अन्य शाळांमध्ये परीक्षेची व्यवस्था असल्याने काहीदा विद्यार्थ्यांवर त्याचाही ताण राहतो.विद्यार्थ्यांच्या या ताणाचा कुठेच विचार होत नाही. याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं बनत आहे.परीक्षेवेळी मुलांनी घ्यावयाची खबरदारीपरीक्षेच्या अगोदरच्या दिवशी पूर्ण प्रकरण न वाचता नोट्सची उजळणी करा.नवीन काही वाचू नका. संकेत शब्द, सूक्ष्म टिपणे, आकृत्या, नकाशे, तक्ते यांचे धावते निरीक्षण करा.झोप पूर्ण व सलग घ्या. जागरण टाळा. पहाटेपासूनच शांत व उत्साही वातावरणात अभ्यासाला सुरुवात करा.परीक्षेला लागणाºया आवश्यक साहित्याची जमवाजमव करा. सर्व साहित्य एकाच ठिकाणी ठेवा. कपड्यांना इस्त्री व बुटाला पॉलीस करून ठेवा.परीक्षा देताना खूप सोपे प्रश्न असतील तर खूप घाई करू नका.अवघड प्रश्न असेल तरी घाबरू नका. त्याला सामोरे जा. तुम्हाला ते अवघड वाटत असतील तर ते इतरांनाही अवघड असतात. त्यातल्या त्यात जो धीराने त्या प्रश्नाला सामोरे जातो, उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो, तो अधिकगुण मिळवतो. जो त्याचा ताण घेतो, तो अधिक चुका करतो.कसाही प्रश्न असेल तरी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन. शेवटच्या आत्मविश्वासाने मी पेपर लिहीन, असा निर्धार सातत्याने करा.चुकूनही कॉपी करू नका, कोणी आग्रह करत असेल तरीही करू नका. इतर विद्यार्थी कॉपी करतात, तेव्हा आपल्याला वाटते की, ते आपल्या पुढे जातील; पण अशा मुलांचा पाया कच्चा असल्याने ते भविष्यात मागे पडतात. त्यामुळे तुम्ही प्रामाणिक प्रयत्नांनी पुढे जा.उत्तरपत्रिका सोडविताना सुवाच्च अक्षरात आपला परीक्षा क्रमांक, दिनांक, केंद्र अशी सर्व माहिती अचूक भरा.बारकोड चिटकवण्यापूर्वी आपलाच असल्याची खात्री करा.उत्तरपत्रिकेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा.निळ्या किंवा काळ्या शाईच्याच पेनचा करा.सोपे प्रश्न लक्षात घ्या. प्रश्नांची निवड महत्त्वाची असते.विचारले तेच व तेवढेच लिहा. पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण होतो.प्रश्नांचा क्रमांक अथवा उपप्रश्न क्रमांक ठळक अक्षरात ठेवा.उत्तराचा आराखडा मनात तयार करा.उत्तरप्रत्रिकेवर कोठेही डाग पाडू नका. परीक्षकांसाठी सूचना लिहू नका.परीक्षेला निघतानापरीक्षेला निघताना आवश्यक सर्व साहित्य सोबत घ्या. ओळखपत्र, हॉल तिकीट, पेन (किमान तीन), पेन्सिल ,शार्पनर, स्केल, लाँगरिथम, कंपासबॉक्स, खोडरबर, पँड, पाण्याची बाटली, रुमाल, घड्याळ, गरजेनुसार पैसे सोबत ठेवावेत.हलका आहार घ्यावा. (साधी पोळी, भाजी, वरणभात). पोटभर न खाता थोडी भूक शिल्लक ठेवा.रस्त्यातील वाहतूक, ट्रॅफिक जॅमचा विचार करून योग्य वेळेत निघा.सायकलने प्रवास करत असाल तर रुमाल/टोपी वापरा. मोटारसायकलने जात असाल तर हेल्मेट अवश्य घाला.परीक्षेच्या अर्धा तास आधी सेंटरवर पोहोचा.परीक्षा हॉलमध्येपरीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका हातात पडेपर्यंतचा संपूर्ण काळ मानसिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो, हे लक्षात ठेवा. यासाठी मन स्थिर ठेवा. जो अभ्यास आपण केलेला आहे, तेवढे आपण निश्चितपणे लिहू शकतो, यावर विश्वास ठेवा.मागे काय झाले, पुढे काय होईल, याची चिंता न करता शांत बसा. कोणतीच प्रश्नोत्तरे आठवण्याचा प्रयत्न करू नका.परीक्षा झाल्यावरपेपरनंतर उतरांबाबत मित्रांसोबत चर्चा टाळा.किती गुण मिळतील, यांची बेरीज करीत बसू नका.काही उत्तरे चुकली असल्यास त्यांचा विचार न करता जे बरोबर लिहिले आहे, त्यावर समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.झालेल्या पेपरची चिंता न करता पुढच्या पेपरची तयारी सुरू करा.