शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

दहावीची परीक्षा.. टेन्शन काय को !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:26 IST

सातारा : शालेय जीवनातून महाविद्यालयीन आयुष्यात जाण्याची मोठी पायरी म्हणजे दहावीची परीक्षा. या परीक्षेचा अनेक घरांमध्ये इतका बाऊ होतो ...

सातारा : शालेय जीवनातून महाविद्यालयीन आयुष्यात जाण्याची मोठी पायरी म्हणजे दहावीची परीक्षा. या परीक्षेचा अनेक घरांमध्ये इतका बाऊ होतो की, पालकांच्या चेहऱ्यावरील ताण पाहून बिच्चारे विद्यार्थीच गांगरून जातात. त्यामुळे बोर्डाची परीक्षा म्हणून सामाजिक दबावाने भेदरलेला विद्यार्थी पुरता गोंधळून जातो. दहावी बोर्ड टेन्शन काय को लेने का? अशी मानसिकता पालकांची झाली तरच विद्यार्थी या परीक्षा तणावरहित वातावरणात देऊ शकतील.महाविद्यालय प्रवेशाची पायरी म्हणून दहावीच्या परीक्षांकडे पाहिले जाते. त्यामुळे येथे काही कमी अधिक झाले तर महाविद्यालयीन एन्ट्री लांबली, ही मानसिकता दहावीत प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यात वर्षभर विविध कारणांनी येणाºया पै-पाहुण्यांचे लेक्चर आणि शेजाºयांच्या खत पाण्यामुळे तर विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढत जातो. सामान्य परीक्षांसारखी ही परीक्षा आहे, त्यासाठी आवश्यक अभ्यास करा इतकंच विद्यार्थ्यांना सांगितले तरी पुरेसे ठरते.आपली शाळा सोडून अन्य शाळांमध्ये परीक्षेची व्यवस्था असल्याने काहीदा विद्यार्थ्यांवर त्याचाही ताण राहतो.विद्यार्थ्यांच्या या ताणाचा कुठेच विचार होत नाही. याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं बनत आहे.परीक्षेवेळी मुलांनी घ्यावयाची खबरदारीपरीक्षेच्या अगोदरच्या दिवशी पूर्ण प्रकरण न वाचता नोट्सची उजळणी करा.नवीन काही वाचू नका. संकेत शब्द, सूक्ष्म टिपणे, आकृत्या, नकाशे, तक्ते यांचे धावते निरीक्षण करा.झोप पूर्ण व सलग घ्या. जागरण टाळा. पहाटेपासूनच शांत व उत्साही वातावरणात अभ्यासाला सुरुवात करा.परीक्षेला लागणाºया आवश्यक साहित्याची जमवाजमव करा. सर्व साहित्य एकाच ठिकाणी ठेवा. कपड्यांना इस्त्री व बुटाला पॉलीस करून ठेवा.परीक्षा देताना खूप सोपे प्रश्न असतील तर खूप घाई करू नका.अवघड प्रश्न असेल तरी घाबरू नका. त्याला सामोरे जा. तुम्हाला ते अवघड वाटत असतील तर ते इतरांनाही अवघड असतात. त्यातल्या त्यात जो धीराने त्या प्रश्नाला सामोरे जातो, उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो, तो अधिकगुण मिळवतो. जो त्याचा ताण घेतो, तो अधिक चुका करतो.कसाही प्रश्न असेल तरी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन. शेवटच्या आत्मविश्वासाने मी पेपर लिहीन, असा निर्धार सातत्याने करा.चुकूनही कॉपी करू नका, कोणी आग्रह करत असेल तरीही करू नका. इतर विद्यार्थी कॉपी करतात, तेव्हा आपल्याला वाटते की, ते आपल्या पुढे जातील; पण अशा मुलांचा पाया कच्चा असल्याने ते भविष्यात मागे पडतात. त्यामुळे तुम्ही प्रामाणिक प्रयत्नांनी पुढे जा.उत्तरपत्रिका सोडविताना सुवाच्च अक्षरात आपला परीक्षा क्रमांक, दिनांक, केंद्र अशी सर्व माहिती अचूक भरा.बारकोड चिटकवण्यापूर्वी आपलाच असल्याची खात्री करा.उत्तरपत्रिकेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा.निळ्या किंवा काळ्या शाईच्याच पेनचा करा.सोपे प्रश्न लक्षात घ्या. प्रश्नांची निवड महत्त्वाची असते.विचारले तेच व तेवढेच लिहा. पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण होतो.प्रश्नांचा क्रमांक अथवा उपप्रश्न क्रमांक ठळक अक्षरात ठेवा.उत्तराचा आराखडा मनात तयार करा.उत्तरप्रत्रिकेवर कोठेही डाग पाडू नका. परीक्षकांसाठी सूचना लिहू नका.परीक्षेला निघतानापरीक्षेला निघताना आवश्यक सर्व साहित्य सोबत घ्या. ओळखपत्र, हॉल तिकीट, पेन (किमान तीन), पेन्सिल ,शार्पनर, स्केल, लाँगरिथम, कंपासबॉक्स, खोडरबर, पँड, पाण्याची बाटली, रुमाल, घड्याळ, गरजेनुसार पैसे सोबत ठेवावेत.हलका आहार घ्यावा. (साधी पोळी, भाजी, वरणभात). पोटभर न खाता थोडी भूक शिल्लक ठेवा.रस्त्यातील वाहतूक, ट्रॅफिक जॅमचा विचार करून योग्य वेळेत निघा.सायकलने प्रवास करत असाल तर रुमाल/टोपी वापरा. मोटारसायकलने जात असाल तर हेल्मेट अवश्य घाला.परीक्षेच्या अर्धा तास आधी सेंटरवर पोहोचा.परीक्षा हॉलमध्येपरीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका हातात पडेपर्यंतचा संपूर्ण काळ मानसिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो, हे लक्षात ठेवा. यासाठी मन स्थिर ठेवा. जो अभ्यास आपण केलेला आहे, तेवढे आपण निश्चितपणे लिहू शकतो, यावर विश्वास ठेवा.मागे काय झाले, पुढे काय होईल, याची चिंता न करता शांत बसा. कोणतीच प्रश्नोत्तरे आठवण्याचा प्रयत्न करू नका.परीक्षा झाल्यावरपेपरनंतर उतरांबाबत मित्रांसोबत चर्चा टाळा.किती गुण मिळतील, यांची बेरीज करीत बसू नका.काही उत्तरे चुकली असल्यास त्यांचा विचार न करता जे बरोबर लिहिले आहे, त्यावर समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.झालेल्या पेपरची चिंता न करता पुढच्या पेपरची तयारी सुरू करा.