शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हृदयद्रावक! सातारचा २२ वर्षीय 'वीरपुत्र' देशासाठी शहीद; ५ दिवसांपूर्वीच यात्रेसाठी आला होता गावी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 20:14 IST

tejas mankar news : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील २२ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे. 

tejas mankar indian army । सातारा : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील २२ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे. तेजस लहुराज मानकर हा वीरपुत्र पंजाब भटिंडा कॅम्पमध्ये देशसेवेसाठी तैनात असताना डोक्यात गोळी लागली असता शहीद झाला. खरं तर तेजसला उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासाअंती तेजसला मृत घोषित केले. लक्षणीय बाब म्हणजे तेसस ज्या कॅम्पमध्ये तैनात होता तिथे झालेल्या गोळीबारात एकूण चार जवान शहीद झाले आहेत.

५ दिवसांपूर्वी होता गावात अन्...दरम्यान, तेजस अलीकडेच यात्रेसाठी गावी आला होता. गावची यात्रा उरकून तो पुन्हा देशसेवासाठी रूजू झाला पण सुट्टीवरून गेल्यानंतर पाचच दिवसांत तो देशासाठी शहीद झाल्याचे वृत्त समोर आले. घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच गावकऱ्यांसह जावली तालुक्यावर शोककळा पसरली. जाबमधील भंटिडा लष्करी छावणीत गोळीबार कुणी केला. याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

कुटुंबाचा वारसा जपणारा तेजस देशासाठी शहीद मात्र, तूर्त लष्कराने याला दहशतवादी हल्ला म्हटलेले नाही. या गोळीबाराच्या घटनेत तेजस मानकर याच्या डोक्याला गोळी लागली होती. शहीद जवानांना गोळी कशी लागली याबाबत देखील पोलिसांचे पथक अधिक तपास करत आहे. तेजस हा दोन वर्षांपूर्वीच लष्करात भरती झाला होता. त्याचे वडील देखील सैन्यदलात कार्यरत होते, ते मेजर पदावरुन निवृत्त झाले आहेत. याशिवाय त्याचा भाऊ देखील सध्या सैन्यदलात असून देशसेवा बजावत आहे. सैनिकांची धरती म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या सातारचा आणखी एक जवान शहीद झाल्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :satara-acसाताराIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकMartyrशहीद