शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

शिक्षक बदलीचा बार दिवाळीनंतरही फुसकाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 14:35 IST

ग्रामीण भागात भौतिक सुविधा पुरेशा नसतानाही प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम ठेवण्याचे काम प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत. अशा शिक्षण खात्यात ग्रामविकास विभागाने एका क्लीकवर बदलीची प्रक्रिया थेट मंत्रालयातून सुरू केली आहे. परंतु ही प्रक्रिया अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी पूर्ण झाली नाही. दिवाळीनंतर बदल्यांचा हा फटाका फुटेल, अशी आशा होती. मात्र, तीही आता फोल ठरली आहे.

ठळक मुद्देबदलीची प्रक्रिया अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी पूर्ण नाहीशासन आदेशामुळे शिक्षक संभ्रमाततिसरा संवर्ग पुन्हा एकदा गोत्यात तर चौथा जात्यातच

सायगाव ,दि. २५ : ग्रामीण भागात भौतिक सुविधा पुरेशा नसतानाही प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम ठेवण्याचे काम प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत. अशा शिक्षण खात्यात एका क्लीकवर बदलीची प्रक्रिया थेट मंत्रालयातून ग्रामविकास विभागाने सुरू केली आहे. परंतु ही प्रक्रिया अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी पूर्ण झाली नाही. दिवाळीनंतर बदल्यांचा हा फटाका फुटेल, अशी आशा होती. मात्र, तीही आता फोल ठरली आहे.

संवर्ग तीन व चारमधील बदली पात्र शिक्षकांना आॅनलाईन फॉर्म बदली पोर्टलवर भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे फॉर्म भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळी सुटीही शिक्षकांना संगणकावर माहिती भरण्याच्या कामाताच घालवावी लागत आहे.

गेल्या चार दिवसांपासून शिक्षकांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे बदली पोर्टलच्या सावळ्या गोंधळात शिक्षक भरडला जात आहे. जावळी, महाबळेश्वर, पाटणसारख्या दुर्गम तालुक्यात नेट कॅफेच नसल्यामुळे येथील शिक्षकांना सातारा शहरात येऊन किंवा तालुक्याच्या ठिकाणी येऊनच माहिती भरावी लागत आहे.

सध्या पोर्टलवर माहिती भरताना अनेक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागत आहे. त्यातच ही माहिती भरण्यासाठी २५ आॅक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आल्याने शिक्षकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या पोर्टलवर शिक्षक वेळेत माहिती भरूच शकत नाहीत.

यासंदर्भात शिक्षक समिती, संघटनांमधून आॅफलाईन फॉर्म घेऊन बदली प्रकिया करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. एकव दोन संवर्गातील बदल्या पूर्ण झाल्यामुळे ते शिक्षक सुपात आहेत. तर तिसरा संवर्ग पुन्हा एकदा पोर्टल भरायला लावल्यामुळे गोत्यात तर चौथा जात्यातच आहे. अशी परिस्थिती प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची झाली आहे.शासन आदेशामुळे शिक्षक संभ्रमातजिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन आदेशानुसार नवीन धोरण तयार करण्यात आले. मात्र, मे २०१७ मध्ये होणºया या बदल्यांना न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होत गेला. त्यामुळे शासनाने यावर्षी कमीत-कमी बदल्यांच्या अनुषंगाने १२ सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय काढला. या निर्णयाला संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायालयाने शासनाच्या १२ सप्टेंबरच्या शासन आदेशास स्थगिती दिल्यामुळे शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या या २७ फेब्रुवारीच्या धोरणानुसारच करण्यात याव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हाअंतर्गत शिक्षक बदल्याच्या संख्येत वाढ होणार, हे निश्चित.

शासनाने संवर्ग निर्माण करून शिक्षकांमध्ये एकप्रकारे फूट पडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शासनाचा बदल्यांचा हेतू शुद्ध नाही. बदलीचा खरा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाच आहे. तरी देखील मंत्रालय स्तरावरून ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यातही ज्या तांत्रिक बाबी राहत आहेत.- दीपक भुजबळ, जिल्हा अध्यक्ष (दोंदे गट)अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली