शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

टँकरने पाणी देऊन जगवली झाडे । दुष्काळाचा सामना करण्यासाठी एक पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 21:32 IST

आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देटाकोबाईचीवाडीत उपक्रम

सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : भयानक दुष्काळाचे चटके सोसत असताना निम्मे गाव पाणी टंचाईमुळे बाहेर पडले. त्याचा विचार करून ग्रामपंचायतीने त्याची कारणे शोधून वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. मात्र जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तरीही एक हजार खड्डे खोदून विविध प्रकारची झाडे लावून टँकरद्वारे पाणी घालून गाव हिरवेगार करण्याचा ध्यास टाकोबाईचीवाडीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतला आहे.

टाकोबाईचीवाडीचे सरपंच विशाल झणझणे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीने पाच वर्षांमध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रमातून शेकडो हेक्टरवर समतल चर खोदली. पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृषी विभाग, कमिन्स कंपनी व श्रमदानातून पाच-सहा सिमेंट बंधारे बांधले. काही दुरुस्त करून त्यामधील गाळ काढला. त्यामध्ये पाणीसाठा झाला. बंधाऱ्यात पाणीसाठा झाल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे भयानक दुष्काळात पाणी टंचाई कमी प्रमाणात भासली.

जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असताना ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सा'ाने काळुबाई मंदिरापर्यंत खड्डे खोदले. मुरमाड व खडकाळ जमीन असल्याने एक हजारपैकी शंभर खड्डे भूसुरुंगद्वारे काढण्यात आले. त्यामध्ये बंधाºयातील गाळ भरून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे.गाव पाणीदार तसाच.. हिरवागारही होणारटाकोबाईचीवाडी गाव मुरबाड व खडकावर वसले आहे. येथे दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अर्र्धा गाव शहरात गेले आहे. धोम-बलकवडी पाणी, ओढाजोड प्रकल्पामुळे गाव हिरवेगार झाले आहे. पण झाडांची संख्या कमी असल्याने दहा वर्षांपासून ग्रामस्थांनी झाडे लावली आहेत. टाकोबाईचीवाडीच्या झाडाला तारक ठरला. झाडांची वाढ पाच महिन्यांत चार-पाच फुटांपर्यंत झाली आहे. आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

गाव दुष्काळी छायेत असताना सावली बचत गटाने दहा वर्षांपूर्वी जनावरांची छावणी सुरू केली होती. तेव्हा झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करून छावणीच्या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती.- विलासराव झणझणे, माजी सरपंच, टाकोबाईचीवाडी

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater transportजलवाहतूक