शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

टँकरने पाणी देऊन जगवली झाडे । दुष्काळाचा सामना करण्यासाठी एक पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 21:32 IST

आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देटाकोबाईचीवाडीत उपक्रम

सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : भयानक दुष्काळाचे चटके सोसत असताना निम्मे गाव पाणी टंचाईमुळे बाहेर पडले. त्याचा विचार करून ग्रामपंचायतीने त्याची कारणे शोधून वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. मात्र जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तरीही एक हजार खड्डे खोदून विविध प्रकारची झाडे लावून टँकरद्वारे पाणी घालून गाव हिरवेगार करण्याचा ध्यास टाकोबाईचीवाडीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतला आहे.

टाकोबाईचीवाडीचे सरपंच विशाल झणझणे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीने पाच वर्षांमध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रमातून शेकडो हेक्टरवर समतल चर खोदली. पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृषी विभाग, कमिन्स कंपनी व श्रमदानातून पाच-सहा सिमेंट बंधारे बांधले. काही दुरुस्त करून त्यामधील गाळ काढला. त्यामध्ये पाणीसाठा झाला. बंधाऱ्यात पाणीसाठा झाल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे भयानक दुष्काळात पाणी टंचाई कमी प्रमाणात भासली.

जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असताना ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सा'ाने काळुबाई मंदिरापर्यंत खड्डे खोदले. मुरमाड व खडकाळ जमीन असल्याने एक हजारपैकी शंभर खड्डे भूसुरुंगद्वारे काढण्यात आले. त्यामध्ये बंधाºयातील गाळ भरून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे.गाव पाणीदार तसाच.. हिरवागारही होणारटाकोबाईचीवाडी गाव मुरबाड व खडकावर वसले आहे. येथे दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अर्र्धा गाव शहरात गेले आहे. धोम-बलकवडी पाणी, ओढाजोड प्रकल्पामुळे गाव हिरवेगार झाले आहे. पण झाडांची संख्या कमी असल्याने दहा वर्षांपासून ग्रामस्थांनी झाडे लावली आहेत. टाकोबाईचीवाडीच्या झाडाला तारक ठरला. झाडांची वाढ पाच महिन्यांत चार-पाच फुटांपर्यंत झाली आहे. आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

गाव दुष्काळी छायेत असताना सावली बचत गटाने दहा वर्षांपूर्वी जनावरांची छावणी सुरू केली होती. तेव्हा झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करून छावणीच्या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती.- विलासराव झणझणे, माजी सरपंच, टाकोबाईचीवाडी

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater transportजलवाहतूक