शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भिलारच्या साहित्य संमेलनाची चर्चा सातारकरांना विश्वासात न घेताच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:38 PM

सातारा : पुढील वर्षीचे अखिल भारतीय साहित्य संमेलन साताºयात व्हावे, अशा मागणीचे पत्र साताºयातील स्थानिक साहित्यिक मंडळींनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिले आहे.

सातारा : पुढील वर्षीचे अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावे, अशा मागणीचे पत्र साताऱ्यातील स्थानिक साहित्यिक मंडळींनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिले आहे. मात्र, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी परस्पर हे संमेलन भिलारला घेण्याची मागणी केल्यामुळे सातारकर चक्रावले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यापूर्वीचे जिल्ह्यातील संमेलन महाबळेश्वरमध्ये झाले होते. त्यामुळे आता जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावे, असा मुद्दा पुढे आलेला असतानाच बडोदा येथील संमेलनात मंत्री तावडे यांनी केलेली मागणी सातारकरांसाठी धक्कादायक ठरली आहे.

‘बडोद्यानंतरचे पुढचे साहित्य संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे, अशी इच्छा आहे. या संमेलनाची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल आणि संमेलनाचे अनुदानही निश्चितच वाढविण्यात येईल,’ असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच केले होते. बडोदा येथे सुरू झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या या मागणी नंतर साताºयाच्या साहित्य क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून, सरकारने साहित्य संमेलन आयोजित करण्याच्या भानगडीत पडू नये, अशी आक्रमक भूमिका व्यक्त केली जात आहे.

भिलारला पुस्तकांचं गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने नावारुपाला आणले आहे. मात्र, हा प्रकल्प राबविताना सातारा जिल्ह्यातील स्थानिक साहित्यिकांना विश्वासात घेतले न गेल्याची पूर्वीपासूनच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भिलार साहित्य संमेलनाचा मुद्दा अकस्मातपणे पुढे आणून मंत्री तावडे काय साध्य करू पाहत आहेत, असाही सवाल साहित्यिकांनी विचारला आहे.

भिलारच्या पुस्तक प्रकल्पामुळे तावडे यांची प्रतिमा उंचावली तर आम्हाला आनंदच आहे. मात्र सातारा जिल्ह्यात होणाºया आगामी संमेलनाबाबत जिल्ह्यातील साहित्यिकांना विश्वासात घेतल्याशिवाय तावडे यांनी परस्पर कोणतीही घोषणा करू नये, असाही सल्ला साताºयातील स्थानिक साहित्यिकांनी दिला आहे. 

पुढील वर्षीचे संमेलन साताºयात व्हावे, अशा ठरावाचे पत्रही ‘मसाप’ने यापूर्वीच सादर केले आहे. मात्र, भिलारला संमेलन घेण्याची मागणी करणाºया तावडे यांनी आमच्याशी किमान चर्चा तरी करायला हवी होती.-विनोद कुलकर्णी, मसाप.  अध्यक्ष, शाहूपुरीभिलारच्या संमेलनाची संपूर्ण जबाबदारी उचलू पाहणाºया तावडेंनी सर्व प्रथम राज्यातील ग्रंथालयांना अनुदान देण्याचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडावे. सरकारने संमेलनाला अनुदान देणे वगळता बाकीच्या नसत्या फंद्यात पडू नये.-मिलिंद जोशी, मसाप,  कार्याध्यक्ष, महाराष्ट्र