शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

किरकसालच्या उरमोडी पाण्यात अंघोळ करा !

By admin | Updated: January 15, 2016 00:15 IST

जयकुमारांचा विरोधकांना टोला : कोकलणारे कुठं गेले ?; माण तालुक्यातील कालव्यात कार्यकर्त्यांसह पाणीपूजन

दहिवडी : ‘आजपर्यंत उरमोडी योजनेची काडीमात्र माहिती नसणाऱ्या, माण-खटावमधील दुष्काळी जनतेविषयी आत्मीयता नसलेल्या रिकामटेकड्यांनी पाणी कुठे आहे? अशी विचारणा करीत जनतेच्या भावनांशी खेळ केला. आज पुन्हा एकदा उरमोडीचे पाणी माणच्या मातीत आणण्यात आम्हाला यश आले आहे. यापुढेही हे पाणी आवर्तनानुसार माण-खटाव तालुक्यांना मिळवून देणार,’असा विश्वास आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. उरमोडीच्या पाण्याबाबत उठसूट कोकलणारे आता कुठे आहेत? त्यांनी या पाण्यात एकदा अंघोळ करावीच, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.किरकसाल, ता. माण येथे उरमोडी योजनेच्या पाण्याचे पूजन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दाभाडकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, बाजार समिती सभापती अरुण गोरे, नगराध्यक्ष विजय धट, अर्जुन काळे, विजय सिन्हा, पंचायत समिती सदस्या सुवर्णा पवार, दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, राजू पोळ, बाबासाहेब हुलगे, हरिभाऊ जगदाळे, प्रशांत वायदंडे, शिवाजीराव जगदाळे, भानुदास कदम, डी. एस. काळे, अरुण शिंदे, विठ्ठलराव भोसले, बाळासाहेब काटकर, चंद्रकांत खाडे, अ‍ॅड. दत्ता हांगे, दिगंबर राजगे, बाळासाहेब पिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.आ. गोरे म्हणाले, ‘माण-खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक पुसण्याचा निश्चय करूनच मी राजकारण-समाजकारणात आलो. पाण्यासाठी टाहो फोडणारी माझ्या मतदार संघातील जनता खूप सहनशील आहे. त्यांच्या सहनशीलतेचा फायदा घेत आजपर्यंत अनेकांनी पाण्याचे फक्त राजकारण केले. मला मात्र माझ्या माण-खटावच्या मातीतून बारामती, फलटण, सांगलीसारखे पाण्याने भरलेले कॅनॉल वाहताना पाहायचे होते. इथल्या स्वाभिमानी जनतेलाही मी तेच स्वप्न दाखविले होते. गेल्या सहा-सात वर्षांत याच स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेने प्रयत्न केले. उरमोडी योजनेसाठी लागणारा निधी आघाडी सरकारच्या काळात मिळविण्यात यश आले. कॅनॉल आणि पंपहाउसची कामे मोठ्या परिश्रमाने मार्गी लावली. पहिल्यांदा आमदार झाल्यावर ‘साडेतीन वर्षांत मतदारसंघात पाणी आणेन,’ असा शब्द मी जनतेला दिला होता. पावणेतीन वर्षांतच उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात आणून मी दिलेला शब्द खरा केला होता.२०११-१२ मध्ये कण्हेर जोड कालव्याची कामे युद्धपातळीवर करून ऐन दुष्काळात सलग २७९ दिवस उरमोडीचे पाणी येरळवाडी तलावात सोडून टंचाईवर मात केली होती. त्यानंतर पंपहाउस एक व दोन येथे नवीन पंप बसवून पूर्ण क्षमतेने पाणी तालुक्यात नेण्यासाठी प्रयत्न केले. २४ आॅगस्ट २०१४ रोजी उरमोडीचे पाणी पहिल्यांदा माण तालुक्यात पोहोचले. हजारोंच्या जनसमुदायाने मोठ्या आनंदाने माण तालुक्यात प्रथमच आलेल्या पाण्याचे स्वागत केले होते. उरमोडीचे पाणी पूर्ण क्षमतेने येण्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. कॅनॉल, पोटपोटाची कामे अपूर्ण होती. नवीन पंप बसवायचे होते. भूसंपादनाबाबत अडचणी होत्या. माझे सर्व ताकदीने प्रयत्न सुरू होते.’ (प्रतिनिधी)पाणी पाहण्यासाठी लोंढे कालव्याकडे...सुमारे दीड वर्षापूर्वी २४ आॅगस्ट २०१४ रोजी माण तालुक्यातील किरकसालच्या बोगद्यातून पहिल्यांदा उरमोडीचे पाणी तालुक्यात पोहचले होते. त्यादिवशी माण-खटावमधील जनतेने गर्दी करुन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पाणी पूजनाचा सोहळा अनुभवला होता. त्याचपद्धतीने आत्ताही उरमोडी योजनेचे पाणी पुन्हा माण तालुक्यात आले आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी या पाण्याचे पूजन केले. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. जानेवारी महिन्यात आमच्या भागातून उरमोडीचा कॅनॉल वाहतोय, हे पाहून आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळावर मात करताना आमची शेतीही पिकणार आहे. -महादेव अवघडे, शेतकरी किरकसाल