शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

किरकसालच्या उरमोडी पाण्यात अंघोळ करा !

By admin | Updated: January 15, 2016 00:15 IST

जयकुमारांचा विरोधकांना टोला : कोकलणारे कुठं गेले ?; माण तालुक्यातील कालव्यात कार्यकर्त्यांसह पाणीपूजन

दहिवडी : ‘आजपर्यंत उरमोडी योजनेची काडीमात्र माहिती नसणाऱ्या, माण-खटावमधील दुष्काळी जनतेविषयी आत्मीयता नसलेल्या रिकामटेकड्यांनी पाणी कुठे आहे? अशी विचारणा करीत जनतेच्या भावनांशी खेळ केला. आज पुन्हा एकदा उरमोडीचे पाणी माणच्या मातीत आणण्यात आम्हाला यश आले आहे. यापुढेही हे पाणी आवर्तनानुसार माण-खटाव तालुक्यांना मिळवून देणार,’असा विश्वास आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. उरमोडीच्या पाण्याबाबत उठसूट कोकलणारे आता कुठे आहेत? त्यांनी या पाण्यात एकदा अंघोळ करावीच, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.किरकसाल, ता. माण येथे उरमोडी योजनेच्या पाण्याचे पूजन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दाभाडकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, बाजार समिती सभापती अरुण गोरे, नगराध्यक्ष विजय धट, अर्जुन काळे, विजय सिन्हा, पंचायत समिती सदस्या सुवर्णा पवार, दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, राजू पोळ, बाबासाहेब हुलगे, हरिभाऊ जगदाळे, प्रशांत वायदंडे, शिवाजीराव जगदाळे, भानुदास कदम, डी. एस. काळे, अरुण शिंदे, विठ्ठलराव भोसले, बाळासाहेब काटकर, चंद्रकांत खाडे, अ‍ॅड. दत्ता हांगे, दिगंबर राजगे, बाळासाहेब पिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.आ. गोरे म्हणाले, ‘माण-खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक पुसण्याचा निश्चय करूनच मी राजकारण-समाजकारणात आलो. पाण्यासाठी टाहो फोडणारी माझ्या मतदार संघातील जनता खूप सहनशील आहे. त्यांच्या सहनशीलतेचा फायदा घेत आजपर्यंत अनेकांनी पाण्याचे फक्त राजकारण केले. मला मात्र माझ्या माण-खटावच्या मातीतून बारामती, फलटण, सांगलीसारखे पाण्याने भरलेले कॅनॉल वाहताना पाहायचे होते. इथल्या स्वाभिमानी जनतेलाही मी तेच स्वप्न दाखविले होते. गेल्या सहा-सात वर्षांत याच स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेने प्रयत्न केले. उरमोडी योजनेसाठी लागणारा निधी आघाडी सरकारच्या काळात मिळविण्यात यश आले. कॅनॉल आणि पंपहाउसची कामे मोठ्या परिश्रमाने मार्गी लावली. पहिल्यांदा आमदार झाल्यावर ‘साडेतीन वर्षांत मतदारसंघात पाणी आणेन,’ असा शब्द मी जनतेला दिला होता. पावणेतीन वर्षांतच उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात आणून मी दिलेला शब्द खरा केला होता.२०११-१२ मध्ये कण्हेर जोड कालव्याची कामे युद्धपातळीवर करून ऐन दुष्काळात सलग २७९ दिवस उरमोडीचे पाणी येरळवाडी तलावात सोडून टंचाईवर मात केली होती. त्यानंतर पंपहाउस एक व दोन येथे नवीन पंप बसवून पूर्ण क्षमतेने पाणी तालुक्यात नेण्यासाठी प्रयत्न केले. २४ आॅगस्ट २०१४ रोजी उरमोडीचे पाणी पहिल्यांदा माण तालुक्यात पोहोचले. हजारोंच्या जनसमुदायाने मोठ्या आनंदाने माण तालुक्यात प्रथमच आलेल्या पाण्याचे स्वागत केले होते. उरमोडीचे पाणी पूर्ण क्षमतेने येण्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. कॅनॉल, पोटपोटाची कामे अपूर्ण होती. नवीन पंप बसवायचे होते. भूसंपादनाबाबत अडचणी होत्या. माझे सर्व ताकदीने प्रयत्न सुरू होते.’ (प्रतिनिधी)पाणी पाहण्यासाठी लोंढे कालव्याकडे...सुमारे दीड वर्षापूर्वी २४ आॅगस्ट २०१४ रोजी माण तालुक्यातील किरकसालच्या बोगद्यातून पहिल्यांदा उरमोडीचे पाणी तालुक्यात पोहचले होते. त्यादिवशी माण-खटावमधील जनतेने गर्दी करुन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पाणी पूजनाचा सोहळा अनुभवला होता. त्याचपद्धतीने आत्ताही उरमोडी योजनेचे पाणी पुन्हा माण तालुक्यात आले आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी या पाण्याचे पूजन केले. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. जानेवारी महिन्यात आमच्या भागातून उरमोडीचा कॅनॉल वाहतोय, हे पाहून आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळावर मात करताना आमची शेतीही पिकणार आहे. -महादेव अवघडे, शेतकरी किरकसाल