शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मराठा आरक्षणाला पाठिंबाच, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका

By सचिन काकडे | Updated: January 19, 2024 17:27 IST

सातारा : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात रान उठवलं. आरक्षणाच्या मागणीला मराठा समाज म्हणून आमचा निश्चितच पाठिंबा आहे. ...

सातारा : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात रान उठवलं. आरक्षणाच्या मागणीला मराठा समाज म्हणून आमचा निश्चितच पाठिंबा आहे. भारतीय जनता पार्टी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षण देण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न करत असून, शासन लवकरच योग्य तो तोडगा काढेल, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कास योजनेच्या नूतन जलवाहिनीच्या कामाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी सोलापूर येथून ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आले. सातारा पालिकेच्या सभागृहात या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रान उठवलं, पेटवलं ही वस्तुस्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे. मराठा समाज म्हणून आमचा त्यांच्या लढ्याला पाठिंबाच आहे. परंतु त्यांना फार काळ आंदोलन करावे लागणार नाही. राज्य सरकार निश्चितच आरक्षण प्रश्र्नी योग्य तो तोडगा काढेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले