शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गावाची अंधश्रद्धा वेशीवर टांगली; स्वागत कमानीवर चक्क काळी बाहुली लावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 17:51 IST

साताऱ्याच्या पश्चिमेला वसलेले दरे हे २०४ उंबऱ्यांचे व सुमारे ८५० लोकसंख्या असलेले गाव. या गावाला सैनिकी परंपरा लाभली आहे. गावातील अनेकांनी सैन्यात सेवा केली असून, अनेक तरुण आजही कर्तव्य बजावत आहेत.

>> सचिन काकडे

सातारा : सातारा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या मातीत जन्मलेल्या नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या हयातीत अंधश्रद्धेला कायमच मूठमाती दिली. इतके करूनही लोकांच्या मनावर आरूढ झालेले अंधश्रद्धेचे भूत अजूनही उतरलेले नाही. सातारा तालुक्यातील दरे गावच्या स्वागत कमानीवर लटकविण्यात आलेल्या काळ्या बाहुलीने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

साताऱ्याच्या पश्चिमेला वसलेले दरे हे २०४ उंबऱ्यांचे व सुमारे ८५० लोकसंख्या असलेले गाव. या गावाला सैनिकी परंपरा लाभली आहे. गावातील अनेकांनी सैन्यात सेवा केली असून, अनेक तरुण आजही कर्तव्य बजावत आहेत. येथील ग्रामस्थ व आजी- माजी सैनिक संघटनेकडून गावात २०२० रोजी भव्यदिव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली. कमानीवर असलेला राष्ट्रध्वज, बंदूकधारी सैनिक, बळीराजाचा सोबती असलेल्या बैलाची प्रतिकृती सारे काही लक्ष वेधून घेते. मात्र, याच कमानीवर राष्ट्रध्वजाच्या खालोखाल काळी बाहुली बांधून काही ग्रामस्थांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे.

केवळ नजर लागू नये, या उद्देशाने काही ग्रामस्थांकडून   स्वागत कमानीवर ही बाहुली बांधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खरोखरच काळी बाहुली लावून एखाद्या वस्तूचे संरक्षण होते का? हे समजण्याइतपत कोणीही अडाणी नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या मातीत सुरू केलेली अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आज जगभर पोहोचली. मात्र, आधुनिक युगातही अशा प्रकारची कृत्ये समाजातील काही विघातक घटकांकडून होत आहेत, यावर विश्वास बसत नाही. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार बंद व्हावेत यासाठी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पुन्हा एकदा मरगळ झटकावी लागणार आहे.

थोडा विचार कराच...

पोगरवाडीतून आरे गावात स्थायिक झालेले कर्नल संतोष महाडिक यांना कूपवाडा येथील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. त्यांच्या स्मृती आजही आरे, दरे, पोगरवाडी येथील ग्रामस्थांच्या मनात कायम आहेत. त्यांचा वारसा जपणाऱ्या दरे   ग्रामस्थांकडून अशा प्रकारच्या कृत्याला पाठबळ देणे योग्य नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास ३५० किल्ले बांधले. मात्र, त्यांनी किल्ल्यावर अशा बाहुल्या कधीच बांधल्या नाहीत. त्यामुळे ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? याचा दरे ग्रामस्थच नव्हे तर गाड्या, घर, कमानी व झाडांवर काळ्या बाहुल्या बांधणाऱ्या प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.

हे तर केवळ आत्मिक समाधान

एखाद्याने नवीन गाडी घेतली की, गाडीला लिंबू-मिरचीचे तोरण लटकवले जाते. काळी बाहुली अन् छोटी चप्पल असल्याशिवाय नव्या घराची पूजा होत नाही. पूजेनंतर या वस्तू घराच्या दर्शनी भागावर लटकवल्या जातात. बऱ्याचदा झाडाला लिंबू, टाचण्या व काळ्या बाहुल्या बांधल्या जातात. हा प्रकार अघोरी असून, यातून केवळ भोंदूबाबांचे पोट भरते. हे माहीत असूनही आपण अशा प्रकारांना खतपाणी घालत आहोत. खरोखरच अशा गोष्टींचा लाभ कितपत होतो, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, काळ्या बाहुल्या बांधून होतेय ते केवळ आपले आत्मिक समाधान.