शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

श्वानालाही जगण्याचा अधिकार भावनेतून सुनेत्रा भद्रेंचा लढा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:25 IST

विकास नावाच्या संकल्पनेने सर्व झपाटलेले आहेत. विकास म्हणजे काय तर सिमेंटची जंगलं वाढविणे, ही जंगलं वाढविण्यासाठी आपण हिरवीगार जंगलं ...

विकास नावाच्या संकल्पनेने सर्व झपाटलेले आहेत. विकास म्हणजे काय तर सिमेंटची जंगलं वाढविणे, ही जंगलं वाढविण्यासाठी आपण हिरवीगार जंगलं उद्ध्वस्त करत आहोत. या कृतीमुळे होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांचे पुरेसे गांभीर्य राहत नाही. हे कमी म्हणून की काय प्राण्यांविषयी, त्यातही शहरात फिरणाऱ्या भटके श्वान-मांजरांविषयीही कमालीची असंवेदनशीलता पाहायला मिळते. असे असले तरी प्राण्यांच्या संदर्भात क्रूरता, छळ प्रतिबंधक कायदा १९६० साली संमत करण्यात आला. परंतु, बऱ्याच गोष्टी केवळ कायद्याने बदलत नाहीत. त्यासाठी आधी मानसिकता बदलावी लागते. प्रत्येक जीवाला या पृथ्वीवर सुखाने जगण्यासाठी अन्न, पाणी, निवाऱ्याची गरज आहे आणि तो त्याचा हक्कही आहे. हेच ओळखून सुनेत्रा भद्रे यांचे काम सुरू आहे.

२००३ साली सुनेत्रा भद्रे यांनी एक जर्मन शेफर्ड जातीचा श्वान घेतला होता. त्यामुळे त्यांना श्वान या प्रजातीची माहिती अधिक होत गेली. त्यांचे आजार-उपचार, त्यांचे भावनिक विश्व हे सगळं त्या श्वानाने त्यांना शिकवलं... नकळत रस्त्यांवर फिरणारे भटके श्वान, त्यांचे त्रास समजू लागले... त्यांचा त्रास कमी करण्यासाठी व त्यांनाही सुखाने जगण्याचा हक्क आहे, तो त्यांना मिळवून देण्यासाठी कायद्याचा आधार घेऊन त्यांनी श्वानांच्या संरक्षणासाठी काम करण्यास सुरुवात केली. प्राणी हक्काचे कायदे समजले तेव्हापासून त्यांनी अधिक जोमाने काम केले. याची पावती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या प्राणी हक्क समितीवरही त्यांची निवड झाली व गेली आठ वर्षे या समितीवर त्यांनी काम केले.

श्वानांच्या संरक्षणासाठी काम करण्यास सुरुवात केल्यावर एका माणसाने दोन महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लांना सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागातील बंगल्यात डांबून ठेवलं होतं. त्यांना अन्नसुद्धा धड नव्हतं. त्यांना गॅस्ट्रो झाला होता. त्या माणसावर त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली तसेच त्या पिल्लांना ताब्यात घेऊन औषधोपचाराने बरे करून चांगल्या व प्राण्यांविषयी सहसंवेदना बाळगणाऱ्या कुटुंबांकडे दत्तक दिली. अशाप्रकारे सुनेत्रा भद्रे यांनी अनेक श्वानांची छळातून मुक्तता केली आहे.

श्वानाची प्रजाती बेसुमार वाढू नये म्हणून नसबंदी आवश्यक आहेच. याविषयीसुद्धा कायदा आहे. नियम आहेत. ते नियम म्हणजे ज्या भागातून शस्त्रक्रिया (नसबंदी) करण्यासाठी श्वान उचलतात, त्याच भागात, गल्लीत, गावात शस्त्रक्रिया केल्यानंतर जखम पूर्ण बरी झाल्यानंतर सोडावे लागते. जखम पूर्ण बरी होण्यासाठी औषधोपचार, चांगला आहार, एकाच जागी ठेवून किमान पाच दिवस उपचार करणे गरजेचे असते. तसेच अशा शस्त्रक्रिया करताना पावसाळा आणि त्यांचा मेटिंग पिरियड सोडून शस्त्रक्रियेचा काळ आणि वेळ ठरवावी लागते. तर मादी श्वान असतील तर त्यांची सोनोग्राफी करूनच शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो. हे ओळखून सुनेत्रा भद्रे यांनी साताऱ्यात नियमांविषयी जनजागृती केली व आजही करत आहेत.

त्याचबरोबर बेकायदेशीर मार्गाने श्वानाची होणारी हत्या हे तर अमानुषपणाचे लक्षण आहे. प्राण्यांनाही बुद्धी असते. जे मदत करतात त्यांना ते आयुष्यभर विसरत नाहीत. परंतु, माणसाची बुद्धी सर्व प्राणीमात्रांपेक्षा विकसित असली तरी लोकांना कायदा करूनही काही गोष्टी सांगाव्या लागतात हे खरंतर दुर्दैवच आहे, असेही त्यांचे मत आहे.

कोट :

खरंतर माणसाने स्वतःहून प्राण्यांच्या मदतीला आलं पाहिजे. आपल्या संस्कृती व परंपरेत कित्येक प्राण्यांची पूजा केली जाते. परंतु, ते सुद्धा स्वीकारून वा नाकारून माणूस सोयीने जगतो, याची मनस्वी चीड येते. पण, एक दिलासादायक गोष्ट म्हणजे साताऱ्यात तरुण-तरुणींचा एक गट सध्या मुक्या जीवांसाठी मनापासून काम करत आहे. हे पाहून संवेदनशीलता अजूनही जिवंत आहे. याचा प्रत्यय येतो. ही समाधानाची व सातारकर म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. - सुनेत्रा भद्रे

फोटो दिनांक १९ सातारा डॉग फोटो...

- नितीन काळेल

.........................................................................